शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

भाज्यांचा दणका; गृहिणींचे बजेट बिघडले

By admin | Updated: June 17, 2014 00:53 IST

विदर्भात मान्सूनपूर्व पावसाची धडक आणि भाज्यांची घटलेली आवक या दोन कारणांमुळे नागपूर शहरात भाज्यांचे भाव गगनाला टेकले आहेत. वारंवार होणाऱ्या डिझेलच्या दरवाढीचा फटका भाज्यांनाही बसत आहे.

स्थानिक आवक कमी : ठोकमध्येही भाज्या महागचनागपूर : विदर्भात मान्सूनपूर्व पावसाची धडक आणि भाज्यांची घटलेली आवक या दोन कारणांमुळे नागपूर शहरात भाज्यांचे भाव गगनाला टेकले आहेत. वारंवार होणाऱ्या डिझेलच्या दरवाढीचा फटका भाज्यांनाही बसत आहे. परंतु, गेल्या काही दिवसांमध्ये भाज्या विकत घेताना श्रीमंतांनाही खिशाकडे डोकावून पाहावे लागत आहे. भाज्यांच्या महागाईची झळ बसू लागली आहे. भाज्यांचा दणक्याने गृहिणींचे दैनंदिन बजेट बिघडले आहेत. किरकोळच नव्हे तर ठोक बाजारातही भाज्या महाग आहेत. काही भाज्या तर दुर्मिळ झाल्या आहेत. त्यांची खरेदी सामान्यांना परवडणारी नाही. भाज्या महागल्याने हॉटेल, रेस्टॉरंट मालकांनीही दर वाढविले आहेत. सर्वसाधारण १५ ते २० रुपये किलोप्रमाणे विकली जाणारी फूलकोबी किरकोळ बाजारात २५ रुपये भावाने घ्यावी लागत आहे. सांबार ठोक बाजारातच २५ रुपये किलो झाला असून किरकोळ विक्रेते चक्क ५० रुपयात विकत आहेत. दहा दिवसांआधी किरकोळमध्ये १० रुपये किलो विकले जाणारे टमाटर ३० रुपयांवर गेल्याची माहिती महात्मा फुले भाजी बाजार अडतिया असोसिएशनचे सचिव राम महाजन यांनी लोकमतला दिली. नागपुरात टमाटरची आवक संगमनेर आणि नाशिकहून आहे. लवकरच जयपूर येथून आवक सुरू होईल. कॉटन मार्केट ठोक बाजारात गोंदिया आणि भंडाऱ्यातून भेंडी, फूलकोबी छिंदवाडा आणि औरंगाबाद, हिरव्या मिरच्या परतवाडा, जगदलपूर, रायपूर येथून येत आहेत. याशिवाय स्थानिक उत्पादकांकडून चवळी भाजी, पालक, भेंडी, कारले आदींची आवक आहे. आधी २०० ते २५० लहानमोठ्या गाड्यांची आवक आता १४० ते १५० गाड्यांवर आली आहे. शिवाय नागपुरातून माल अन्य ठिकाणी विक्रीस जातो. शहराला पुरेल एवढी आवक नसल्याने भाज्या महाग झाल्याचे महाजन यांनी सांगितले. पत्ताकोबी, पालक, कोहळे आवाक्यातबहुतांश भाज्यांचे भाव आकाशाला भिडले आहेत. गृहिणींसमोर पत्ता कोबी, पालक, वांगे आणि कोहळ्याचा पर्याय आहे. सध्या आवक कमी आहे. गेल्या आठवड्यापर्यंत भाव आटोक्यात होते. पावसाळ्यापूर्वी मशागतीसाठी शेत खाली करावे लागते. त्यामुळे शेतात केवळ १० ते २० टक्के भाज्या आहेत. आॅगस्टपासून ५० टक्के भाज्यांची आवक सुरू होईल. दसरा आणि दिवाळीपर्यंत आवक मोठ्या प्रमाणात असते. तोपर्यंत ग्राहकांना भाज्या महागच मिळतील. (प्रतिनिधी)