शहरं
Join us  
Trending Stories
1
Aaditya Thackeray: ‘इलेक्शन’ कशाला ‘सिलेक्शन’ करा!' मतदारयादीतील गोंधळावरून आदित्य ठाकरेंचा आयोगावर आरोप
2
Mumbai: मंगलप्रभात लोढा यांना जीवे मारण्याची धमकी, काँग्रेसच्या अस्लम शेख यांच्याविरोधात तक्रार
3
Thane: श्रेयवादाची लढाई ठाण्यात हातघाईवर, भाजप नेत्याकडून शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण!
4
पंतच्या नेतृत्त्वात भारताची मालिका बचाव मोहीम! IND vs SA 2nd Test मॅच Live Streaming बद्दल सविस्तर
5
Ambernath Accident: अंबरनाथमध्ये निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिंदेसेनेच्या उमेदवाराच्या कारला अपघात, ४ ठार!
6
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
7
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
8
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
9
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
10
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
11
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
12
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
13
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
14
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
15
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
16
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
17
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
18
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
19
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
20
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
Daily Top 2Weekly Top 5

विटभट्टी कामगारांवर उपासमारीची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 17:52 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या संचारबंदी आणि लॉकडाऊनचा फटका कोराडी परिसरातील विटांच्या भट्ट्यांवर काम करणाऱ्या कामगारांनाही बसला आहे.

ठळक मुद्देमालकाने सोडले वाऱ्यावरशिधापत्रिका नसल्याने धान्यही मिळेना

दिनकर ठवळे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या संचारबंदी आणि लॉकडाऊनचा फटका कोराडी परिसरातील विटांच्या भट्ट्यांवर काम करणाऱ्या कामगारांनाही बसला आहे. सदर कामगार दुसऱ्या जिल्ह्यातून येथे उपजीविकेसाठी आले आहेत. सध्या त्यांचे काम गेल्याने मालकाने त्यांना वाऱ्यावर सोडले आहे. त्यांच्याकडे शिधापत्रिका नसल्याने त्यांना शासनाकडून पुरेसे स्वस्त धान्य मिळण्याची शक्यताही मावळली आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ ओढवली आहे.कोराडी वीज केंद्राच्या मागच्या भागाला मोठ्या प्रमाणात विटांच्या भट्ट्या आहेत. शिवनी (मध्य प्रदेश), बालाघाट (मध्य प्रदेश), भंडारा व चंद्रपूर जिल्ह्यातील कामगार त्या विटांच्या भट्ट्यांवर काम करीत असून, ते याच परिसरात कुटुंबीयांसह वास्तव्याला आहेत. लॉकडाऊन घोषित झाल्यानंतर काही भट्ट्यांवरील काम बंद करण्यात आले तर काही भट्ट्यांवरील काम अजूनही सुरूच आहे. कामगारांनी मात्र त्यांच्या वास्तव्याचे ठिकाण सोडले नाही. काम बंद झाल्यानंतर मालकांनी कामगारांना सुरुवातीला थोडीफार आर्थिक मदत केली. परंतु, लॉकडाऊनचा काळ वाढविण्यात आल्याने त्यानेही कामगारांकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली.काम बंद असल्याने त्यांना मजुरी मिळत नाही. मालक अतिरिक्त पैसे द्यायला तयार नाही. शिधापत्रिका नसल्याने स्वस्त धान्य दुकानातून धान्य खरेदी करणे शक्य नाही. खिशात पैसे नसताना किराणा दुकानातून महागडे धान्य व इतर जीवनावश्यक साहित्य खरेदी करणेही त्यांच्या आवाक्याबाहेर आहे.स्थानिक मतदारयाद्यांमध्ये नाव नसल्याने राजकीय नेतेही त्यांना मदत द्यायला तयार नाही. ही परिस्थिती कामगाराच्या एका कुटुंबाची नसून एकूण ८० कुटुंबाची आहे. येथे त्यांना खायला काही नाही तर प्रशासन त्यांना त्यांच्या मूळ गावी परत जाण्यास परवानगी देत नाही. त्यामुळे त्या कुटुंबावर उपासमारीची वेळ ओढवली असून, भूकबळीची शक्यता नाकारता येत नाही.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस