शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

नागपुरात १ कोटीच्या खंडणीसाठी लॉटरी व्यवसायिकाच्या मुलाचे अपहरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 00:47 IST

विदर्भाच्या लॉटरी व्यावसायिकांमधील बडी असामी समजल्या जाणाऱ्या  सुरेश आग्रेकर यांचा मुलगा राहुल यांचे मंगळवारी सकाळी सशस्त्र आरोपींनी अपहरण केले.

ठळक मुद्देसर्वत्र खळबळपोलिसांची तारांबळ

ऑनलाईन लोकमतनागपूर : विदर्भाच्या लॉटरी व्यावसायिकांमधील बडी असामी समजल्या जाणाऱ्या  सुरेश आग्रेकर यांचा मुलगा राहुल यांचे मंगळवारी सकाळी सशस्त्र आरोपींनी अपहरण केले. त्याच्या सुटकेसाठी एक कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आल्यामुळे संबंधित वर्तुळात आणि शहर पोलीस दलात प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे.लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दारोडकर चौकात आग्रेकर यांचे निवासस्थान आहे. जैन समाजातील प्रतिष्ठित परिवार म्हणून आग्रेकर कुटुंबीयांचा मान आहे. नागपूर-विदर्भातील लॉटरी व्यावसायिकांमध्ये त्यांचे नाव सर्वात मोठे आहे. राहुलला जयेश नामक मोठा भाऊ आहे. एक-दीड तासात परत येतो, असे सांगून आज सकाळी राहुल घराबाहेर गेला. काही अंतर पायी चालत गेल्यानंतर राहुल एका बोलेरोसारख्या वाहनात बसल्याचे सांगितले जाते. दुपार झाली तरी राहुल परत आला नाही म्हणून कुटंबातील अर्पिता यांनी फोन केला. यावेळी त्यांनी दीडएक तासात येतो, असे सांगितले. त्यानंतर २ वाजून ८ मिनिटांनी जयेश आग्रेकर यांच्या मोबाईलवर फोन आला. फोन करणाऱ्याने आम्ही राहुलचे अपहरण केले. त्यांना सुखरूप अवस्थेत सोडवून घ्यायचे असेल तर एक कोटी रुपयांची खंडणी द्यावी लागेल, असे सांगितले. यासंबंधाने कुणाकडे वाच्यता केल्यास अथवा पोलिसांकडे तक्रार नोंदवल्यास गंभीर परिणाम होतील, अशी धमकीही मोबाईलवर बोलणाऱ्याने दिली. एक कोटींच्या खंडणीसाठी राहुलचे अपहरण झाल्याचे कळाल्याने आणि त्यांच्या जीवाला धोका असल्याचे लक्षात आल्याने घरच्यांचा आक्रोश सुरू झाला. परिवाराशी संबंधित खास आप्तांना बोलवून अपहरण आणि खंडणीच्या फोनची माहिती देण्यात आली. प्रदीर्घ विचारमंथन केल्यानंतर पोलिसांकडे माहिती देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार लकडगंज पोलीस ठाण्यात संपर्क साधण्यात आला.

 

टॅग्स :Crimeगुन्हा