शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

सीएएमुळे कुणावरही अन्याय नाही : मुनगंटीवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 20:44 IST

सीएएमुळे कुणावरही अन्याय होणार नाही. तरीही चुकीचा भ्रम पसरविला जात आहे. विदेशात राहणाऱ्या ज्या हिंदूंवर अन्याय झाला त्यांना भारतामध्ये नागरिकत्व द्यावे, अशी त्यात तरतूद आहे, असे प्रतिपादन माजी वित्तमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सीएएला देशभरात विरोध होत आहे. प्रत्यक्षात सीएएमुळे कुणावरही अन्याय होणार नाही. तरीही चुकीचा भ्रम पसरविला जात आहे. विदेशात राहणाऱ्या ज्या हिंदूंवर अन्याय झाला त्यांना भारतामध्ये नागरिकत्व द्यावे, अशी त्यात तरतूद आहे, असे प्रतिपादन माजी वित्तमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले.‘लोकमत’शी बोलताना मुनगंटीवार म्हणाले, मूळ भारतीय असणाऱ्या निर्वासितांवर तिकडे अन्याय होत असताना ते भारतात येऊ इच्छित असतील तर त्यांना स्वत:च्या देशात सामावण्याची गरज आहे. मात्र त्यासाठी विरोध केला जात आहे. हा कायदा सहिष्णुतेसाठी आहे. मात्र तरुणांची माथी भडकविण्याचे काम देशात सुरू आहे. इटलीतून आलेल्यांना भारतीयत्व मिळू शकते तर त्यांना का नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यामुळे कुणाचेही नागरिकत्व धोक्यात येणार नाही. आलेच तर आमदारकीचा राजीनामा देणारे आपण पहिले आमदार राहू.विद्यमान सरकारवर संधान साधताना मुनगंटीवार म्हणाले, या सरकारकडून विकासाची कसलीही अपेक्षा नाही. या राज्यात ४७ वर्षे २ महिने राज्य केले. तरीही महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न जे सरकार आतापर्यंत सोडवू शकले नाही, त्यांच्याकडून आता तरी विकासाच्या अपेक्षा काय करणार ?जनतेचा विश्वासघात झाला हे मात्र खरे आहे. मुख्यमंत्र्यांना स्वत:च्या बळावर कोणत्याच घोषणा करता येत नाही. शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्यामध्ये फसलेले हे मुख्यमंत्री आहेत. एवढी वर्षे सत्तेत राहूनही या दोन्ही नेत्यांच्या सरकारच्या काळात अद्यापही सर्वसामान्यांचे प्रश्न सुटले नाहीत, हे मात्र खरे आहे.

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक