शहरं
Join us  
Trending Stories
1
छ. संभाजीनगर भाजपमध्ये कार्यकर्त्यांचा उद्रेक थांबेना! मंत्र्यांच्या गाड्यांना काळं फासलं, घोषणाबाजी
2
अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट! शेवटच्या क्षणी शिंदेसेनेने डाव टाकला; भाजपा-NCP एकत्र लढणार
3
उस्मान हादी हत्या प्रकरणात बांगलादेश तोंडघशी पडला; मारेकरी भारतात नाही तर दुबईत सापडला...
4
जगायचं कसं? नळाला येत होतं गटाराचं पाणी; इंदूरमध्ये मृत्यूचं तांडव, ३ अधिकारी तडकाफडकी निलंबित
5
'३ इडियट्स'च्या सीक्वलबाबत आर माधवन स्पष्टच बोलला, म्हणाला- "आम्ही आता म्हातारे झालोय..."
6
सरकारकडून दिलासा मिळण्याची अपेक्षा, Vodafone-Idea चे शेअर्स वधारले; AGR वर मिळू शकते गुड न्यूज
7
१० महिन्यांचेच वर्ष होते...! मूळ रोमन कॅलेंडरमध्ये जानेवारी, फेब्रुवारी नव्हतेच...; जुलैचे नाव राजाने आपल्या नावावरून ठेवले...
8
तुमचा फोन हॅक तर झाला नाही ना? फक्त 'हा' एक कोड डायल करा आणि काही सेकंदात सत्य जाणून घ्या
9
'२४ तासांत येमेन खाली ​​करा'; हे दोन मुस्लिम देश एकमेकांच्या विरोधात, जोरदार बॉम्बस्फोट करत केले हल्ले
10
२९ महानगरपालिकांचे विरोधक आहे तरी कोण हेच कळेना! महायुती, मविआचेही तीनतेरा
11
भांडुप बस दुर्घटनेत बालकलाकाराच्या आईचा मृत्यू, १२ वर्षीय लेकीच्या डोळ्यासमोरच घडला अपघात
12
२०२५ संपण्याआधी 'या' तीन व्यक्तींचे आभार मानायला विसरू नका; मिळेल नव्या वर्षाची ऊर्जा 
13
"नोकऱ्या सोडून पक्षाच्या मागे पळालो, काय केलं आमच्याबरोबर"; दहिसरमध्ये भाजपचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर
14
२०२६ मध्ये निफ्टी ३२,००० आणि सेन्सेक्स १,०७,००० च्या पातळीवर पोहोचू शकतो; काय आहे ब्रोकरेजचं टार्गेट?
15
जळगावात महायुतीचा 'फॉर्म्युला' ठरला; भाजप दोन पावले मागे, शेवटच्या दिवशी ७६३ अर्ज
16
महापालिका निवडणूक 2026: राष्ट्रवादी (अजित पवार) भाजपासोबत! काँग्रेस पवारांच्या राष्ट्रवादीसोबत आघाडी; शिंदेसेना, उद्धवसेना, वंचितचे 'एकला चलो रे'
17
२०२६चा पहिला महिना महादेवांना: ३ प्रदोष व्रतांचा संयोग, कालातीत कृपा-लाभ संधी, शिव शुभ करतील!
18
'इंडिया आघाडी' तुटणार? बिहारमधील पराभवानंतर, काँग्रेसवर एकट्याने निवडणूक लढण्याचा वाढला दबाव
19
Stock Market Today: नव्या सीरिजची दमदार सुरुवात; Sensex २०० अंकांनी वधारला, मेटल शेअर्समध्ये मोठी तेजी
20
२०२६च्या पहिल्याच दिवशी प्रदोष, ‘असे’ करा व्रतपूजन; शिव मंत्र ठरेल रामबाण, वर्षभर मिळेल लाभ!
Daily Top 2Weekly Top 5

फिलिपिन्समधील विद्यार्थ्यांची हाक...ने मजसी मातृभूमीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2020 00:30 IST

फिलिपिन्समध्ये झालेल्या ‘कोरोना’च्या चक्रव्यूहात फसल्याने महाराष्ट्रातील सुमारे ४० हून अधिक विद्यार्थी अस्वस्थ झाले. ‘ने मजसी परत मातृभूमीला’ अशीच आर्तसाद विद्यार्थ्यांनी घातली आहे.

ठळक मुद्देमूळचे महाराष्ट्राचे विद्यार्थी ‘सिंगापूर’मध्ये अडकले : नागपुरातील विद्यार्थ्याचादेखील समावेशउड्डाणाची परवानगी नसल्याने ‘बोर्डिंग पास’देखील फाडले

योगेश पांडे/लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : फिलिपिन्समध्ये झालेल्या ‘कोरोना’च्या चक्रव्यूहात फसल्याने महाराष्ट्रातील सुमारे ४० हून अधिक विद्यार्थी अस्वस्थ झाले. अशा प्रसंगात कुटुंबीयांसह राहावे या विचारातून सर्वांनी मायदेशाकडे धाव घेतली. त्यांच्या विमानाचे उड्डाण झाले अन् त्या कालावधीत फिलिपिन्ससह मलेशियातून येणारी विमाने रद्द करण्यात आली. नाईलाजाने त्यांना अगोदर मलेशिया व त्यानंतर सिंगापूरला अडकावे लागले. मुंबईला परतण्यासाठी त्यांच्या हाती ‘बोर्डिंग पास’देखील आला. मात्र नव्या नियमांचा हवाला देत तोदेखील फाडण्यात आला. दिवसभरापासून ते सिंगापूरच्या चांगी विमानतळावर अडकून आहेत. आता पुढे काय करायचे, याची कुठलीही दिशा स्पष्ट नाही अन् परत फिलिपिन्सला जायची हिंमत नाही. अशा स्थितीत ‘ने मजसी परत मातृभूमीला’ अशीच आर्तसाद विद्यार्थ्यांनी घातली आहे.फिलिपिन्समध्ये ‘कोरोना’चा कहर वाढल्याने तेथे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी तातडीने भारतात परतण्याचा निर्णय घेतला. काही विद्यार्थी दिल्लीमार्गे तर काही मुंबईमार्गे परतायला सुरुवात झाली. १७ मार्च रोजी महाराष्ट्रातील ४० हून अधिक विद्यार्थी निघाले. त्यांचे विमान मलेशियामार्गे मुंबईला येणार होते. मात्र मलेशियातील विमानांना भारतात प्रवेश नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्या वेळी सर्व विद्यार्थी विमानातच होते. मलेशियाला पोहोचल्यावर त्यांनी ही बाब कळाली. त्यानंतर सिंगापूरमार्गे मुंबईकडे जाता येईल असे त्यांना सांगण्यात आले. तब्बल १९ तासांनंतर ते क्वालालांपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाहून निघाले व बुधवारी सकाळी ११ च्या सुमारास सिंगापूरच्या चांगी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले. तेथे काही विद्यार्थ्यांना सुरुवातीला ‘बोर्डिंग पास’ देण्यात आला. परंतु ‘एअर इंडिया’ने फिलिपिन्स व मलेशियातून येणाºया प्रवाशांना नेण्यास नकार दिल्याचे त्यांना कळाले. काही वेळातच त्यांच्याकडून ‘बोर्डिंग पास’ घेऊन फाडण्यात आले. आता विद्यार्थी ना फिलिपिन्सला परतू शकत आहेत व ‘एअर इंडिया’च्या धोरणांनुसार मुंबईलादेखील येऊ शकत नाहीत. सिंगापूरमध्येदेखील जास्त वेळ राहू शकणार नाहीत. त्यामुळे आता आम्ही काय करावे, असा प्रश्न त्यांच्याकडून उपस्थित करण्यात येत आहे. यासंदर्भात त्यांनी ‘व्हिडिओ’देखील काढून केंद्र सरकारला मदतीचे आवाहन केले आहे.विशेष विमानाची सोय करावी‘फिलिपिन्स’मध्ये वैद्यकीय शिक्षण घेणारा दुर्वेश अविनाश गाणार हा विद्यार्थीदेखील अडकला आहे. चांगी विमानतळावर आम्ही अडकलो असून आता काय करावे हे काहीच कळत नाही. आम्ही भारतीय दूतावासालादेखील संपर्क केला. परंतु तिकडूनदेखील अद्याप काही ठोस उत्तर आलेले नाही. आमच्या घरचे लोक काळजी करत असून केंद्र सरकारने त्वरित आमची मदत करावी, असे दुर्वेशने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. सिंगापूरमधून मुंबईला विमाने येऊ दिली जात आहेत. त्यामुळे आम्हाला मुंबईत येण्याची परवानगी द्यावी. असे शक्य नसेल तर सरकारने विशेष विमानाची सोय करावी व आम्हाला ‘एअरलिफ्ट’ करावे, अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केली आहे. क्वालालांपूर विमानतळावर त्यांच्या जेवणाची सोय करण्यात आली होती. मात्र चांगी विमानतळावर पाण्याशिवाय त्यांना काहीही देण्यात आले नाही.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याStudentविद्यार्थी