शहरं
Join us  
Trending Stories
1
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
2
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
3
"खू्प कर्ज झालंय..."; सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय?
4
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
5
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
6
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!
7
ऑनलाईन App वरुन ऑर्डर केलं जेवण अन् डिलिव्हरी बॉयच्याच पडली प्रेमात, आता केलं लग्न
8
अष्टविनायक चित्रपटातील साधीभोळी गणेशभक्त वीणा आता दिसते अशी, अनेक वर्षे होती चित्रपटांपासून दूर
9
"सूनेने गोळी मारून हत्या केली, माझा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता"; तीन महिन्यातच पतीची हत्या
10
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
11
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
12
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
13
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
14
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
15
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
16
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
17
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
18
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
19
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
20
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता

जग बदलण्याची इच्छा निर्माण करतात पुस्तके : डॉ. नीलिमा चौहान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2019 01:12 IST

पुस्तकांमुळे जग बदलण्याची इच्छा आणि शक्ती निर्माण करण्याची क्षमता असते, असे मत दिल्ली विश्वविद्यालयाच्या झाकीर हुसैन दिल्ली कॉलेज (सायं.) च्या सहायक प्राध्यापक व लेखिका डॉ. नीलिमा चौहान यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्दे‘कलम : अपनी भाषा, अपने लोग’ कार्यक्रमात मांडले विचारप्रभा खेतान फाऊंडेशनचा उपक्रम, लोकमत व अहसास वूमन ऑफ नागपूरचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पुस्तकांमुळे जग बदलण्याची इच्छा आणि शक्ती निर्माण करण्याची क्षमता असते, असे मत दिल्ली विश्वविद्यालयाच्या झाकीर हुसैन दिल्ली कॉलेज (सायं.) च्या सहायक प्राध्यापक व लेखिका डॉ. नीलिमा चौहान यांनी व्यक्त केले.प्रभा खेतान फाऊंडेशनच्यावतीने ‘कलम : अपनी भाषा अपने लोग’ या उपक्रमांतर्गत लोकमत आणि अहसास वूमन ऑफ नागपूर यांच्यावतीने हॉटेल रेडिसन ब्ल्यू येथे आयोजित लेखक-पाठक संवाद कार्यक्रमात त्या बोलत होत्या. समाजातील स्त्रियांच्या अवस्थेबाबत त्यांनी रोखठोक विचार मांडले. महिलांना कौटुंबिक आणि नोकरीपेशा अशा वर्गात विभाजित करणे योग्य नाही. महिलांना स्वातंत्र्य नाही तर बरोबरीचा दर्जा हवा आहे. सर्वत्र एक ठरलेली चौकट आहे. याच चौकटीच्या मर्यादेत लेखन व कार्य करण्याची स्वतंत्रता आहे. मात्र ही चौकट तोडून बाहेर पडले की विरोध सुरू होतो. याला विरोध करणाऱ्यांच्या विरोधात संघर्ष करावा लागेल, मनातील भावना पुस्तकात मांडाव्या लागतील, असे विचार डॉ. चौहान यांनी यावेळी व्यक्त केले.अहसास वूमन ऑफ नागपूरच्या सदस्या नीता सिंह यांच्या विविध प्रश्नांना डॉ. चौहान यांनी उत्तर दिले. संचालन परवीन तुली यांनी केले. हॉटेल रेडिसन ब्ल्यूचे सहायक महाप्रबंधक विकास पाल यांनी लेखिकेचा सत्कार केला. यानंतर त्यांनी ‘आफिशियली पतनशील’ हे त्यांचे पुस्तक वाचकांना समर्पित केले. आयोजनात अहसास वूमन ऑफ नागपूरच्या प्रियंका कोठारी, ज्योती कपूर, मोनिका भगवागर आदींचा सहभाग होता.कोणतेही चांगले पुस्तक हे सामूहिक कर्म असते. एखादा धागा या रचनात्मक निर्मितीचे कारण ठरतो. ‘कलम’चे चर्चासत्र रोखठोक आणि माहितीने परिपूर्ण ठरले.प्रियंका कोठारीआजच्या चर्चासत्रात महिलांचे प्रश्न आणि विशेषत: लैंगिकतेच्या विषयावर सविस्तर चर्चा झाली. यामध्ये मनातील अनेक कुतूहलांचे उत्तर मिळाले. डॉ. चौहान यांनी परिपूर्ण मार्गदर्शन केले.परवीन तुलीचर्चासत्रात डॉ. चौहान यांनी रोखठोकपणे आपले विचार मांडले. महिलांच्या स्थितीबाबत खूप कमी लोक खुल्या मनाने लेखन करू शकतात. हे चर्चासत्र ऊर्जा प्रदान करणारे ठरले.नीता सिंहडॉ. चौहान यांनी अतिशय संवेदनशील विषयावर विचार मांडले. प्रत्येक महिन्याला ‘कलम’चा हा कार्यक्रम होतो. समाजातील अशा विविध विषयांवर चर्चा करणे हा प्रशंसनीय उपक्रम आहे.विकास पाल

टॅग्स :literatureसाहित्यnagpurनागपूर