शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

ध्वनी-वायू प्रदूषणामुळे मेंदूला इजा  : डॉक्टरांचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2021 22:10 IST

Noise-air pollution Brain injury, nagpur news मेंदू खूप नाजूक असतो. त्याला वायुप्रदूषण, ध्वनिप्रदूषणामुळे इजा पोहोचू शकते. डास, कुत्री यांच्यामुळे होणाऱ्या आजारांचाही मेंदूवर परिणाम होतो.

ठळक मुद्देमेंदू आरोग्य दिन

लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर : मेंदू खूप नाजूक असतो. त्याला वायुप्रदूषण, ध्वनिप्रदूषणामुळे इजा पोहोचू शकते. डास, कुत्री यांच्यामुळे होणाऱ्या आजारांचाही मेंदूवर परिणाम होतो. रस्ते अपघातामुळे मेंदूला दुखापत होऊन जीव जाण्याची धोकाही असतो. या सर्व गोष्टी टाळल्या जाऊ शकतात व मेंदूला निरोगी ठेवले जाऊ शकते, असे मत मेंदूरोग तज्ज्ञांनी व्यक्त केले.

‘डब्ल्यूएफएन’च्या ‘ट्रॉपिकल अ‍ँड जिओग्राफीकल न्यूरोलॉजी स्पेशलिटी ग्रुप वर्ल्ड फेडरेशन ऑफ न्यूरोलॉजी व इंडियन अ‍ॅकेडमी ऑफ न्यूरोलॉजी’ यांच्या संयुक्त विद्यमाने मेंदू आरोग्य दिनानिमित्त आभासी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. ‘इंडियन अ‍ॅकेडमी ऑफ न्यूरोलॉजी’चे अध्यक्ष डॉ. जेएमके मूर्ती यांच्या हस्ते उद्घाटन झाले.

यावेळी मुंबईचे ज्येष्ठ न्यूरोलॉजिस्ट डॉ.सरोश कत्रक म्हणाले, शरीरातील प्रत्येक अवयव संचालित करण्याचे काम मेंदू करतोच, शिवाय, भाषा, संवाद, स्मृती, व्यक्तिमत्त्व, कल्पक विचार, भावनांचे नियंत्रणदेखील मेंदूद्वारे केले जाते. चेन्नई ‘आयएएन’चे सचिव डॉ. यू. मीनाक्षीसुंदरम् म्हणाल्या, मेंदू हा पाॅवर स्टेशन आहे. तेथून करंट निघाला, तर शरीर संचालित होते. डोकेदुखी, स्ट्रोक, एपिलिप्सी असे अनेक मेंदूशी संबंधित आजार असून, त्यावर उपचार करण्याचे काम न्यूरोलॉजिस्ट करतो. हैदराबादचे ज्येष्ठ न्यूरोलॉजिस्ट व स्ट्रोक विशेषज्ञ डॉ. सुभाष कौल म्हणाले, मेंदूला बाह्य कारणांसोबत मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग, थायरॉइड या अंतर्गत समस्यांमुळेदेखील मेंदूला दुखापत होऊ शकते.

 दोन जेवणाच्या वेळांमध्ये आठ तासांचे अंतर हवे

राष्ट्रीय संयोजक डॉ. चंद्रशेखर मेश्राम म्हणाले, आपण जेव्हा जेव्हा खातो तेव्हा मेंदूतून इन्सुलिन प्रसवते. त्यामुळे शरीरातील ग्लुकोजचे प्रमाण वाढते. त्यातून शरीरात फॅट्स वाढतात. दोन जेवणाची वेळांमध्ये किमान ८ ते ९ तासांचे, तर उपवासाच्या वेळांमध्ये किमान १५ ते १६ तासांचे अंतर असले पाहिजे. परंतु, हे करताना डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.

दुपारी १२ नंतर कॉफी, सायंकाळी ५ नंतर चहा घेऊ नये

मानसोपचारतज्ज्ञ डॉ. सुधीर भावे म्हणाले, झोप मेंदूसाठी फार आवश्यक आहे. चांगल्या झोपेसाठी दुपारी १२ नंतर कॉफी आणि सायंकाळी ५ नंतर चहा घेऊ नये. झोपताना विचार करू नये. चांगली झोप यावी, यासाठी वातावरण निर्मिती करावी, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Healthआरोग्यdoctorडॉक्टर