शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

नागपुरातील रक्ताची मागणी २० टक्के घटली, संकलन ८० टक्के कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2020 23:19 IST

corona Nagpur News कोविड-१९ च्या विपरीत प्रभावामुळे नागपुरातील रक्ताची मागणी २० टक्के घटली आहे. दुसरीकडे रक्ताचे संकलनही ८० टक्के कमी झाले आहे.

ठळक मुद्दे रक्तदान शिबिरांचे उपक्रमही कमीकोविड-१९ चे परिणाम

वसीम कुरैशीलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोविड-१९ च्या विपरीत प्रभावामुळे नागपुरातील रक्ताची मागणी २० टक्के घटली आहे. दुसरीकडे रक्ताचे संकलनही ८० टक्के कमी झाले आहे. याच कारणाने रक्तपेढीतर्फे गरजवंतांना रक्तपुरवठा करताना आधी कुठल्याही रक्तगटाच्या रक्ताची मागणी करीत आहेत. कोविड काळातील निबंर्धामुळे रक्तदान शिबिरांचे आयोजनही कमी झाले आहेत. त्यामुळे आधीसारखे संकलन होत नसल्याने रक्तपेढ्यांजवळही रक्ताचा तुटवडा भासत आहे.संक्रमणाच्या भीतीमुळे सुदृढ लोकही रक्तदान केंद्रामध्ये रक्तदानासाठी जाण्यास धजावत नाही. दुसरीकडे कोण कोविड रुग्ण आहे. या संभ्रमात रक्त संकलनाचे कामही प्रभावित झाले आहे. मात्र यामुळे गरजवंत रुग्णांच्या नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागतो आहे. याबाबत लाईफलाईन ब्लड बँकेचे डॉ. हरीश वरभे यांनी सांगितले, आधी दर महिन्याला शहरात ५० च्यावर रक्तदान शिबिर व्हायचे आणि जवळपास ३००० वर रक्तदाते रक्तदान करायचे. मात्र लॉकडाऊनच्या काळात केवळ ५ रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले, ज्यामध्ये केवळ २० नागरिकांनी रक्तदान केले. थॅलिसिमिया रुग्णांना नेहमी रक्ताची आवश्यकता असते. आमच्या संस्थेने १२९ रुग्ण मुलांना रक्तदानासाठी दत्तक घेतले आहे.कोविड रुग्ण २८ दिवसानंतर करू शकतात रक्तदानकोविड पॉझिटिव्ह रुग्ण बरे झाल्याच्या २८ दिवसानंतर रक्तदान आणि १४ दिवसानंतर प्लाज्मादान करू शकतात. ते १५ दिवसानंतर पुन्हा प्लाज्मा देण्यास सक्षम असतात. एका व्यक्तीकडून मिळालेल्या प्लाज्माने दोन रुग्णांचे प्राण वाचविले जाऊ शकतात. देशात सर्वाधिक सुरक्षित प्लाज्मा तपासणीची (आरबीडी ६४० प्रमाण) व्यवस्था नागपुरातच आहे.- डॉ. हरीश वरभेबॅलेन्स घटलेब्लड बँकेमध्ये आधीच्या तुलनेत रक्ताचे बॅलेन्स कमी झाले आहे. मार्च व एप्रिल महिन्यात महाविद्यालये बंद राहत असल्याने नेहमी रक्त संकलनात घट होते. यावेळी कोविड आणि लॉकडाऊनचाही प्रभाव पडला. महाविद्यालये आतापर्यंत सुरू झालेले नाहीत. या कारणाने रक्तपेढ्यात रक्ताचा तुटवडा आहे. मात्र मागणी केल्यानंतर रक्तपुरवठा करण्यास आतापर्यंत समस्या आलेली नाही.- डॉ. संगीता मेहता, बीटीओ, राज्य रक्त संक्रमण परिषद

 

 

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस