शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

शरिरात रक्त गाेठणे हे तरुणांमधील हृदयघाताचे माेठे कारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 10:38 IST

Nagpur News काेराेना विषाणूचा संसर्ग हा प्रतिकार शक्तीवर परिणाम करणारा असून, यामुळे रुग्णाच्या शरिरात रक्त गाेठण्याचे प्रकार वाढले आहेत. या प्रकारामुळे काेराेना रुग्णांमध्ये हृद्यघाताची शक्यता बळावली आहे.

ठळक मुद्दे काेराेनातून बरे झाल्यानंतरही काळजी घेण्याची गरज

मेहा शर्मा

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : काेराेना विषाणूचा संसर्ग हा प्रतिकार शक्तीवर परिणाम करणारा असून, यामुळे रुग्णाच्या शरिरात रक्त गाेठण्याचे प्रकार वाढले आहेत. या प्रकारामुळे काेराेना रुग्णांमध्ये हृद्यघाताची शक्यता बळावली आहे. आजारातून बरे झाल्यानंतरही महिन्याभराच्या कालावधीत पाेट किंवा पायामध्ये रक्ताच्या गाठी हाेण्याची शक्यता असते. तरुण रुग्णांमध्येही हृदयघाताचे हे प्रमुख कारण असल्याची माहिती प्रसिद्ध हृदयराेगतज्ज्ञ डाॅ. जसपाल अर्नेजा यांनी दिली. ‘लाेकमत’शी बाेलताना त्यांनी काेराेना महामारी, बरे झाल्यानंतर घेण्याची काळजी व इतर महत्त्वपूर्ण विषयांवर प्रकाश टाकला.

काेराेनाच्या औषधामुळे भविष्यात हृदयावर रिॲक्शन हाेण्याची शक्यता काय?

डाॅक्टर उपचारासाठी तीन प्रकारचे औषध वापरतात. पहिले म्हणजे विषाणूराेधी ‘फॅबिपिरावल’ हे एक ॲन्टिव्हायरल औषध आहे, जे गृह अलगीकरणात असलेल्या रुग्णांना दिले जाते. हाच प्रकार ‘रेमडेसिविर’बाबतही आहे. डब्ल्यूएचओ आणि एम्सनुसार प्रत्येक रुग्णाला ही औषधे देण्याची गरज नाही. ‘एम्स’ने रेमडेसिविरला आरक्षित ड्रग म्हणून ठेवले आहे. हे चमत्कार घडविणारे किंवा सिद्धता असलेले औषध नाही, हे नागरिकांना पटवून देणे गरजेचे आहे. अतिसंसर्ग झालेल्या रुग्णांना पहिल्या ३ ते ५ दिवसात हे औषध दिले तरच त्याचा फायदा मिळू शकताे. या औषधाचे अधिक साईड इफेक्टही नाहीत. दुसरे औषध म्हणजे स्टेराईड पण ते प्रत्येक रुग्णाला देणे शक्य नाही. स्टेराईड त्याच रुग्णांना दिले जाते, जे रुग्णालयात भरती आहेत व ज्यांचा ऑक्सिजन स्तर ९२च्या खाली घसरला आहे. या औषधाने रुग्ण बचावाचा दर वाढवला आहे आणि गुंतागुंतही कमी केली आहे. स्टेराईडमुळे साईड इफेक्ट हाेतात पण एक किंवा दाेन आठवडे या अत्यंत कमी कालावधीसाठी दिले जात असल्याने साईड इफेक्ट हाेण्याची शक्यता कमी आहे. स्टेराईडमुळे मधुमेही असलेले किंवा नसलेल्या रुग्णांचीही शुगर लेव्हल वाढण्याची शक्यता आहे. ते महत्त्वाचे औषध आहे. तिसरे महत्त्वाचे औषध आहे जे रुक्ताच्या गाठी हाेण्यापासून राेखू शकते. रक्तगाठी विरघळवणाऱ्या या औषधाने मृत्यूदरही कमी केला आहे. आम्ही रुग्णाचा ‘डि-डायमर’ स्तर तपासताे. तो वाढला असेल तर रुग्णाला किमान महिनाभरासाठी गाठी विरघळवणारे हे औषध दिले जाते.

रेमडेसिविरवरून घबराट का निर्माण झाली आहे?

साेशल मीडिया आणि वृत्त वाहिन्यांनी विनाकारण गवगवा केल्यानेच रुग्णांकडून रेमडेसिविरची मागणी वाढली आहे. पहिली लाट ओसरताच औषध कंपन्यांनी त्याचे उत्पादन बंद केले. मात्र, पुन्हा एवढ्या माेठ्या प्रमाणात रुग्णवाढ हाेईल, याची अपेक्षाही कुणी केली नव्हती. मात्र, आता उत्पादन वाढविण्यात आले आहे आणि येत्या एक-दाेन आठवड्यात परिस्थिती सुधारेल, असा विश्वास आहे.

नागरिकांचे चक्कर येऊन पडण्याचे व मृत्यू ओढवण्याचे प्रकार का वाढले?

अशा नागरिकांमध्ये रक्तगाठी येण्याचे प्रमाण अधिक असते. वाॅशरुममध्ये ताण दिल्यामुळे पायातील गाठी फुप्फुसाच्या नलिकांमध्ये जातात व अकस्मात मृत्यू येण्याचीही शक्यता असते. याला ‘पल्माेनरी एम्बाॅलिझम’ असे म्हटले जाते. गाठींमुळे हार्ट ॲटॅक येण्याचीही शक्यता आहे.

ऑक्सिजनसाठी एवढा संघर्ष का करावा लागत आहे?

काेराेनाची दुसरी लाट ही त्सुनामीप्रमाणे आली आणि तिच्या प्रभावाचे आकलन करण्यात आपण कमी पडलाे. ऑक्सिजनची गरज एवढ्या माेठ्या प्रमाणात वाढेल, याची अपेक्षाही केली नव्हती. ऑक्सिजनचा पुरवठा वाढविण्यासाठी स्थानिक प्रशासन खूप चांगले काम करत आहे व प्रत्येक रुग्णालयाची गरज भागवली जात आहे.

सध्या आपण काेराेनाच्या काेणत्या परिस्थितीत आहाेत?

सध्या देशात साडेतीन लाख रुग्णसंख्या आहे आणि मेच्या मध्यापर्यंत ५ ते ६ लाखांवर जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर हा ग्राफ खाली येईल.

समस्त लाेकसंख्येचे लसीकरण शक्य आहे?

पुढील वर्षापर्यंत काेराेना जाण्याची शक्यता नाही आणि यावर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीकरण हाच प्रभावी उपाय आहे. सरकारनेही लसीच्या आयातीला परवानगी दिली आहे. दर महिन्याला १० काेटी लस मिळतील आणि देशात ४५ ते ५० काेटी नागरिकांचे लसीकरण शक्य हाेईल. पाेलिओप्रमाणे ही माेहीम राबवावी लागेल.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस