शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
2
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
3
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
4
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
5
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
6
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
9
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
10
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
11
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
12
जामीन मिळाल्यानंतरही तरुंगातच राहिला आरोपी; आता सरकार देणार 'इतकी' नुकसान भरपाई!
13
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
14
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या
15
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
16
समुद्री महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजगाचा मृत्यू
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
T20I Powerplay New Rule : आता असा ठरवण्यात येणार 'पॉवर प्ले'चा खेळ! जाणून घ्या नवा नियम

‘त्या’ वाघिणींच्या सुटकेला पुन्हा ब्रेक

By admin | Updated: April 25, 2016 02:49 IST

मागील सात वर्षांपासून वन विभागाच्या पिंजऱ्यात कैद असलेल्या पेंच येथील दोन वाघिणींच्या सुटकेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

वन अधिकाऱ्यांमध्ये शीतयुद्ध : वन विभागाच्या पिंजऱ्यात सात वर्षांपासून कैदनागपूर : मागील सात वर्षांपासून वन विभागाच्या पिंजऱ्यात कैद असलेल्या पेंच येथील दोन वाघिणींच्या सुटकेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, या वाघिणींच्या सुटकेसाठी स्वत: राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांनी पुढाकार घेऊन, तज्ज्ञांची समिती स्थापन केली आहे. परंतु त्याचवेळी वन विभागातील दुसरा एक गट या वाघिणींना सोडण्यास छुपा विरोध करीत आहे. त्यामुळे वरिष्ठ वन अधिकाऱ्यांमधील या शीतयुद्धात त्या निर्दोष वाघिणींचे अर्धे आयुष्य पिंजऱ्यात निघून गेले आहे. जाणकारांच्या मते, सध्या पेंच व्याघ्र प्रकल्पातील एन्क्लोजरमध्ये कैद असलेल्या या वाघिणींचे वय सात ते आठ वर्षे झाले आहे. दुसरीकडे जंगलातील कोणत्याही वाघाचे आयुष्य १४ ते १५ वर्षे समजल्या जाते. त्यानुसार या दोन्ही वाघिणींचे अर्धे आयुष्य झाले आहे. अशा स्थितीत त्यांना जंगलात सोडले, तर त्या पोट भरण्यासाठी जंगलात शिकार करू शकतील का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे, कोणत्याही वाघाचा बछडा हा लहानपणी आपल्या आईकडून शिकारीची कला आत्मसात करीत असतो. परंतु या दोन्ही वाघिणी लहानपणापासून आपल्या आईसोबत राहिल्याच नाही. त्यांचे संपूर्ण बालपण वन विभागाच्या पिंजऱ्यातच गेले आहे. त्यामुळे त्यांच्यातील शिकार कौशल्यावरसुद्धा शंका व्यक्त केली जात आहे. पेंच व्याघ्र प्रकल्प कार्यालयाने यापैकी एका वाघिणीला पेंचच्या जंगलात सोडण्याचा प्रयोग केला होता. परंतु २०-२२ दिवसानंतर त्या वाघिणीला पुन्हा पिंजऱ्यात घ्यावे लागले होते. वन अधिकाऱ्यांच्या मते, ती वाघीण जंगलाशेजारच्या गावाकडे जात होती. शिवाय तिने कोणतीही शिकार केली नव्हती. त्यामुळे तिला पुन्हा पिंजऱ्यात घेऊन, त्यानंतर वाघिणींना जंगलात सोडण्याचा मुद्दा हा कायमचा थंडबस्त्यात पडला होता. परंतु श्री भगवान यांनी राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) पदाचा कार्यभार स्वीकारताच पुन्हा या वाघिणींना जंगलात सोडण्याची चर्चा सुरू झाली. शिवाय काहीच दिवसांत श्री भगवान यांनी एपीसीसीएफ रामबाबू यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समितीसुद्धा स्थापन केली. या समितीने मागील काही दिवसांपूर्वी पेंंच येथे भेट देऊन त्या दोन्ही वाघिणींची पाहणी केली. शिवाय इतरही गोष्टींचे निरीक्षण केले. यानंतर समितीच्या सर्व सदस्यांची बैठक घेऊन, वाघिणींना सोडण्याच्या मुद्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. मात्र त्यावर सदस्यांचे एकमत होऊ न शकल्याने,वाघिणींच्या सुटकेला ‘ब्रेक’ लागला आहे. (प्रतिनिधी)