शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

ईव्हीएम हटविण्यासाठी संविधान चौकातून महाअभियान  :  प्रशांत पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2019 21:34 IST

ईव्हीएम हटवून बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याच्या मागणीसाठी ८ सप्टेंबरला संविधान चौकातून महाअभियान सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती इंडिया अगेन्स्ट ईव्हीएम, जय जवान जय किसान संघटनेचे प्रशांत पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देचैत्यभूमीवर होणार यात्रेचा समारोप

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : देशात लोकशाही वाचविण्यासाठी ईव्हीएम हटविण्याची गरज आहे. त्यामुळे ईव्हीएम हटवून बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याच्या मागणीसाठी ८ सप्टेंबरला संविधान चौकातून महाअभियान सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती इंडिया अगेन्स्ट ईव्हीएम, जय जवान जय किसान संघटनेचे प्रशांत पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.प्रशांत पवार म्हणाले, ८ सप्टेंबरला दुपारी २ वाजता संविधान चौकातून ईव्हीएम विरोधातील यात्रेला सुरुवात होणार आहे. ही यात्रा वर्धा, अमरावती, अकोला, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक, पुणे या जिल्ह्यात जाऊन १८ सप्टेंबरला मुंबईच्या चैत्यभूमीवर यात्रेचा समारोप होईल. या जनआंदोलनात सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे, आनंद शिंदे, प्रकाशनाथ पाटणकर हे संविधानावरील गीतांनी प्रबोधन करणार आहेत. शासनाने ईव्हीएम विरोधात यात्रा काढण्यास मनाई केली. परंतु आम्ही उच्च न्यायालयात धाव घेतल्यामुळे यात्रेला परवानगी मिळाली. ईव्हीएम हटविण्यासाठी आयोजित महाअभियानात सर्व जातीधर्माचे नागरिक, राजकीय पक्ष, सामाजिक संघटना सहभागी होणार असल्याची माहिती पवार यांनी दिली. पत्रकार परिषदेला माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील, अ‍ॅड स्मिता कांबळे, राजेश लांजेवार, प्रदीप गणवीर, सुनील जवादे, घनशाम फुसे, आनंद पिल्लेवान, आनंद तेलंग, निखील कांबळे, अनिल भांगे, अ‍ॅड आकाश मुन उपस्थित होते.

टॅग्स :Prashant Pawarप्रशांत पवारMediaमाध्यमेEVM Machineएव्हीएम मशीन