शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

विटभट्टी कामगारांवर उपासमारीची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 17:52 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या संचारबंदी आणि लॉकडाऊनचा फटका कोराडी परिसरातील विटांच्या भट्ट्यांवर काम करणाऱ्या कामगारांनाही बसला आहे.

ठळक मुद्देमालकाने सोडले वाऱ्यावरशिधापत्रिका नसल्याने धान्यही मिळेना

दिनकर ठवळे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या संचारबंदी आणि लॉकडाऊनचा फटका कोराडी परिसरातील विटांच्या भट्ट्यांवर काम करणाऱ्या कामगारांनाही बसला आहे. सदर कामगार दुसऱ्या जिल्ह्यातून येथे उपजीविकेसाठी आले आहेत. सध्या त्यांचे काम गेल्याने मालकाने त्यांना वाऱ्यावर सोडले आहे. त्यांच्याकडे शिधापत्रिका नसल्याने त्यांना शासनाकडून पुरेसे स्वस्त धान्य मिळण्याची शक्यताही मावळली आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ ओढवली आहे.कोराडी वीज केंद्राच्या मागच्या भागाला मोठ्या प्रमाणात विटांच्या भट्ट्या आहेत. शिवनी (मध्य प्रदेश), बालाघाट (मध्य प्रदेश), भंडारा व चंद्रपूर जिल्ह्यातील कामगार त्या विटांच्या भट्ट्यांवर काम करीत असून, ते याच परिसरात कुटुंबीयांसह वास्तव्याला आहेत. लॉकडाऊन घोषित झाल्यानंतर काही भट्ट्यांवरील काम बंद करण्यात आले तर काही भट्ट्यांवरील काम अजूनही सुरूच आहे. कामगारांनी मात्र त्यांच्या वास्तव्याचे ठिकाण सोडले नाही. काम बंद झाल्यानंतर मालकांनी कामगारांना सुरुवातीला थोडीफार आर्थिक मदत केली. परंतु, लॉकडाऊनचा काळ वाढविण्यात आल्याने त्यानेही कामगारांकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली.काम बंद असल्याने त्यांना मजुरी मिळत नाही. मालक अतिरिक्त पैसे द्यायला तयार नाही. शिधापत्रिका नसल्याने स्वस्त धान्य दुकानातून धान्य खरेदी करणे शक्य नाही. खिशात पैसे नसताना किराणा दुकानातून महागडे धान्य व इतर जीवनावश्यक साहित्य खरेदी करणेही त्यांच्या आवाक्याबाहेर आहे.स्थानिक मतदारयाद्यांमध्ये नाव नसल्याने राजकीय नेतेही त्यांना मदत द्यायला तयार नाही. ही परिस्थिती कामगाराच्या एका कुटुंबाची नसून एकूण ८० कुटुंबाची आहे. येथे त्यांना खायला काही नाही तर प्रशासन त्यांना त्यांच्या मूळ गावी परत जाण्यास परवानगी देत नाही. त्यामुळे त्या कुटुंबावर उपासमारीची वेळ ओढवली असून, भूकबळीची शक्यता नाकारता येत नाही.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस