शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

चांगल्या गोष्टींना समाजापुढे आणा

By admin | Updated: November 18, 2014 00:50 IST

पत्रकारिता हे सामान्य काम नाही. पत्रकारांच्या लिखाणाने जनता प्रभावित होते. त्यामुळे पत्रकाराचे डोळे हे ‘एक्सरे आईज’व बुद्धी ही प्रचंड शार्प असणे गरजेचे आहे. मात्र पत्रकारिता क्षेत्रात शिरलेल्या ‘हेड’

विकास सिरपूरकर : राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त चर्चासत्रनागपूर : पत्रकारिता हे सामान्य काम नाही. पत्रकारांच्या लिखाणाने जनता प्रभावित होते. त्यामुळे पत्रकाराचे डोळे हे ‘एक्सरे आईज’व बुद्धी ही प्रचंड शार्प असणे गरजेचे आहे. मात्र पत्रकारिता क्षेत्रात शिरलेल्या ‘हेड’,‘मेड’,‘पेड’ न्यूजमुळे पत्रकारितेचा दर्जा खालावतो आहे. असे असले तरी, आशावादी राहून स्वच्छ चारित्र बाळगून, सापेक्षी वृत्तीने आपल्या कल्पनाशक्तीच्या जोरावर चांगल्या गोष्टींना समाजापुढे आणा, तरच पत्रकारितेत पारदर्शिता येईल, असे मत सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती विकास सिरपूरकर यांनी व्यक्त केले. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, नागपूर श्रमिक पत्रकार संघ व टिळक पत्रकार भवन ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त ‘सार्वजनिक कामकाजातील पारदर्शकता : माध्यमांची भूमिका’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रात वक्ता म्हणून ते बोलत होते. यावेळी प्रेस कौन्सिल आॅफ इंडियाचे सदस्य व वरिष्ठ पत्रकार प्रकाश दुबे, माहिती व जनसंपर्क संचालनालयाचे संचालक मोहन राठोड, विभागीय माहिती केंद्रातील जिल्हा माहिती अधिकारी दिलीप कुळकर्णी, टिळक पत्रकार भवन ट्रस्टचे अध्यक्ष प्रदीप मैत्र, सरचिटणीस शिरीष बोरकर, नागपूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष बी. एस. त्रिपाठी, सरचिटणीस अनुपम सोनी उपस्थित होते. यावेळी सिरपूरकर यांनी प्रिंट मीडिया कसा बलशाली आहे, याचे उदाहरण देताना ते म्हणाले की, पत्रकार जे लिहितो, ज्या टीका करतो, जे विचार मांडतो, त्या विचाराशी तो जुळलेला असतो. हे विचार तो अक्षराच्या माध्यमातून वृत्तपत्रातून प्रकट करतो. आणि अक्षर कधीही नष्ट होत नाही. त्यामुळे पत्रकाराने जबाबदारी ठेवून पत्रकारिता करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. यावेळी बोलताना प्रकाश दुबे यांनी पत्रकारिता जगताचे सध्याचे काय स्वरूप आहे, त्यात बदल करण्यासाठी काय करणे गरजेचे आहे, यावर विवेचन केले. ते म्हणाले की मीडिया हे संवादाचे माध्यम राहिलेले नसून ते सत्तेचे माध्यम झालेले आहे. या माध्यमावर आंतरिक आणि बाहेरूनही संकटाचे सावट आहे. पत्रकारितेच्या परिवर्तनासाठी तिसऱ्या प्रेस आयोगाची गरज त्यांनी व्यक्त केली. पत्रकारिता क्षेत्रात साधन वाढले आहे, मात्र संवेदना कमी झाली आहे. त्यामुळे पत्रकारांनी या क्षेत्रात कार्य करताना संवेदना हरवू देऊ नका, असा सल्लाही त्यांनी दिला. (प्रतिनिधी)