शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
2
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
3
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
4
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
5
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
6
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
7
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
8
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
9
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
11
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
12
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्री सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
13
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
14
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे
15
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
16
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
17
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
18
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
20
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

नागपुरात कोरोनाच्या सावटात नळकनेक्शन कापण्याची मोहीम,लोकांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 20:44 IST

थकबाकी वसुलीच्या नावाखाली मनपाच्या जलप्रदाय विभागाने नळकनेक्शन कापण्याची मोहीम हाती घेतली आहे. शुक्रवारी जुनी फुटाळा वस्ती परिसरात जलप्रदाय विभागाचे पथक नळकनेक्शन तोडण्यासाठी गेले असता संतप्त नागरिकांच्या जमावाने कारवाईला विरोध केला.

ठळक मुद्देफुटाळ तलाव स्लम येथील म्हाडाच्या ४६६ गाळेधारकांचे कनेक्शन कापले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने कामाशिवाय घराबाहेर पडू नका, असे सांगितले आहे तर महापालिका प्रशासनाकडून नागरिकांना वारंवार साबणाने हात स्वच्छ धुवा, असे आवाहन केले जात आहे. दुसरीकडे थकबाकी वसुलीच्या नावाखाली मनपाच्या जलप्रदाय विभागाने नळकनेक्शन कापण्याची मोहीम हाती घेतली आहे. शुक्रवारी जुनी फुटाळा वस्ती परिसरात जलप्रदाय विभागाचे पथक नळकनेक्शन तोडण्यासाठी गेले असता संतप्त नागरिकांच्या जमावाने कारवाईला विरोध केला. यामुळे पथकाला माघारी जावे लागले.जुनी फुटाळा वस्ती हा परिसर स्लम भागात असूनही येथील रहिवाशांना हजारो रुपयांचे पाणी बिल पाठविण्यात आले आहे. २०० ते ३०० लोकांची ही तक्रार आहे. स्लम भाग असूनही काही लोकांना ३० ते ४० हजाराचे बिल आले आहे. बिल अधिक आल्याने बहुसंख्य लोकांनी ते भरले नाही. त्यामुळे जलप्रदाय विभागाने नळकनेक्शन तोडण्यासाठी पथक पाठविले. यामुळे वस्तीतील नागरिक संतप्त झाले. महिला व नागरिकांचा जमाव जमला. या घटनेची माहिती मिळताच आमदार विकास ठाकरे घटनास्थळी पोहचले. येथील नागरिकांची समस्या जाणून घेतली. धरमपेठ झोनचे सहायक आयुक्त प्रकाश वराडे यांना जादा बिलासंदर्भात विचारणा केली. देशात सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याचा धोका असताना मनपाची नळतोडण्याची मोहीम सुरू असल्याबाबत अधिकाऱ्यांना ठाकरे यांनी जाब विचारला. ग्राहकांच्या तक्रारी जाणून घ्या, रीतसर बिल पाठविण्यास अधिकाऱ्यांना बजावले. त्यानंतर मनपाचे पथक माघारी फिरले. जमावबंदी असताना बंदोबस्तात नळतोडण्याच्या कारवाईमुळे जमाव जमल्याची माहिती मिळाल्याने अंबाझरी पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारीही घटनास्थळी आले होते.४६६ गाळेधारकांचे कनेक्शन कापलेथकबाकी न भरल्याने जलप्रदाय विभागाच्या म्हाडाच्या १७ कॉलनीतील पाणीपुरवठा खंडित करण्याची मोहीम हाती घेतली आहे. रामबाग व रघुजीनगर येथील कॉलनीचे कनेक्शन कापल्याने हजारो गाळेधारकांचा पाणीपुरवठा बंद झाला आहे. गुरुवारी मोठा ताजबाग ते वांजारीनगर दरम्यानच्या म्हाडा क्वॉर्टरमधील ४६६ गाळेधारकांचा पाणीपुरवठा खंडित केला. जलप्रदाय विभागाचे अधिकारी आयुक्त तुकाराम मुुंढे यांचा धाक दाखवून पाणी कनेक्शन कापत असल्याचा आरोप येथील रहिवाशांनी केला आहे. नावाने कनेक्शन नसल्याने गाळेधारकांना पाणी बिल भरता येत नाही. वैयक्तिक नळ कनेक्शन देण्याची मागणी करूनही मिळत नसल्याचा येथील रहिवाशांचा आरोप आहे.जमावबंदी असताना म्हाडा क्वॉर्टरमधील मनपाची कारवाईच चुकीची आहे. आयुक्तांचा धाक दाखवून ही कारवाई केली जात आहे. येथील नागरिकांनी वैयक्तिक नळजोडणीची वारंवार मागणी केली आहे. परंतु महापालिका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याचा धोका असताना पाणीपुरवठा खंडित करण्याची कारवाई चुकीची असल्याचे प्रभागाचे नगरसेवक सतीश होले यांनी सांगितले. दरम्यान रामबाग व रघुजीनगर येथील गाळेधारकांनी आमदार विकास ठाकरे यांना यासंदर्भात निवेदन देऊन पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी केली.

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाWaterपाणी