शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
2
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
3
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
4
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
5
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
6
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
7
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
8
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
9
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
10
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
11
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
12
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
13
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
14
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
15
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
16
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
17
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
18
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
19
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
20
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती

‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’च्या नावे दलाल सक्रिय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 11:24 IST

सरकारी योजनांचा लाभ लाभार्थ्यांना मिळो अथवा न मिळो, पण दलात मात्र त्या योजनेतून कसा लाभ मिळविता येईल, यासाठी सक्रिय झाले.

ठळक मुद्देदोन लाख रुपये मिळण्याचा करताहेत दावा विभाग म्हणतोय या योजनेत लाभच मिळत नाही

सैयद मोबीन/ मंगेश व्यवहारे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सरकारी योजनांचा लाभ लाभार्थ्यांना मिळो अथवा न मिळो, पण दलात मात्र त्या योजनेतून कसा लाभ मिळविता येईल, यासाठी सक्रिय झाले. केंद्र सरकारने देशभरात ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ हे अभियान राबविले आहे. पण या अभियानाचा चुकीचा प्रचार आणि प्रसाद दलालांच्या माध्यमातून होत आहे. त्यात सामान्यजन फसले जात आहे. ग्रामीण भागात त्यासाठी ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ या नावाने काही फॉर्म वाटण्यात आले आहे. ८ ते ३२ वयाच्या मुलीला प्रधानमंत्री यांच्याकडून दोन लाख रुपये मिळणार आहे असे सांगितले जात आहे. त्या फॉर्मच्या झेरॉक्ससाठी ५ रुपये घेतल्यानंतर, फॉर्म भरून मंत्रालयात पोस्ट करण्यासाठी २०० ते ५०० रुपये वसूल केले जात आहे. लोकमतने यासंदर्भात चौकशी केली असता हा फसवेगिरीचा प्रकार उघडकीस आला आहे. महिला व बाल कल्याण मंत्रालयाची अशी कुठलीही योजना नाही. पण दलाल या माध्यमातून आपले खिसे भरताहेत.

उत्तर प्रदेशातून झाली होती सुरुवातमंत्रालयातील सूत्रानुसार फॉर्म वाटपाची सुरुवात उत्तर प्रदेशातून झाली होती. उत्तर प्रदेशात यासंदर्भात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सीबीआयकडे या प्रकरणाची चौकशी सोपविण्यात आली आहे. त्याचबरोबर हरियाणा, उत्तराखंड, पंजाब, हिमाचल प्रदेश, दिल्ली येथे सुद्धा हे फॉर्म वाटप झाले आहे. बिहार, राजस्थान, केरळ व पश्चिम बंगाल येथून सुद्धा फॉर्म मंत्रालयात पोहचले आहे. आता महाराष्ट्रातून हे फॉर्म मोठ्या प्रमाणात वितरित होत आहे. आमच्या विभागाकडे स्पीड पोस्टाने असे लाखो फॉर्म प्राप्त झाले आहे.

मंत्रालयाने वेबसाईटवर नोटिफिकेशन केले जाहीरयासंदर्भात केंद्र सरकारच्या महिला व बाल कल्याण मंत्रालयाने आपल्या वेबसाईटवर एक नोटिफिकेशन जाहीर केले आहे. त्यात स्पष्ट केले की, ही स्कीम मंत्रालयाकडून राबविली जात आहे. हे फॉर्म फेक आहे. यात ‘बेटी बचाओ, बेटी बढाओ’ स्कीमचा मुख्य उद्देश पीसीपीएनडीटी अ‍ॅक्ट सक्तीने लागू करणे, मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे आणि महिलांचे सशक्तीकरण करणे हा आहे. ही कुठल्याही लाभाची योजना नाही.

योजनेचा उद्देश अजिबात आर्थिक नाहीमहाराष्ट्रात २०१५ पासून ही योजना राबविण्यात येत आहे. यात २०१८-१९ मध्ये नागपूर जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये मुलींचा जन्मदर वाढविणे, प्रसुतीपुर्वी गर्भलिंग निदानाला प्रतिबंध घालणे, मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे, तिच्या सुरक्षेची काळजी घेणे. या बाबतीत जनजागृती कार्यक्रम राबवायचा आहे. यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेत एक ‘कृतिगट’ तयार करण्यात आला आहे. महिला व बाल विकास विभागाबरोबर इतर काही विभागाच्या समन्वयातून हा कार्यक्रम राबवायचा आहे. यात कुठलेही आर्थिक लाभ मिळणार नाही. त्यामुळे जनतेमध्ये योजनेसंदर्भात काही फॉर्म वाटप होत असेल, आमिष दाखविण्यात येत असेल तर त्यांनी बळी पडू नये. परिसरातील अंगणवाडी सेविका, बाल विकास प्रकल्प कार्यालय अथवा जिल्हा महिला व बाल कल्याण विभागाकडे संपर्क साधून योजनेची माहिती घ्यावी.- भागवत तांबे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, महिला व बाल विकास विभाग 

टॅग्स :Governmentसरकार