शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
2
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
3
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
4
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
5
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
6
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
7
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
8
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
9
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
10
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
11
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
12
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
13
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
14
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
15
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
16
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
17
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
18
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
19
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
20
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!

बोअरवेल फ्लशिंगमुळे आठ कोटीची बचत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:08 IST

नागपूर : टंचाईच्या काळात मोठ्या प्रमाणात बोअरवेल खोदल्या जातात. परंतु नागपूर जिल्हा परिषदेने गेल्या दोन वर्षापासून नवीन बोअरवेलची कामे ...

नागपूर : टंचाईच्या काळात मोठ्या प्रमाणात बोअरवेल खोदल्या जातात. परंतु नागपूर जिल्हा परिषदेने गेल्या दोन वर्षापासून नवीन बोअरवेलची कामे न करता जुन्याच व बंद पडलेल्या बोअरवेलला पुनरुज्जीवित करण्याचा कार्यक्रम राबविला आहे. त्यामुळे गेल्या दोन वर्षापासून शासनाचे टंचाईच्या कामावर खर्च होणारे सात ते आठ कोटी रुपयांची बचत झाल्याची माहिती जि.प. अध्यक्ष रश्मी बर्वे यांनी पत्रपरिषदेत दिली.

बर्वे म्हणाल्या की, शासनामार्फत बोअरवेल उभारणी व त्याची देखभाल-दुरुस्ती कार्यक्रम १९७२ पासून राबविण्यात येत आहे. परंतु कालांतराने काही बोअरवेल पूर्ण कार्यक्षम राहत नाही. त्यामध्ये पाण्याची आवक क्षमता कमी होणे, गाळ जमा होणे, झाडांची मुळे, दगड, माती, वाळू इत्यादीमुळे बोअरवेल बुजणे त्याचप्रमाणे ढासळल्यामुळे खोली कमी होणे, या कारणांमुळे अनेक बोअरवेल बंद अवस्थेत होत्या. तर ग्रामपंचायतीच्या रेकॉर्डवर असून उपयोगात नसल्याने वाढत्या लोकसंख्येच्या अनुषंगाने नवीन बोअरवेल मंजुरीसाठी अडचणी येत होत्या. त्यामुळे बऱ्याच गावात पाणीटंचाईची समस्या निर्माण होत होती. निधीच्या कमतरतेमुळे व इतर तांत्रिक कारणांमुळे दरवर्षी नवीन बोअरवेल खोदणे अडचणीचे होते. त्यावर सीएसआर फंडातून बोअरवेल फ्लशिंग या अभिनव उपक्रमाची सुरुवात सावनेर विधानसभा क्षेत्रांतर्गत कळमेश्वर तालुक्यात ६० गावांमध्ये करण्यात आली. त्यामुळे त्या गावातील बंद असलेल्या बोअरवेल फ्लशिंग करून अत्यंत कमी खर्चात पुन्हा सुरू करण्यात आल्या. विशेष म्हणजे नवीन बोअरवेल खोदण्याकरिता जवळपास दीड लाखाचा खर्च अपेक्षित असून, फ्लशिंगसाठी जास्तीतजास्त अंदाजे ३० ते ३५ हजार रुपये खर्च येतो. त्यामुळे शासनाची मोठी बचत झाली. पत्रपरिषदेला सभापती भारती पाटील, तापेश्वर वैद्य, माजी उपाध्यक्ष मनोहर कुंभारे उपस्थित होते.

- यंदा ११०० बंद पडलेल्या बोअरवेलचे होणार फ्लशिंग

यंदा टंचाई आराखड्यात १०० नवीन बोअरवेल खोदण्याची मंजुरी आहे. परंतु, त्यापेक्षा कमी खोदल्या जाणार असून, ११०० बोअरवेलचे फ्लशिंग करण्याचे लक्ष्य असल्याची माहिती यांत्रिकी विभागाचे उपअभियंता नीलेश मानकर यांनी दिली.