शहरं
Join us  
Trending Stories
1
UPSC Result 2025: यूपीएससी आयईएस आयएसएसचा निकाल जाहीर; सोलापूरचा मयुरेश वाघमारे देशात आठवा!
2
किती धोक्याची? सॅमसंगची स्मार्ट रिंग बॅटरी फुगली, बोटात खुपली; वापरकर्ता विमानतळावरून थेट हॉस्पिटलमध्ये
3
दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
4
अब्जाधीशांच्या यादीत पहिल्यांदाच सामील झाला शाहरुख खान, पाहा किती झाली संपत्ती?
5
Chaitanyananda Saraswati : अय्याशीसाठी संस्थेत बांधली लग्झरी रुम... स्वयंघोषित बाबाचे काळे कारनामे, अश्लील चॅट्सने खळबळ
6
अर्थव्यवस्थेला ५ मोठे 'बूस्टर डोस'! रेपो दर जैसे थे, पण RBI च्या 'या' निर्णयाने मार्केटमध्ये येणार पैसा
7
इलेक्ट्रीक टु-व्हीलर विक्रीत मोठा उलटफेर! ओलाची जागा बजाज, बजाजची जागा ओलाने घेतली, टीव्हीएस, एथरने टिकवली...
8
गुरुवारी दसरा २०२५: ‘अशी’ करा स्वामी सेवा, वर्षभर पुण्य लाभेल; देवी लक्ष्मी लाभच लाभ देईल!
9
"तुझी मैत्रिण किंवा ज्युनियर आहे का, दुबईतल्या शेखला..."; चैतन्यानंदचे हादरवणारे व्हॉट्सअॅप चॅट समोर
10
गुरुवारी दसरा २०२५: राहु काळ कधी? पाहा, शुभ विजय मुहूर्त; महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
11
Gold Silver Price 1 October: एका झटक्यात सोनं १२०० रुपयांपेक्षा अधिक वाढलं, चांदीतही जोरदार तेजी; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
12
१७ वर्षांची तरुणी न सांगताच घराबाहेर पडली, आता २ महिन्यांनी जंगलात सापडला मृतदेह, कोकणात खळबळ 
13
EMI भरतोय म्हणून घरावर पतीचा अधिकार होत नाही; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल, प्रकरण काय?
14
नवरात्र घट विसर्जन २०२५: पुरणाचे दिवे आणि कलशाचे पाणी कसे वापरावे? देवीच्या कृपेसाठी खास विधी!
15
फिलिपाईन्स भूकंपात 69 जणांचा मृत्यू, शेकडो जखमी; पाहा धक्कादायक व्हिडिओ...
16
३० वर्षांनी शुभ दसरा २०२५: ७ राजयोगात १० राशींना भरपूर लाभ, भरघोस यश-पैसा; सुख-सुबत्ता काळ!
17
'जे घडले, ते घडायला नको होते'; मोहसिन नक्वींनी बीसीसीआयची माफी मागितली, पण ट्रॉफी परत देण्यास नकार
18
असे कसे झाले...! सप्टेंबरमध्ये वाहनांची विक्री वाढायला हवी होती, १३ टक्क्यांनी कमी झाली...; नेमके काय झाले...
19
नांदेडचे शेतकरी कैलाश रामभाऊ यांनी KBC मध्ये जिंकले ५० लाख, एक कोटी रुपयांच्या प्रश्नावर सोडला खेळ
20
ICC Rankings : अभिषेकनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; T20I च्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं

उत्तम पक्ष बांधणी हीच भाजपची जमेची बाजू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 12:54 IST

बूथ स्तरापर्यंत पक्षाची बांधणी आहे. कार्यकर्त्यांची मोठी फौज आहे. ही अत्यंत जमेची बाजू असताना पक्षात कुठेही गटबाजी नाही. त्यामुळे वर्धा लोकसभा मतदार संघात भाजपला निवडणूक जिंकणे सहज शक्य असल्याचा विश्वास खासदार रामदास तडस यांनी व्यक्त केला.

ठळक मुद्देवर्धा लोकसभा मतदार संघाचे खासदार रामदास तडस यांची लोकमतशी बातचीत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बूथ स्तरापर्यंत पक्षाची बांधणी आहे. कार्यकर्त्यांची मोठी फौज आहे. जिल्ह्यातील सर्व नगर परिषदांवर भाजप सत्तेत आहे. शिवाय जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांवरही भाजपचीच पकड आहे. ही अत्यंत जमेची बाजू असताना पक्षात कुठेही गटबाजी नाही. त्यामुळे वर्धा लोकसभा मतदार संघात भाजपला निवडणूक जिंकणे सहज शक्य असल्याचा विश्वास खासदार रामदास तडस यांनी व्यक्त केला.आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते लोकमतशी बोलत होते. २०१४ पूर्वी जिल्ह्यात देवळी ही एकमेव नगर परिषद भाजपच्या ताब्यात होती मात्र आता सर्व सहा नगर परिषदांवर भाजपचा कब्जा आहे. गेल्या साडेचार वर्षांच्या कालावधीत केलेल्या विकास कामांमुळे १२ पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदेवरही भाजपचाच झेंडा आहे. सामान्य माणसांची कामे सहज होत असल्याने भाजपवरचा विश्वास वाढत आहे. त्यामुळे वर्धा मतदार संघात अतिशय चांगले वातावरण असल्याची पुष्टी खासदार तडस यांनी जोडली. आपल्यापर्यंत येणाऱ्या प्रत्येक माणसाची दखल घेतली जाते. त्याच्या समस्येचे निराकरण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न होतो. आतापर्यंत १५ हजार कोटी रुपयांची कामे केल्याचा दावा करीत तडस सांगतात, आधी जिल्ह्यात एक राष्ट्रीय महामार्ग होता. आता तब्बल ११ राष्ट्रीय महामार्ग आहेत. १९०० पैकी सुमारे १३०० गावांपर्यंत आपण स्वत: पोहोचलो असून उर्वरित गावातही पोहचण्याचा प्रयत्न सुरू आहे. पाच वर्षातील २५ कोटींचा खासदार निधी विकास कामांसाठी खर्च झाल्याचे समाधान आहे, असे ते म्हणाले. नागपूरनंतर पासपोर्ट कार्यालयाचे पहिले उपकेंद्र वर्धा जिल्ह्यात उघडण्यात आले. त्यामुळे स्थानिक नागरिकांना त्याचा मोठा फायदा झाला. सदर उपकेंद्र सुरू झाल्यानंतर जिल्ह्यात १२ हजार नवीन पासपोर्ट जारी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सिंदी रेल्वे येथे महाराष्ट्रातील एकमेव ड्रायपोर्ट प्रकल्प साकारला जात असून विकासाच्या दिशेने उचलण्यात आलेले हे सकारात्मक पाऊल आहे. कारंजा तालुक्यात सिंदी विहीर येथे मेगा फूड पार्क मंजूर झाल्याचेही ते सांगतात. वर्धा रेल्वे स्टेशनला राष्ट्रीय दर्जा मिळाल्यामुळे प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होणार आहेत. रेल्वेस्थानकाचा विकास होणार. जिल्ह्यात उड्डाण पुलांची कामेदखील सुरू झालेली आहेत. आयुष्यमान भारत योजनेंतर्गत वर्धा जिल्ह्यातील ६३०० रुग्णांवर मागील दोन महिन्यात उपचार करण्यात आले.या योजनेची प्रभावी अंमलबजावणी जिल्ह्यात केली जात आहे. पंतप्रधान आवास योजना शहरी भागात उत्तमरीत्या राबविण्यात आली असून देवळीमध्ये ८२२ घरांची निर्मिती करण्यात आल्याचे खासदार तडस यांनी सांगितले. याशिवाय सात रेल्वे गाड्यांना वर्धा लोकसभा मतदार संघातील विविध स्थानकांवर थांबा मिळवून देण्यातही आपल्याला यश आले आहे. पुलगावमध्ये झालेल्या स्फोटच्या घटनेची सीबीआय चौकशी व्हावी, ही मागणी आपणच लावून धरल्यामुळे तपासाला गती मिळाली आणि संबंधित व्यक्तीला अटक करण्यात पोलिसांना यश आले. विविध कामांचे कंत्राट एकाच माणसाला का, असा प्रश्नही आपण पुलगाव घटनेसंदर्भात उपस्थित केला होता, असेही ते म्हणाले.भाजपचे संघटन मजबूत असल्याने ही निवडणूक भाजपला सोपी जाणार असल्याचे सांगत आपणच यंदा भाजपचे उमेदवार असणार, हेही खासदार तडस यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Ramdas Tadasरामदास तडस