शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
6
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
7
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
8
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
9
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
10
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
11
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
12
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
13
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
15
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
16
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
17
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
18
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
19
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
20
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा-काँग्रेस दोन्ही शेतकरी विरोधी

By admin | Updated: May 3, 2015 02:15 IST

गेल्या ६० वर्षापर्यंत काँग्रेसने राज्य केले. आता मोदींच्या नेतृत्वात भाजपची सत्ता आहे.

नागपूर : गेल्या ६० वर्षापर्यंत काँग्रेसने राज्य केले. आता मोदींच्या नेतृत्वात भाजपची सत्ता आहे. दोन्ही पक्ष आम्ही वेगळे असल्याचे नाटक करीत असले तरी ते एक आहेत. एक सापनाथ तर दुसरा नागनाथ आहे. एकाच शिक्क्याचे दोन भाग आहेत. काँग्रेस व भाजप दोन्ही शेतकरी व बहुजन विरोधी असून त्यांच्या लुटारु धोरणामुळे शेतकरी आणि दलित, बहुजन समाज त्रस्त झाला आहे. या देशात केवळ भाजपा, संघ आणि उद्योगपतींचेच चांगले दिवस आले असून देशातील सामान्य नागरिकांचे मात्र वाईट दिवस सुरू झाले आहेत, अशी टीका बसपाचे राष्ट्रीय महासचिव खा. वीरसिंह यांनी शनिवारी जाहीरपणे केली. केंद्र सरकारच्या भूमी अधिग्रहण विधेयक आणि राज्य सरकारच्या जनविरोधी धोरणाच्या विरोधात बहुजन समाज पार्टीतर्फे राष्ट्रीय स्तरावर धरणे निदर्शनांचे अभियान राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत शनिवारी संविधान चौकात धरणे आंदोलन करण्यात आले. त्यावेळी खा. वीरसिंह हे मुख्य वक्ते म्हणून बोलत होते. ते म्हणाले, भाजपाने निवडणुकीपूर्वी दिलेल्या घोषणा पोकळ असल्याचे लोकांना समजले आहे. त्यामुळेच नुकत्याच पार पडलेल्या मनपा व नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये वाडी व औरंगाबादेत लोकांनी भाजपाला नाकारले आहे. याप्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष कृष्णा बेले, प्रदेश सचिव हरीश बेलेकर, रमेश जनबंधू, अहमद कादर, उत्तम शेवडे, दादाराव उईके, प्रभाकर गेडाम, झेड.आर. दुधकुंवर, प्रेम रोडेकर, दत्तराव धांडे, नाना देवगडे आदींनीही मार्गदर्शन केले. यावेळी विवेक हाडके, राजेंद्र पडोळे, कविता लांडगे, संजय जयस्वाल, महेश सहारे, गौतम पाटील, सागर डबरासे, जितेंद्र घोडेस्वार, योगेश लांजेवार, तपेश पाटील उपस्थित होते. राजकुमार बोरकर यांनी प्रास्ताविक केले. प्रा. भाऊ गोंडाणे यांनी संचालन केले. नागोराव जयकर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)