शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
6
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
7
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
8
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
9
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
10
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
11
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
12
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
13
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
14
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
15
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
16
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
17
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
18
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
19
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
20
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले

सोमनाथच्या धर्तीवर राममंदिराची उभारणी करा : विहिंप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 20:30 IST

अयोध्येत राममंदिराची निर्मिती व्हावी ही देशातील कोट्यवधी नागरिकांची भावना आहे. जर न्यायालयीन प्रक्रियेला उशीर लागत असेल तर सरकारने अध्यादेश जारी करावा किंवा कायदा करावा. सोमनाथ मंदिराच्या धर्तीवर अध्यादेश जारी करुन राम मंदिराची उभारणी झाली पाहिजे, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेतर्फे करण्यात आली आहे. २५ नोव्हेंबर रोजी नागपुरात हुंकार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यासंदर्भात आयोजित पत्रपरिषदेत हा मुद्दा ‘विहिंप’तर्फे मांडण्यात आला.

ठळक मुद्देआमदार, खासदारांना वैयक्तिक निमंत्रण नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अयोध्येत राममंदिराची निर्मिती व्हावी ही देशातील कोट्यवधी नागरिकांची भावना आहे. जर न्यायालयीन प्रक्रियेला उशीर लागत असेल तर सरकारने अध्यादेश जारी करावा किंवा कायदा करावा. सोमनाथ मंदिराच्या धर्तीवर अध्यादेश जारी करुन राम मंदिराची उभारणी झाली पाहिजे, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेतर्फे करण्यात आली आहे. २५ नोव्हेंबर रोजी नागपुरात हुंकार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यासंदर्भात आयोजित पत्रपरिषदेत हा मुद्दा ‘विहिंप’तर्फे मांडण्यात आला.पत्रपरिषदेला विश्व हिंदू परिषदेचे विदर्भ अध्यक्ष राजेश्वर निवल, आयोजन समितीचे अध्यक्ष संजय भेंडे, प्रांतमंत्री अजय निलदावार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विदर्भ प्रांत प्रचार प्रमुख अनिल सांबरे, संयोजक सनतकुमार गुप्ता, सहसंयोजक दिनेश गौर, ‘विहिंप’चे उपाध्यक्ष गोविंद शेंडे प्रामुख्याने उपस्थित होते. २५ नोव्हेंबर रोजी बंगळुरू व अयोध्या येथेदेखील हुंकार सभा होणार आहे. क्रीडा चौक येथील ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या मैदानात दुपारी ३ वाजता ही सभा होईल. या सभेला ज्योतिषपीठाधीश्वर शंकराचार्य वासुदेवानंद सरस्वती, साध्वी ऋतुंभरा, देवनाथ पीठाधीश्वर जितेंद्रनाथ महाराज, विहिपचे कार्याध्यक्ष आलोककुमार प्रामुख्याने उपस्थित राहतील. या सभेला विदर्भ व मध्य भारतातून एक लाख कार्यकर्ते येतील, असा विश्वास यावेळी सनतकुमार गुप्ता यांनी व्यक्त केला.राममंदिराचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे आतापर्यंत हिंदू समाजाने संयम ठेवला होता. परंतु, सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणावर लगेच सुनावणी करण्यास नकार दिला. राममंदिराच्या मुद्याला प्राथमिकता नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. न्यायालयाच्या भूमिकेसंदर्भात आम्हाला कुठलेही भाष्य करायचे नाही. त्यामुळे आमचा केवळ इतकाच आग्रह आहे की, केंद्र सरकारने संसदेत अध्यादेश पारित करून सोमनाथाच्या धर्तीवर अयोध्येत राममंदिर उभारावे. यासंदर्भात विहिपच्या राष्ट्रीय नेत्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा झाल्याचे संजय भेंडे यांनी सांगितले.सर्व पक्षीय नेत्यांचे स्वागतया सभेसाठी कुठल्याही आमदार किंवा खासदारांना स्वतंत्रपणे विशेष निमंत्रण दिलेले नाही. हा मुद्दा जनभावनेशी जुळलेला आहे व जनप्रतिनिधींनी यात स्वत:हून सहभागी होणे अपेक्षित आहे. या सभेला सर्व पक्षाच्या नेत्यांचे स्वागत होईल. सर्वांसाठी ही सभा खुली आहे, असे संजय भेंडे यांनी स्पष्ट केले.मंचावर संघाचे पदाधिकारी राहणार नाहीसंघ परिवारातील स्वयंसेवकांनी हुंकार सभेच्या आयोजनासाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे मंचावर संघाचे पदाधिकारी राहतील की नाही, हा प्रश्न कायम होता. मात्र ही सभा संतांच्या आदेशानुसार ‘विहिंप’च्या नेतृत्वात होत आहे. मंचावर संत व ‘विहिंप’चे कार्याध्यक्ष हेच राहतील, असे भेंडे यांनी स्पष्ट केले.आठ ठिकाणी ‘पार्किंग’ची व्यवस्थाविदर्भातून एक लाख कार्यकर्ता या सभेसाठी अपेक्षित आहेत. या कार्यकर्त्यांच्या वाहनांच्या ‘पार्किंग’ची सोय आजूबाजूच्या परिसरातील आठ मैदानात करण्यात आली आहे. यात हनुमानगरचे चौकोनी मैदान, प्रोफेसर कॉलनी मैदान, बास्केटबॉल मैदान, मोहता विज्ञान महाविद्यालयाचे मैदान, एसबीसीटी महाविद्यालय मैदान, चंदन नगर मैदान, आयुर्वेदिक महाविद्यालय मैदान व जैन कलार भवन येथे ‘पार्किंग’ करता येणार आहे, असे सनतकुमार गुप्ता यांनी सांगितले.

 

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्या