शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

एप्रिलचा विक्रम मोडला

By admin | Updated: April 22, 2016 04:43 IST

वाढत्या तापमानातील उष्ण लाटांमुळे उपराजधानीतील संपूर्ण जनजीवन होरपळून निघाले आहे. त्यातच गुरुवारी

नागपूर : वाढत्या तापमानातील उष्ण लाटांमुळे उपराजधानीतील संपूर्ण जनजीवन होरपळून निघाले आहे. त्यातच गुरुवारी नागपुरातील तापमानाने मागील पाच वर्षांतील एप्रिल महिन्यामधील सर्वोच्च तापमानाचा विक्रम मोडीत काढून ४५ अंश सेल्सिअसचा टप्पा गाठला आहे. यामुळे माणसांसह पशु-पक्ष्यांच्या जीवाची लाही-लाही होऊ लागली आहे. शिवाय संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. गुरुवारचा दिवस हा नागपूरकरांसाठी यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वांत ‘हॉट’ राहिला आहे. हवामान खात्याच्या आकडेवारीनुसार यापूर्वी गत ३० एप्रिल २००९ रोजी नागपुरातील तापमान ४७.१ अंशावर पोहोचले होते. त्यानंतर दुसऱ्या वर्षी म्हणजे, १७ एप्रिल २०१० रोजी सर्वोच्च तापमान ४५.२ अंश सेल्सिअस राहिले होते. मात्र यानंतर मागील पाच वर्षांत एप्रिल महिन्यातील तापमान कधीच ४५ अंशावर गेले नाही. परंतु गुरुवारी तब्बल पाच वर्षानंतर पुन्हा नागपुरातील तापमान ४५ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. विशेष म्हणजे, गुरुवारी सकाळपासूनच सूर्य आग ओकत होता. पाहता-पाहता दुपारी १२ वाजता रखरखत्या उन्हाचे चटके बसू लागले. यामुळे शहरातील सर्व रस्ते निर्मनुष्य झाले होते. जिकडे-तिकडे शुकशुकाट दिसून येत होता. हा सर्व परिणाम ४५ अंश सेल्सिअसचा होता. यामुळे दिवसभर संपूर्ण शहरात उन्हाचीच चर्चा होती. प्रत्येक जण आजचे कमाल तापमान किती ते जाणून घेण्यासाठी उत्सुक दिसून येत होता. त्यामागील कारणही तसेच होते, तापमानाने पाच वर्षांचा विक्रम मोडला होता.हे करा....भर उन्हात उघड्या डोळ्यांनी जाऊ नका, टोपी घालून किंवा ‘अ‍ॅण्टी रिप्लेक्शन कोटींग’ असलेले गॉगल्स वापरा.तीनवेळा डोळे थंड पाण्याने धुवा.भरपूर मात्रेत पाणी प्या.सकाळी व्यायाम करा.‘व्हिटॅमिन ए’असलेले पदार्थ जसे दूध, गाजर, पपई, आंबा, अंडे, मासे याचे सेवन करा.‘कोल्ड्रिंक’पेक्षा निंबू पाणी प्या, यामुळे ‘व्हिटॅमिन सी’ मिळेल.