शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
3
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
4
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
5
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
6
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
7
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
8
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
9
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
10
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
11
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
12
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
13
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
14
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
15
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
16
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
17
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
18
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
19
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
20
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज

भाजपा-काँग्रेस दोन्ही शेतकरी विरोधी

By admin | Updated: May 3, 2015 02:15 IST

गेल्या ६० वर्षापर्यंत काँग्रेसने राज्य केले. आता मोदींच्या नेतृत्वात भाजपची सत्ता आहे.

नागपूर : गेल्या ६० वर्षापर्यंत काँग्रेसने राज्य केले. आता मोदींच्या नेतृत्वात भाजपची सत्ता आहे. दोन्ही पक्ष आम्ही वेगळे असल्याचे नाटक करीत असले तरी ते एक आहेत. एक सापनाथ तर दुसरा नागनाथ आहे. एकाच शिक्क्याचे दोन भाग आहेत. काँग्रेस व भाजप दोन्ही शेतकरी व बहुजन विरोधी असून त्यांच्या लुटारु धोरणामुळे शेतकरी आणि दलित, बहुजन समाज त्रस्त झाला आहे. या देशात केवळ भाजपा, संघ आणि उद्योगपतींचेच चांगले दिवस आले असून देशातील सामान्य नागरिकांचे मात्र वाईट दिवस सुरू झाले आहेत, अशी टीका बसपाचे राष्ट्रीय महासचिव खा. वीरसिंह यांनी शनिवारी जाहीरपणे केली. केंद्र सरकारच्या भूमी अधिग्रहण विधेयक आणि राज्य सरकारच्या जनविरोधी धोरणाच्या विरोधात बहुजन समाज पार्टीतर्फे राष्ट्रीय स्तरावर धरणे निदर्शनांचे अभियान राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत शनिवारी संविधान चौकात धरणे आंदोलन करण्यात आले. त्यावेळी खा. वीरसिंह हे मुख्य वक्ते म्हणून बोलत होते. ते म्हणाले, भाजपाने निवडणुकीपूर्वी दिलेल्या घोषणा पोकळ असल्याचे लोकांना समजले आहे. त्यामुळेच नुकत्याच पार पडलेल्या मनपा व नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये वाडी व औरंगाबादेत लोकांनी भाजपाला नाकारले आहे. याप्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष कृष्णा बेले, प्रदेश सचिव हरीश बेलेकर, रमेश जनबंधू, अहमद कादर, उत्तम शेवडे, दादाराव उईके, प्रभाकर गेडाम, झेड.आर. दुधकुंवर, प्रेम रोडेकर, दत्तराव धांडे, नाना देवगडे आदींनीही मार्गदर्शन केले. यावेळी विवेक हाडके, राजेंद्र पडोळे, कविता लांडगे, संजय जयस्वाल, महेश सहारे, गौतम पाटील, सागर डबरासे, जितेंद्र घोडेस्वार, योगेश लांजेवार, तपेश पाटील उपस्थित होते. राजकुमार बोरकर यांनी प्रास्ताविक केले. प्रा. भाऊ गोंडाणे यांनी संचालन केले. नागोराव जयकर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)