शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
2
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
3
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
4
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
5
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
6
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
7
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
8
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
9
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
10
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
11
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
12
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
13
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
14
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
15
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
16
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
17
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
18
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
19
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
20
विशेष लेख: ढिसाळ रेल्वे, बेदरकार प्रवासी हेच जबाबदार!

जग बदलण्याची इच्छा निर्माण करतात पुस्तके : डॉ. नीलिमा चौहान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2019 01:12 IST

पुस्तकांमुळे जग बदलण्याची इच्छा आणि शक्ती निर्माण करण्याची क्षमता असते, असे मत दिल्ली विश्वविद्यालयाच्या झाकीर हुसैन दिल्ली कॉलेज (सायं.) च्या सहायक प्राध्यापक व लेखिका डॉ. नीलिमा चौहान यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्दे‘कलम : अपनी भाषा, अपने लोग’ कार्यक्रमात मांडले विचारप्रभा खेतान फाऊंडेशनचा उपक्रम, लोकमत व अहसास वूमन ऑफ नागपूरचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पुस्तकांमुळे जग बदलण्याची इच्छा आणि शक्ती निर्माण करण्याची क्षमता असते, असे मत दिल्ली विश्वविद्यालयाच्या झाकीर हुसैन दिल्ली कॉलेज (सायं.) च्या सहायक प्राध्यापक व लेखिका डॉ. नीलिमा चौहान यांनी व्यक्त केले.प्रभा खेतान फाऊंडेशनच्यावतीने ‘कलम : अपनी भाषा अपने लोग’ या उपक्रमांतर्गत लोकमत आणि अहसास वूमन ऑफ नागपूर यांच्यावतीने हॉटेल रेडिसन ब्ल्यू येथे आयोजित लेखक-पाठक संवाद कार्यक्रमात त्या बोलत होत्या. समाजातील स्त्रियांच्या अवस्थेबाबत त्यांनी रोखठोक विचार मांडले. महिलांना कौटुंबिक आणि नोकरीपेशा अशा वर्गात विभाजित करणे योग्य नाही. महिलांना स्वातंत्र्य नाही तर बरोबरीचा दर्जा हवा आहे. सर्वत्र एक ठरलेली चौकट आहे. याच चौकटीच्या मर्यादेत लेखन व कार्य करण्याची स्वतंत्रता आहे. मात्र ही चौकट तोडून बाहेर पडले की विरोध सुरू होतो. याला विरोध करणाऱ्यांच्या विरोधात संघर्ष करावा लागेल, मनातील भावना पुस्तकात मांडाव्या लागतील, असे विचार डॉ. चौहान यांनी यावेळी व्यक्त केले.अहसास वूमन ऑफ नागपूरच्या सदस्या नीता सिंह यांच्या विविध प्रश्नांना डॉ. चौहान यांनी उत्तर दिले. संचालन परवीन तुली यांनी केले. हॉटेल रेडिसन ब्ल्यूचे सहायक महाप्रबंधक विकास पाल यांनी लेखिकेचा सत्कार केला. यानंतर त्यांनी ‘आफिशियली पतनशील’ हे त्यांचे पुस्तक वाचकांना समर्पित केले. आयोजनात अहसास वूमन ऑफ नागपूरच्या प्रियंका कोठारी, ज्योती कपूर, मोनिका भगवागर आदींचा सहभाग होता.कोणतेही चांगले पुस्तक हे सामूहिक कर्म असते. एखादा धागा या रचनात्मक निर्मितीचे कारण ठरतो. ‘कलम’चे चर्चासत्र रोखठोक आणि माहितीने परिपूर्ण ठरले.प्रियंका कोठारीआजच्या चर्चासत्रात महिलांचे प्रश्न आणि विशेषत: लैंगिकतेच्या विषयावर सविस्तर चर्चा झाली. यामध्ये मनातील अनेक कुतूहलांचे उत्तर मिळाले. डॉ. चौहान यांनी परिपूर्ण मार्गदर्शन केले.परवीन तुलीचर्चासत्रात डॉ. चौहान यांनी रोखठोकपणे आपले विचार मांडले. महिलांच्या स्थितीबाबत खूप कमी लोक खुल्या मनाने लेखन करू शकतात. हे चर्चासत्र ऊर्जा प्रदान करणारे ठरले.नीता सिंहडॉ. चौहान यांनी अतिशय संवेदनशील विषयावर विचार मांडले. प्रत्येक महिन्याला ‘कलम’चा हा कार्यक्रम होतो. समाजातील अशा विविध विषयांवर चर्चा करणे हा प्रशंसनीय उपक्रम आहे.विकास पाल

टॅग्स :literatureसाहित्यnagpurनागपूर