शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

मुलगा पसंत नाही म्हणून नवरीचा बोहल्यावर चढण्यास नकार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 10:43 IST

Nagpur News मुलगा पसंत नसल्याचे कारण देत ऐनवेळी नवरीने बोहल्यावर चढण्यास नकार दिला. त्यामुळे वाजत गाजत आलेल्या नवरदेवाला नवरीविनाच लग्नमंडपातून परत जावे लागले.

ठळक मुद्देलग्नमंडपासून नवरदेव परतला

 लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मुलगा पसंत नसल्याचे कारण देत ऐनवेळी नवरीने बोहल्यावर चढण्यास नकार दिला. त्यामुळे वाजत गाजत आलेल्या नवरदेवाला नवरीविनाच लग्नमंडपातून परत जावे लागले. रामटेकच्या राजमहल रिसॉर्टमध्ये घडलेल्या या नाट्यमय प्रकारात पोलिसांनी हस्तक्षेप करीत दोन्ही पक्षाच्या सामंजस्याने विवाह सोहळा रद्द केला.

मिळालेल्या माहितीनुसार खात (ता.मौदा) येथील मुलीचे लग्न अमरावती येथील मुलाशी जुळले होते. ठरल्याप्रमाणे रामटेकच्या राजमहल रिसॉर्टमध्ये मंगळवारी दुपारी १२ वाजता हा लग्नसोहळा होणार होता. मात्र नवरी मुलीने लग्नाच्या तासाभरापूर्वी ग्रामीण पोलीस कंट्रोल रूमला फोन करीत माझे कुटुंबीय जबरदस्तीने लग्न लावून देत असल्याची माहिती दिली. यासोबतच आपले दुसऱ्या मुलावर प्रेम असल्याचेही तिने सांगतिले. कंट्रोल रूमने रामटेकचे ठाणेदार प्रमोद मकेश्वर यांना याबाबत अवगत केले. मकेश्वर यांनी याची दखल घेत दोन्ही पक्षाच्या लोकांना पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. तिथे झालेल्या चर्चेनंतर दोन्ही कुटुंबाने सामंजस्याने हा सोहळा रद्द करण्याचे ठरविले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वधू-वरमंडळी सोमवारी (दि. १२) जुलै रोजी सायंकाळी राजमहल रिसार्ट येथे दाखल झाली होती. रितीरिवाजनुसार सोमवारी रात्री उत्साहात हळदीचा कार्यक्रमही पार पडला. या लग्नाचा सर्व खर्च वरमंडळीकडून केला जात होता. मात्र मुलीचे दुसऱ्या मुलावर प्रेम आहे, याची पुसटशीही कल्पना त्यांना आली नाही. मुलीने ८ दिवसापूर्वी तिच्या आईला अमरावतीचा मुलगा पसंत नसून आपले दुसऱ्यावर प्रेम असल्याचे सांगितले होते. मात्र तिच्याकडे कुटुंबीयांनी दुर्लक्ष केल्याने शेवटी तिने पोलिसांची मदत घेत हे लग्न रद्द केले.

टॅग्स :marriageलग्न