शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
4
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
5
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
6
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना कोरा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
7
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
8
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
9
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
10
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
11
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
12
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
13
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
14
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
15
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
16
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
17
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
18
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
19
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
20
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी

बोअरवेलच्या भ्रष्टाचाराची चौक शी

By admin | Updated: May 6, 2015 02:07 IST

जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांना तातडीने पाणीपुरवठा व्हावा, यासाठी उपाययोजना म्हणून ...

नागपूर : जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांना तातडीने पाणीपुरवठा व्हावा, यासाठी उपाययोजना म्हणून १५५९ बोअरवेलच्या कामांना मंजुरी दिली आहे. परंतु यातील जेमतेम ६७ कामे करण्यात आली. ही कामे निकषानुसार नसून यात भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी असल्याने या कामाची चौकशी करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीच्या बैठकीत मंगळवारी घेण्यात आला. या निर्णयामुळे कंत्राटदारांत खळबळ उडाली आहे.उन्हाळ्यात टंचाईग्रस्त गावांना तातडीने पाणीपुरवठा व्हावा यासाठी टंचाई निवारण आराखड्यात २६७ तर अतिरिक्त टंचाई आराखड्यात १०५० बोअरवेलच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्राच्या ठिकाणी बोअरवेलच्या २४२ कामांना मंजुरी देण्यात आली आहे. या कामाची चौकशी होत नसल्याने वर्षभरापूर्वी बोअरवेलच्या कामासाठी कंत्राटदारांच्या उड्या पडत होत्या. त्यांनी कमी दराने कामे घेतली. परंतु यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचे सदस्यांच्या निदर्शनास आले. बोअरवेलसाठी कमी जाडीच्या पाईपचा वापर करण्यात आला. तसेच पाणी नसलेल्या बोअरवेलवर हातपंप बसविण्याचे प्रकार घडले आहे.जिल्ह्यासाठी २० कोटीचा टंचाई निवारण आराखडा मंजूर करण्यात आला आहे. यात प्रामुख्याने बोअरवेलच्या कामांचा समावेश आहे. नळयोजनांची दुरुस्ती, विंधन विहिरीची दुरुस्ती, तात्पुरत्या पूरक नळ योजना व टँकरद्वारे पाणीपुरवठा अशा स्वरुपाच्या उपाययोजनांचा यात समावेश आहे. तसेच ३५०च्या आसपास खासगी विहिरीचे अधिग्रहण केले जाणार आहे. या कामाचा जि.प.अध्यक्ष निशा सावरकर यांनी आढावा घेतला. उपाध्यक्ष शरद डोणेकर, कृषी सभापती आशा गायकवाड, शिक्षण सभापती उकेश चव्हाण, जयकुमार वर्मा, मनोज तितरमारे, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियता संतोष गव्हाणकर यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते.(प्रतिनिधी)पाच कोटींची योजना रखडलीपारशिवनी व इतर पाच गावांना पाणीपुरवठा व्हावा, यासाठी पाच कोटीची योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने हाती घेतली होती. परंतु अद्याप ही योजना कार्यान्वित झालेली नाही. त्य्\ाामुळे नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. दुसरीकडे टंचाईग्रस्त गावात उपाययोजना करण्यासाठी आवश्यक असलेले प्रपत्र अद्याप सादर केले नसल्याने कामे रखडल्याचे मनोज तितरमारे यांनी निदर्शनास आणले. पाणीपुरवठा विभागातील उपअभियंत्याची नऊ रिक्त पदे कंत्राटी पद्धतीने भरल्यास कामे मार्गी लागतील अशी सूचना त्यांनी केली.