शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
3
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
4
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
5
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
6
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
7
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
8
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
9
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
10
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
11
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
12
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
13
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
14
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
15
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
16
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
17
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
18
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
19
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

कालव्यावरील पूल धाेकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:41 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : तालुक्यातील काचूरवाही व किरणापूर शिवारातून गेलेल्या पेंच प्रकल्पाच्या कालव्याला आणि त्यावरील पुलाला जड वाहतुकीमुळे ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रामटेक : तालुक्यातील काचूरवाही व किरणापूर शिवारातून गेलेल्या पेंच प्रकल्पाच्या कालव्याला आणि त्यावरील पुलाला जड वाहतुकीमुळे तडा गेल्या आहेत. ही वाहतूक अजूनही सुरूच असल्याने पूल काेसळून अपघात हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. या प्रकाराकडे पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे, असा आराेप या भागातील शेतकऱ्यांनी केला आहे.

काचूरवाही-किरणापूर दरम्यानच्या पांदण रस्त्याच्या दुरुस्तीला मुख्यमंत्री सडक याेजनेंतर्गत मंजुरी देण्यात आली असून, निधी प्राप्त झाल्याने या रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. यात रस्त्याच्या मजबुतीकरण, खडीकरण व डांबरीकरणाचे काम केले जाणार आहे. याच शिवारातून पेंच प्रकल्पाचा मुख्य कालवा व उपकालवा गेला आहे. त्यावर आवश्यक त्या ठिकाणी पुलांची निर्मिती करण्यात आली आहे. या रस्त्याच्या कामासाठी लागणारा मुरुम व इतर साहित्याची वाहतूक कालव्याच्या कडेला असलेल्या राेड आणि पुलावरून अव्याहतपणे केली जात आहे.

या ओव्हरलाेड वाहतुकीमुळे आधीच माेडकळीस आलेल्या कालव्यावरील पुलाला तडे गेले आहेत, शिवाय कालवा व मायनरच्या भिंतींनाही तडे जायला सुरुवात झाली आहे. ही बाब धाेकादायक असल्याने, या रस्त्यावरील ओव्हरलाेड वाहतूक बंद करावी, तसेच पाटबंधारे विभागाने तातडीने पूल, कालवा व मायनरची दुरुस्ती करावी, अशी मागणी प्रहारचे जिल्हाध्यक्ष रमेश कारामोरे, काचुरवाहीचे सरपंच शैलेश राऊत, कल्पना नाटकर, उमेश महाजन, श्रीकांत बावनकुळे, गजानन भलमे, चंदू बावनकुळे, नंदू नाटकर, विनोद नाटकर, गजानन भलमे, गणेश तायवाडे यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे.

...

अधिकाऱ्यांकडून जुजबी पाहणी

पुलाला गेलेले तडे आणि कालवा व मायनरची झालेली दुरवस्था याबाबत स्थानिक शेतकऱ्यांनी अनेकदा पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांना कळविले आहे. मध्यंतरी अधिकाऱ्यांनी या पुलाची प्रत्यक्ष पाहणी केली. मात्र, त्या पुलाच्या दुरुस्तीसाठी किंवा त्यावरील ओव्हरलाेड वाहतूक थांबविण्यासाठी काहीही उपाययाेजना केल्या नाही, असेही या भागातील शेतकऱ्यांनी सांगितले.