शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
3
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
4
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
5
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
6
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
7
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
8
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
11
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
12
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
13
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
14
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
15
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
20
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका

कालव्यावरील पूल धाेकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:41 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : तालुक्यातील काचूरवाही व किरणापूर शिवारातून गेलेल्या पेंच प्रकल्पाच्या कालव्याला आणि त्यावरील पुलाला जड वाहतुकीमुळे ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रामटेक : तालुक्यातील काचूरवाही व किरणापूर शिवारातून गेलेल्या पेंच प्रकल्पाच्या कालव्याला आणि त्यावरील पुलाला जड वाहतुकीमुळे तडा गेल्या आहेत. ही वाहतूक अजूनही सुरूच असल्याने पूल काेसळून अपघात हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. या प्रकाराकडे पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे, असा आराेप या भागातील शेतकऱ्यांनी केला आहे.

काचूरवाही-किरणापूर दरम्यानच्या पांदण रस्त्याच्या दुरुस्तीला मुख्यमंत्री सडक याेजनेंतर्गत मंजुरी देण्यात आली असून, निधी प्राप्त झाल्याने या रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. यात रस्त्याच्या मजबुतीकरण, खडीकरण व डांबरीकरणाचे काम केले जाणार आहे. याच शिवारातून पेंच प्रकल्पाचा मुख्य कालवा व उपकालवा गेला आहे. त्यावर आवश्यक त्या ठिकाणी पुलांची निर्मिती करण्यात आली आहे. या रस्त्याच्या कामासाठी लागणारा मुरुम व इतर साहित्याची वाहतूक कालव्याच्या कडेला असलेल्या राेड आणि पुलावरून अव्याहतपणे केली जात आहे.

या ओव्हरलाेड वाहतुकीमुळे आधीच माेडकळीस आलेल्या कालव्यावरील पुलाला तडे गेले आहेत, शिवाय कालवा व मायनरच्या भिंतींनाही तडे जायला सुरुवात झाली आहे. ही बाब धाेकादायक असल्याने, या रस्त्यावरील ओव्हरलाेड वाहतूक बंद करावी, तसेच पाटबंधारे विभागाने तातडीने पूल, कालवा व मायनरची दुरुस्ती करावी, अशी मागणी प्रहारचे जिल्हाध्यक्ष रमेश कारामोरे, काचुरवाहीचे सरपंच शैलेश राऊत, कल्पना नाटकर, उमेश महाजन, श्रीकांत बावनकुळे, गजानन भलमे, चंदू बावनकुळे, नंदू नाटकर, विनोद नाटकर, गजानन भलमे, गणेश तायवाडे यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे.

...

अधिकाऱ्यांकडून जुजबी पाहणी

पुलाला गेलेले तडे आणि कालवा व मायनरची झालेली दुरवस्था याबाबत स्थानिक शेतकऱ्यांनी अनेकदा पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांना कळविले आहे. मध्यंतरी अधिकाऱ्यांनी या पुलाची प्रत्यक्ष पाहणी केली. मात्र, त्या पुलाच्या दुरुस्तीसाठी किंवा त्यावरील ओव्हरलाेड वाहतूक थांबविण्यासाठी काहीही उपाययाेजना केल्या नाही, असेही या भागातील शेतकऱ्यांनी सांगितले.