शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

बोअरवेलच्या भ्रष्टाचाराची चौक शी

By admin | Updated: May 6, 2015 02:07 IST

जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांना तातडीने पाणीपुरवठा व्हावा, यासाठी उपाययोजना म्हणून ...

नागपूर : जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांना तातडीने पाणीपुरवठा व्हावा, यासाठी उपाययोजना म्हणून १५५९ बोअरवेलच्या कामांना मंजुरी दिली आहे. परंतु यातील जेमतेम ६७ कामे करण्यात आली. ही कामे निकषानुसार नसून यात भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी असल्याने या कामाची चौकशी करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीच्या बैठकीत मंगळवारी घेण्यात आला. या निर्णयामुळे कंत्राटदारांत खळबळ उडाली आहे.उन्हाळ्यात टंचाईग्रस्त गावांना तातडीने पाणीपुरवठा व्हावा यासाठी टंचाई निवारण आराखड्यात २६७ तर अतिरिक्त टंचाई आराखड्यात १०५० बोअरवेलच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्राच्या ठिकाणी बोअरवेलच्या २४२ कामांना मंजुरी देण्यात आली आहे. या कामाची चौकशी होत नसल्याने वर्षभरापूर्वी बोअरवेलच्या कामासाठी कंत्राटदारांच्या उड्या पडत होत्या. त्यांनी कमी दराने कामे घेतली. परंतु यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचे सदस्यांच्या निदर्शनास आले. बोअरवेलसाठी कमी जाडीच्या पाईपचा वापर करण्यात आला. तसेच पाणी नसलेल्या बोअरवेलवर हातपंप बसविण्याचे प्रकार घडले आहे.जिल्ह्यासाठी २० कोटीचा टंचाई निवारण आराखडा मंजूर करण्यात आला आहे. यात प्रामुख्याने बोअरवेलच्या कामांचा समावेश आहे. नळयोजनांची दुरुस्ती, विंधन विहिरीची दुरुस्ती, तात्पुरत्या पूरक नळ योजना व टँकरद्वारे पाणीपुरवठा अशा स्वरुपाच्या उपाययोजनांचा यात समावेश आहे. तसेच ३५०च्या आसपास खासगी विहिरीचे अधिग्रहण केले जाणार आहे. या कामाचा जि.प.अध्यक्ष निशा सावरकर यांनी आढावा घेतला. उपाध्यक्ष शरद डोणेकर, कृषी सभापती आशा गायकवाड, शिक्षण सभापती उकेश चव्हाण, जयकुमार वर्मा, मनोज तितरमारे, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियता संतोष गव्हाणकर यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते.(प्रतिनिधी)पाच कोटींची योजना रखडलीपारशिवनी व इतर पाच गावांना पाणीपुरवठा व्हावा, यासाठी पाच कोटीची योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने हाती घेतली होती. परंतु अद्याप ही योजना कार्यान्वित झालेली नाही. त्य्\ाामुळे नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. दुसरीकडे टंचाईग्रस्त गावात उपाययोजना करण्यासाठी आवश्यक असलेले प्रपत्र अद्याप सादर केले नसल्याने कामे रखडल्याचे मनोज तितरमारे यांनी निदर्शनास आणले. पाणीपुरवठा विभागातील उपअभियंत्याची नऊ रिक्त पदे कंत्राटी पद्धतीने भरल्यास कामे मार्गी लागतील अशी सूचना त्यांनी केली.