शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

CAA : विरोध करण्यापूर्वी कायदा समजून घ्या :  दयाशंकर तिवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 22:38 IST

भारतीय नागरिकत्व संशोधन कायदा हा देशातील कुठल्याही जाती, धर्माच्या विरोधात नाही. विरोध करणाऱ्यांनी विरोधापूर्वी कायदा समजावून घ्यावा, असे आवाहन भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी केले.

ठळक मुद्देदेशातील कुठल्याही धर्म, जातीच्या नागरिकांच्या विरोधात कायदा नाही

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : भारतीय नागरिकत्व संशोधन कायदा हा देशातील कुठल्याही जाती, धर्माच्या विरोधात नाही. जे शरणार्थी भारतात वास्तव्य करीत आहे. त्यांना संरक्षण देणारा कायदा आहे. सरकारने अमलात आणत असलेले सर्व कायदे काँग्रेस सरकारच्या काळात बनले आहे. फक्त भाजप सरकार त्याची अंमलबजावणी करीत असल्यामुळे विरोधी पक्ष कुटील राजकारण करून विशिष्ट धर्माला भडकवत आहे. विरोध करणाऱ्यांनी विरोधापूर्वी कायदा समजावून घ्यावा, असे आवाहन भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी केले.

लोकजनशक्ती मोर्चाच्यावतीने सीएए च्या समर्थनात शनिवारी सक्करदरा चौकात जाहीर सभेचे आयोजन केले होते. या सभेला मुख्य वक्ता म्हणून दयाशंकर तिवारी उपस्थित होते. यावेळी आमदार कृष्णा खोपडे, मोहन मते, शुद्धचित्त बुद्ध विहारचे भंते रावजी पिंडक, शीख संप्रदायाचे चरणजितसिंग रेणू, नगरसेवक अ‍ॅड. धर्मपाल मेश्राम, अ‍ॅड. नरेंद्र गोंडाने, लोकजागृती मोर्चाचे संयोजक अ‍ॅड. रमण सेनाड, अशोक गोयल, देवेंद्र दस्तूरे, सुभाष कोटेचा आदी उपस्थित होते. सीएएच्या समर्थनात पोस्टकार्ड अभियान राबविण्यात आले. सभेला उपस्थित असणाऱ्या सर्वांनी पोस्ट कार्डवर सीएएचे समर्थन करून बॉक्समध्ये टाकले. हे पोस्टकार्ड मुख्य न्यायाधीशांना पाठविण्यात येणार असल्याचे सेनाड म्हणाले.याप्रसंगी दयाशंकर तिवारी यांनी सीएए कायद्याविषयी माहिती दिली. ते म्हणाले १९५५ ला नागरिकता संशोधन कायदा करण्यात आला. वेळोवेळी त्यात बदलही करण्यात आले. पंतप्रधान मोदींनी या कायद्यात कुठलेच बदल केले नाही. या कायद्याच्या कलम ५ मध्ये फेरबदल केले. कलम ५ मध्ये पूर्वी शरणार्थींना भारताचे नागरिकत्व हवे असेल तर येथे ११ वर्षाचा अधिवास ग्राह्य धरावा लागत होता. आता तो फक्त ५ वर्षाचा केला आहे. पण हे मोदींनी केल्यामुळे त्याला विरोध होत असल्याचे तिवारी म्हणाले. यावेळी त्यांनी सीएए, एनआरसी, एनपीआर का आले. त्याला कुणी समर्थन दिले. ती काळाजी गरज कशी आहे. यावर मार्गदर्शन केले. प्रसंगी अ‍ॅड. नरेंद्र गोंडाने यांनी सीएए ला समर्थन देत कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याची गरज व्यक्त केली. मुस्लिमांना अद्याप भारत समजलेला नसल्याचे मत अ‍ॅड. धर्मपाल मेश्राम यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रमण सेनाड यांनी तर संचालन अभिजित मुळे यांनी केले.

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकBJPभाजपा