शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

भाजपा-काँग्रेस दोन्ही शेतकरी विरोधी

By admin | Updated: May 3, 2015 02:15 IST

गेल्या ६० वर्षापर्यंत काँग्रेसने राज्य केले. आता मोदींच्या नेतृत्वात भाजपची सत्ता आहे.

नागपूर : गेल्या ६० वर्षापर्यंत काँग्रेसने राज्य केले. आता मोदींच्या नेतृत्वात भाजपची सत्ता आहे. दोन्ही पक्ष आम्ही वेगळे असल्याचे नाटक करीत असले तरी ते एक आहेत. एक सापनाथ तर दुसरा नागनाथ आहे. एकाच शिक्क्याचे दोन भाग आहेत. काँग्रेस व भाजप दोन्ही शेतकरी व बहुजन विरोधी असून त्यांच्या लुटारु धोरणामुळे शेतकरी आणि दलित, बहुजन समाज त्रस्त झाला आहे. या देशात केवळ भाजपा, संघ आणि उद्योगपतींचेच चांगले दिवस आले असून देशातील सामान्य नागरिकांचे मात्र वाईट दिवस सुरू झाले आहेत, अशी टीका बसपाचे राष्ट्रीय महासचिव खा. वीरसिंह यांनी शनिवारी जाहीरपणे केली. केंद्र सरकारच्या भूमी अधिग्रहण विधेयक आणि राज्य सरकारच्या जनविरोधी धोरणाच्या विरोधात बहुजन समाज पार्टीतर्फे राष्ट्रीय स्तरावर धरणे निदर्शनांचे अभियान राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत शनिवारी संविधान चौकात धरणे आंदोलन करण्यात आले. त्यावेळी खा. वीरसिंह हे मुख्य वक्ते म्हणून बोलत होते. ते म्हणाले, भाजपाने निवडणुकीपूर्वी दिलेल्या घोषणा पोकळ असल्याचे लोकांना समजले आहे. त्यामुळेच नुकत्याच पार पडलेल्या मनपा व नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये वाडी व औरंगाबादेत लोकांनी भाजपाला नाकारले आहे. याप्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष कृष्णा बेले, प्रदेश सचिव हरीश बेलेकर, रमेश जनबंधू, अहमद कादर, उत्तम शेवडे, दादाराव उईके, प्रभाकर गेडाम, झेड.आर. दुधकुंवर, प्रेम रोडेकर, दत्तराव धांडे, नाना देवगडे आदींनीही मार्गदर्शन केले. यावेळी विवेक हाडके, राजेंद्र पडोळे, कविता लांडगे, संजय जयस्वाल, महेश सहारे, गौतम पाटील, सागर डबरासे, जितेंद्र घोडेस्वार, योगेश लांजेवार, तपेश पाटील उपस्थित होते. राजकुमार बोरकर यांनी प्रास्ताविक केले. प्रा. भाऊ गोंडाणे यांनी संचालन केले. नागोराव जयकर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)