शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
3
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
4
"देशाला दिशा देण्याऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
5
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
6
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
7
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
8
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
9
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
10
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
11
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
12
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
13
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
14
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
15
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
16
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
17
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?
18
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
19
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
20
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...

जिहादी व कम्युनिस्टांना अरबी समुद्रात दफन करा

By admin | Updated: January 12, 2017 23:07 IST

गेल्या काही काळापासून देशात जिहादी कारवाया वाढल्या आहेत. सीमेवर शत्रूपासून धोका आहे, तर देशाच्या आत जिहादी शक्ती व हिंदूवर हल्ले करणा-या कम्युनिस्टांचे भय

ऑनलाइ लोकमत
नागपूर, दि. 12 - गेल्या काही काळापासून देशात जिदादी कारवाया वाढल्या आहेत. सीमेवर शत्रूपासून धोका आहे, तर देशाच्या आत जिहादी शक्ती व हिंदूंवर हल्ले करणा-या कम्युनिस्टांचे भय आहे. देशाला भयमुक्त करण्यासाठी जिहादी व कम्युनिस्टांना अरबी समुद्रात दफन करायला हवे, असे वादग्रस्त वक्तव्य भाजपाचे माजी खासदार तरुण विजय यांनी केले आहे. विवेकानंद केंद्र नागपूर शाखेतर्फे आणि सुमतीबाई पां.देव मेमोरिअल चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी ‘विश्वगुरु भारताचे द्रष्टा स्वामी विवेकानंद’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
स्वामी विवेकानंदांच्या जयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमाला विवेकानंद केंद्राचे विदर्भ प्रमुख आनंद बगडिया, नगर संचालक जगदीश हेडाऊ प्रामुख्याने उपस्थित होते. आपल्या देशाचा भूतकाळ फारच चरित्रवान आणि समृद्ध होता. मात्र आपल्याला त्याचा विसर पडला आहे. देशात अनेक महापुरुष होऊन गेले आहेत. मात्र त्यांचे कार्य व विचार केवळ संग्रहालये व पुस्तकांपुरते मर्यादित झाले आहेत. स्मृतिहिनता हा आपल्या देशाला लागलेला सर्वात मोठा रोग आहे. इतिहासातील अस्मितेचा विसर पडला आहे. विवेकानंदांनी देशाच्या गौरवशाली स्मृति जागविल्या व हिंदू समाजाला जागृत केले होते. त्यांचे कार्य पुढे नेण्याची सर्वांची जबाबदारी आहे, असे तरुण विजय म्हणाले.
बहिणीच्या आत्महत्येनंतर स्वामी विवेकानंदांनी समाज जागृतीचा संकल्प केला. समाजातील पाखंड, कुरीतीविरोधात त्यांनी निर्भिडपणे मत मांडले व त्यांचा विरोध केला. त्यामुळेच त्यांना ‘वीर संन्यासी’ असे संबोधण्यात येते. देशात धर्मांतरण, लव्ह जिहाद हे प्रकार वाढीस लागले आहेत. एक हिंदू दुसºया धर्मात गेला म्हणजे केवळ हिंदूंची लोकसंख्या कमी होत नाही, तर धर्मासाठी एक नवा शत्रू निर्माण होतो, असेदेखील त्यांनी सांगितले. 
 
बंगाल का पेटतेय ?
बंगालने रविंद्रनाथ टागोर, स्वामी विवेकानंद यांच्यासह अनेक तेजस्वी व वीरपुरुषांचा बंगालच्या मातीत जन्म झाला. हिंदू धर्माला तेथून मोठे संस्कार मिळाले. मात्र आज त्याच बंगालमध्ये हिंदू असुरक्षित आहे. सातत्याने हिंदूंवर हल्ले होत आहे. बंगाल का पेटत आहे, याचा विचार करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन तरुण विजय यांनी केले. जर हिंदूंवर आघात होत असेल तर तेथील शासनकर्ते विवेकानंदांना मानत असल्याचा दावाच करु शकत नाही, या शब्दांत त्यांनी ममता बॅनर्जींचे नाव न घेता टीका केली.