शहरं
Join us  
Trending Stories
1
Sambhajinagar Accident: संभाजीनगरात भीषण अपघात, भरधाव कार दुभाजकाला धडकून उलटली, ३ जण जागीच ठार!
2
IND vs ENG: केएल राहुलने शुभमन गिलकडून घेतली 'कॅप्टन्सी', पराभवापूर्वी सामन्यात अचानक काय घडलं?
3
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मीक कराडच 'डायरेक्टर'; न्यायालयात ३ तास काय झाला युक्तिवाद?
4
IND vs ENG: आधी चार झेल सोडले, नंतर हसत-खेळत केली 'तशी' कृती... यशस्वी जैस्वालवर संतापले नेटिझन्स
5
मदरशामध्ये अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत ठेवले अनैसर्गिक संबंध, व्हिडीओही काढले, सोशल मीडियावर शेअर केले, आरोपी अटकेत
6
पाकिस्तान सुधारणार नाही, राजौरीमध्ये नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न अयशस्वी; दहशतवादी गोळीबार करून पळून गेले
7
Iran Israel Conflict: इराण इस्रायल प्रकरणी भारत शांत का? एक चूक आणि ५७,४४८ कोटी येतील धोक्यात
8
Pramod Kondhare: पाठीमागून आला आणि...; भाजप पदाधिकाऱ्याचं महिला पोलीसाशी गैरवर्तन, गुन्हा दाखल
9
जगभर: चिनी राष्ट्राध्यक्षांच्या ‘अज्ञात’ मुलीची ‘हेरगिरी’! शी जिनपिंग यांची मुलगी कोण?
10
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
11
दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा
12
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
13
"...म्हणून आम्ही हरलो", पराभवानंतर शुभमन गिलने यांच्यावर फोडलं अपयशाचं खापर 
14
नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक   
15
आजचे राशीभविष्य - २५ जून २०२५, नोकरीत पदोन्नतीची शक्यता, वैवाहिक सौख्य लाभेल!
16
विशेष लेख: आणीबाणीने देशाला शिकवलेले तीन धडे
17
Samruddhi Mahamarg: 'समृद्धी'वर शहापूरजवळ ओव्हरपासच्या पुलावर १९ दिवसांतच पडले खड्डे
18
लेख: तोटा सोसून बँकेच्या बचत खात्यात लोकांनी पैसे का ठेवावे?
19
शक्तिपीठ महामार्ग होणारच; 'कोल्हापुरात महामार्ग नको', कोल्हापूरच्या मंत्र्यांची भूमिका
20
India vs England: जिथे कमी तिथे केएल राहुल!

अर्थसंकल्पात योजनांना कात्री?

By admin | Updated: February 19, 2015 01:53 IST

ग्रामीण भागात स्वयंरोजगाराची साधने निर्माण व्हावी, तसेच शेतीला जोडधंदा म्हणून जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत राबविण्यात येणारी गाय ...

नागपूर : ग्रामीण भागात स्वयंरोजगाराची साधने निर्माण व्हावी, तसेच शेतीला जोडधंदा म्हणून जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत राबविण्यात येणारी गाय व शेळी गट वाटपाची योजना बंद करण्याच्या हालचाली सुरू आहेत. विभागाच्या २०१५-१६ च्या अर्थसंकल्पात या योजनेला कात्री लागणार आहे. २०१४-१५ च्या अर्थसंकल्पात या वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी २० लाखांची तरतूद करण्यात आली होती. परंतु पुढील वर्षासाठी १०० रुपयाची टोकन तरतूद दर्शविण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील गरजूंना या योजनेचा लाभ मिळणार नाही. नापिकी व कर्जामुळे विदर्भातील आत्महत्या अद्याप थांबलेल्या नाहीत. यातून सावरण्यासाठी त्यांना स्वयंरोजगार उपलब्ध करण्याची गरज आहे. या हेतूने गाय व शेळी गट वाटप योजना राबविण्यात येते परंतु लेखा परीक्षकांनी या योजनेच्या अंमलबजावणीवर आक्षेप नोंदविले होते. योजनेतील त्रुटी दूर करून ही योजना प्रभावीपणे राबविण्याची गरज होती. परंतु त्रुुटी दूर न करता ही योजनाच बंद करण्याचा प्रयत्न आहे. पशुसंवर्धन विभागाने १.२८ कोटीचे नियोजन केले आहे. यात सुधारित वैरण, वंधत्व निवारण, दूध उत्पादन वाढीसाठी प्रयत्न, प्रथमोपचार, जीवनसत्व पुरवठा, पशुवैद्यकीय दवाखान्यांची दुरुस्ती व विविध योजनांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)