शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

कोळसा संकटाचा फटका; वीज उत्पादन आले अर्ध्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2021 19:58 IST

Nagpur News कोळसा संकटामुळे औष्णिक वीज प्रकल्पांना फटका बसण्यास सुरुवात झाली आहे. या केंद्रांमध्ये प्लान्ट लोट फॅक्टरमध्ये १० टक्क्यांची घट झाली आहे.

ठळक मुद्देकेवळ ५,१५३ मेगावॅट विजेचे उत्पादन

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोळसा संकटामुळे औष्णिक वीज प्रकल्पांना फटका बसण्यास सुरुवात झाली आहे. या केंद्रांमध्ये प्लान्ट लोट फॅक्टरमध्ये १० टक्क्यांची घट झाली आहे. यातूनच वीज उत्पादन जवळपास अर्धे झाले आहे. १०,२१२ मेगावॅटची क्षमता असूनदेखील उत्पादन ५,१५३ पर्यंत घटले आहे. यामुळे ५०० मेगावॅट वीज पॉवर एक्सचेंजमधून महागड्या दरात विकत घ्यावी लागत आहे.

महाराष्ट्रातील औष्णिक वीज प्रकल्प संकटाचा सामना करत आहेत. दररोज त्यांचे उत्पादन घटत असून मंगळवारी सायंकाळी हा आकडा ५,१५३ मेगावॅट इतका होता. भुसावळचे युनिट ३, चंद्रपूरचे युनिट ४, नाशिक व पारस येथील युनिट ४ कोळशाच्या कमतरतेमुळे ठप्प झाले आहेत. महाजेनकोच्या अधिकाऱ्यांनी कोळसा खाणीचा दौरा करून अहवाल तयार केला. पावसामुळे कोळसा उत्खननात समस्या येत असल्याचे यात नमूद करण्यात आले आहे. पाऊस थांबल्यानंतरच स्थिती नियंत्रणात येऊ शकेल. दुसरीकडे महावितरणचा ताण वाढला आहे. नवरात्रासोबतच सणांचे दिवस सुरू झाल्यावर विजेची मागणी वाढेल. शिवाय ऑक्टोबर हिटचादेखील सामना करायचा असल्याने विजेचा जास्त वापर होईल. त्यामुळे उत्पादन वाढले नाही तर पुढील आठवड्यापर्यंत वीजसंकट वाढेल.

 

आयात कोळशाचे दर वाढल्याने समस्या

देशात कोळसा संकट असताना आयात करण्यात येणाऱ्या कोळशाचे दर प्रति टन १० डॉलर्सने वाढले आहेत. महाजेनकोचे औष्णिक वीज प्रकल्प आयात कोळशाचा वापर करीत नसले तरी खासगी प्रकल्पात त्यांचा पुरवठा होत आहे. अशास्थितीत खासगी प्रकल्प वीजदर वाढविण्याबाबत विचार करीत आहेत.

टॅग्स :electricityवीज