शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

सीएएमुळे कुणावरही अन्याय नाही : मुनगंटीवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 20:44 IST

सीएएमुळे कुणावरही अन्याय होणार नाही. तरीही चुकीचा भ्रम पसरविला जात आहे. विदेशात राहणाऱ्या ज्या हिंदूंवर अन्याय झाला त्यांना भारतामध्ये नागरिकत्व द्यावे, अशी त्यात तरतूद आहे, असे प्रतिपादन माजी वित्तमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सीएएला देशभरात विरोध होत आहे. प्रत्यक्षात सीएएमुळे कुणावरही अन्याय होणार नाही. तरीही चुकीचा भ्रम पसरविला जात आहे. विदेशात राहणाऱ्या ज्या हिंदूंवर अन्याय झाला त्यांना भारतामध्ये नागरिकत्व द्यावे, अशी त्यात तरतूद आहे, असे प्रतिपादन माजी वित्तमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले.‘लोकमत’शी बोलताना मुनगंटीवार म्हणाले, मूळ भारतीय असणाऱ्या निर्वासितांवर तिकडे अन्याय होत असताना ते भारतात येऊ इच्छित असतील तर त्यांना स्वत:च्या देशात सामावण्याची गरज आहे. मात्र त्यासाठी विरोध केला जात आहे. हा कायदा सहिष्णुतेसाठी आहे. मात्र तरुणांची माथी भडकविण्याचे काम देशात सुरू आहे. इटलीतून आलेल्यांना भारतीयत्व मिळू शकते तर त्यांना का नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यामुळे कुणाचेही नागरिकत्व धोक्यात येणार नाही. आलेच तर आमदारकीचा राजीनामा देणारे आपण पहिले आमदार राहू.विद्यमान सरकारवर संधान साधताना मुनगंटीवार म्हणाले, या सरकारकडून विकासाची कसलीही अपेक्षा नाही. या राज्यात ४७ वर्षे २ महिने राज्य केले. तरीही महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न जे सरकार आतापर्यंत सोडवू शकले नाही, त्यांच्याकडून आता तरी विकासाच्या अपेक्षा काय करणार ?जनतेचा विश्वासघात झाला हे मात्र खरे आहे. मुख्यमंत्र्यांना स्वत:च्या बळावर कोणत्याच घोषणा करता येत नाही. शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्यामध्ये फसलेले हे मुख्यमंत्री आहेत. एवढी वर्षे सत्तेत राहूनही या दोन्ही नेत्यांच्या सरकारच्या काळात अद्यापही सर्वसामान्यांचे प्रश्न सुटले नाहीत, हे मात्र खरे आहे.

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक