शहरं
Join us  
Trending Stories
1
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
2
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
3
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
6
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
7
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
8
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
9
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
10
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
11
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
12
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
13
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
14
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
15
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
16
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
17
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
18
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
19
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
20
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

योग्य वेळी घेणार बौद्ध धम्माची दीक्षा : मायावती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2019 20:47 IST

मी नक्कीच बौद्ध धम्माची दीक्षा घेणार आहे. परंतु त्यासाठी योग्य वेळ यायची आहे. योग्य वेळ आली, माझ्यासोबत मोठ्या संख्येने लोक धम्म स्वीकारण्यास तयार झाले की मीसुद्धा बौद्ध धम्माची दीक्षा घेईल, असे बसपाच्या राष्ट्रीय अध्यक्ष मायावती यांनी येथे जाहीर केले.

ठळक मुद्देभाजप-काँग्रेसच्या धोरणावर केली टीका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतराची घोषणा केली; परंतु प्रत्यक्षात बौद्ध धम्माची दीक्षा घ्यायला अनेक वर्षे घेतली. यामागे त्यांचे एक नियोजन होते. आपल्या अनुयायांना यासाठी त्यांना तयार करावयाचे होते. माझ्या बाबतीतही कार्यकर्ते असाच विचार करीत असतील की मायावती या बौद्ध धम्माची दीक्षा कधी घेणार? मी नक्कीच बौद्ध धम्माची दीक्षा घेणार आहे. परंतु त्यासाठी योग्य वेळ यायची आहे. योग्य वेळ आली, माझ्यासोबत मोठ्या संख्येने लोक धम्म स्वीकारण्यास तयार झाले की मीसुद्धा बौद्ध धम्माची दीक्षा घेईल, असे बसपाच्या राष्ट्रीय अध्यक्ष मायावती यांनी येथे जाहीर केले. 

बसपाच्या विदर्भातील सर्व ६२ उमेदवारांच्या प्रचारार्थ सोमवारी इंदोरा येथील मैदानात बसपा अध्यक्ष मायावती यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. यावेळी पक्षाचे प्रदेश प्रभारी खा. वीरसिंग, डॉ. अशोक सिद्धार्थ, प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे आदी उपस्थित होते.मायावती म्हणाल्या, काँग्रेस आणि भाजपच्या चुकीच्या धोरणांमुळेच देशात महागाई आणि बेरोजगारी वाढली आहे. काँग्रेस आणि भाजपचे आतून संगनमत आहे. या संगनमतामुळेच शासकीय नोकरीतील आरक्षणाला निष्प्रभ करण्यात आल्याची टीका त्यांनी केली. कांशीराम यांनी महाराष्ट्रातून राजकीय चळवळीची सुरुवात केली, परंतु त्यांना येथे कधीच यश आले नाही, याची खंत त्यांनी नेहमीच होती. ती खंत मलाही आहे. येथील आंबेडकरी अनुयायी घोषणा खूप देतात, परंतु मत देताना ते गोंधळून जातात. आंबेडकरी अनुयायी अजूनही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेल्या राजकीय विचारांवर चालत नाहीत, अशी खंतही मायावती यांनी व्यक्त केली.भारत हे हिंदू नव्हे तर धर्मनिरपेक्ष राष्ट्रभारत हे हिंदू राष्ट्र नव्हे तर धर्मनिरपेक्ष राष्ट्र असल्याचे स्पष्ट करीत आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी नुकत्याच केलेल्या एका वक्तव्याचा जाहीर निषेध बसपाच्या राष्ट्रीय अध्यक्ष मायावती यांनी केला. भागवत यांनी हा देश हिंदूंचा असल्यामुळेच येथे मुस्लीम आनंदात असल्याचे वक्तव्य केले होते. याची आठवण करून देत भागवत यांनी सच्चर कमिटीचा अहवालाचा अभ्यास करावा, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019mayawatiमायावतीBahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टी