शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
2
पकडले जाण्याच्या भीतीने उमरने उडवली स्फोटकांनी भरलेली कार; पुलवामा हल्ल्याच्या दिवशी विकली गाडी
3
भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक
4
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
5
आजचे राशीभविष्य, ११ नोव्हेंबर २०२५: कामे नक्की पूर्ण होतील, पण 'या' राशीने आळस टाळा !
6
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
7
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
8
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी
9
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
10
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
11
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
12
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
13
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
14
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका
15
निवड समितीसोबतचा पंगा मोहम्मद शमीला भोवणार? कसोटी संघातील पुनरागमन अनिश्चित काळ लांबणीवर जाण्याची शक्यता
16
कंपनीला कर्मचाऱ्यांनीच घातला दीड कोटीचा गंडा, बनावट कॅश व्हाऊचरची छपाई, अतिरिक्त पगार
17
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
18
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
19
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
20
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल

शरिरात रक्त गाेठणे हे तरुणांमधील हृदयघाताचे माेठे कारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:08 IST

मेहा शर्मा लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : काेराेना विषाणूचा संसर्ग हा प्रतिकार शक्तीवर परिणाम करणारा असून, यामुळे रुग्णाच्या शरिरात ...

मेहा शर्मा

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : काेराेना विषाणूचा संसर्ग हा प्रतिकार शक्तीवर परिणाम करणारा असून, यामुळे रुग्णाच्या शरिरात रक्त गाेठण्याचे प्रकार वाढले आहेत. या प्रकारामुळे काेराेना रुग्णांमध्ये हृद्यघाताची शक्यता बळावली आहे. आजारातून बरे झाल्यानंतरही महिन्याभराच्या कालावधीत पाेट किंवा पायामध्ये रक्ताच्या गाठी हाेण्याची शक्यता असते. तरुण रुग्णांमध्येही हृदयघाताचे हे प्रमुख कारण असल्याची माहिती प्रसिद्ध हृदयराेगतज्ज्ञ डाॅ. जसपाल अर्नेजा यांनी दिली. ‘लाेकमत’शी बाेलताना त्यांनी काेराेना महामारी, बरे झाल्यानंतर घेण्याची काळजी व इतर महत्त्वपूर्ण विषयांवर प्रकाश टाकला.

काेराेनाच्या औषधामुळे भविष्यात हृदयावर रिॲक्शन हाेण्याची शक्यता काय?

डाॅक्टर उपचारासाठी तीन प्रकारचे औषध वापरतात. पहिले म्हणजे विषाणूराेधी ‘फॅबिपिरावल’ हे एक ॲन्टिव्हायरल औषध आहे, जे गृह अलगीकरणात असलेल्या रुग्णांना दिले जाते. हाच प्रकार ‘रेमडेसिविर’बाबतही आहे. डब्ल्यूएचओ आणि एम्सनुसार प्रत्येक रुग्णाला ही औषधे देण्याची गरज नाही. ‘एम्स’ने रेमडेसिविरला आरक्षित ड्रग म्हणून ठेवले आहे. हे चमत्कार घडविणारे किंवा सिद्धता असलेले औषध नाही, हे नागरिकांना पटवून देणे गरजेचे आहे. अतिसंसर्ग झालेल्या रुग्णांना पहिल्या ३ ते ५ दिवसात हे औषध दिले तरच त्याचा फायदा मिळू शकताे. या औषधाचे अधिक साईड इफेक्टही नाहीत. दुसरे औषध म्हणजे स्टेराईड पण ते प्रत्येक रुग्णाला देणे शक्य नाही. स्टेराईड त्याच रुग्णांना दिले जाते, जे रुग्णालयात भरती आहेत व ज्यांचा ऑक्सिजन स्तर ९२च्या खाली घसरला आहे. या औषधाने रुग्ण बचावाचा दर वाढवला आहे आणि गुंतागुंतही कमी केली आहे. स्टेराईडमुळे साईड इफेक्ट हाेतात पण एक किंवा दाेन आठवडे या अत्यंत कमी कालावधीसाठी दिले जात असल्याने साईड इफेक्ट हाेण्याची शक्यता कमी आहे. स्टेराईडमुळे मधुमेही असलेले किंवा नसलेल्या रुग्णांचीही शुगर लेव्हल वाढण्याची शक्यता आहे. ते महत्त्वाचे औषध आहे. तिसरे महत्त्वाचे औषध आहे जे रुक्ताच्या गाठी हाेण्यापासून राेखू शकते. रक्तगाठी विरघळवणाऱ्या या औषधाने मृत्यूदरही कमी केला आहे. आम्ही रुग्णाचा ‘डि-डायमर’ स्तर तपासताे. तो वाढला असेल तर रुग्णाला किमान महिनाभरासाठी गाठी विरघळवणारे हे औषध दिले जाते.

रेमडेसिविरवरून घबराट का निर्माण झाली आहे?

साेशल मीडिया आणि वृत्त वाहिन्यांनी विनाकारण गवगवा केल्यानेच रुग्णांकडून रेमडेसिविरची मागणी वाढली आहे. पहिली लाट ओसरताच औषध कंपन्यांनी त्याचे उत्पादन बंद केले. मात्र, पुन्हा एवढ्या माेठ्या प्रमाणात रुग्णवाढ हाेईल, याची अपेक्षाही कुणी केली नव्हती. मात्र, आता उत्पादन वाढविण्यात आले आहे आणि येत्या एक-दाेन आठवड्यात परिस्थिती सुधारेल, असा विश्वास आहे.

नागरिकांचे चक्कर येऊन पडण्याचे व मृत्यू ओढवण्याचे प्रकार का वाढले?

अशा नागरिकांमध्ये रक्तगाठी येण्याचे प्रमाण अधिक असते. वाॅशरुममध्ये ताण दिल्यामुळे पायातील गाठी फुप्फुसाच्या नलिकांमध्ये जातात व अकस्मात मृत्यू येण्याचीही शक्यता असते. याला ‘पल्माेनरी एम्बाॅलिझम’ असे म्हटले जाते. गाठींमुळे हार्ट ॲटॅक येण्याचीही शक्यता आहे.

ऑक्सिजनसाठी एवढा संघर्ष का करावा लागत आहे?

काेराेनाची दुसरी लाट ही त्सुनामीप्रमाणे आली आणि तिच्या प्रभावाचे आकलन करण्यात आपण कमी पडलाे. ऑक्सिजनची गरज एवढ्या माेठ्या प्रमाणात वाढेल, याची अपेक्षाही केली नव्हती. ऑक्सिजनचा पुरवठा वाढविण्यासाठी स्थानिक प्रशासन खूप चांगले काम करत आहे व प्रत्येक रुग्णालयाची गरज भागवली जात आहे.

सध्या आपण काेराेनाच्या काेणत्या परिस्थितीत आहाेत?

सध्या देशात साडेतीन लाख रुग्णसंख्या आहे आणि मेच्या मध्यापर्यंत ५ ते ६ लाखांवर जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर हा ग्राफ खाली येईल.

समस्त लाेकसंख्येचे लसीकरण शक्य आहे?

पुढील वर्षापर्यंत काेराेना जाण्याची शक्यता नाही आणि यावर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीकरण हाच प्रभावी उपाय आहे. सरकारनेही लसीच्या आयातीला परवानगी दिली आहे. दर महिन्याला १० काेटी लस मिळतील आणि देशात ४५ ते ५० काेटी नागरिकांचे लसीकरण शक्य हाेईल. पाेलिओप्रमाणे ही माेहीम राबवावी लागेल.