शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मध्य रेल्वेची ठाणे ते सीएसएमटी दरम्यानची वाहतूक पूर्णपणे बंद
2
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
3
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
4
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
5
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
6
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?
7
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
8
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
9
'हिंदुस्तान झिदाबाद...' तिरंग्यासाठी लंडनमध्ये पाकिस्तानींशी भिडल्या भारतीय तरुणी, पाहा VIDEO
10
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...
12
LIC ची मोठी घोषणा! बंद पडलेल्या पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची सुवर्णसंधी; विलंब शुल्कातही मोठी सूट
13
मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी; खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम देण्याच्या सूचना, शाळा, कॉलेज बंद
14
रोनाल्डोचा साखरपुडा आणि सौदीचे ‘रहस्य’! स्थानिकांना वेगळा नियम आणि स्टारला वेगळा न्याय, का?
15
ठाकरे बंधू किंवा महायुती कुणीही निवडणूक जिंकली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का?
16
चिपळुणात वाशिष्ठी नदीने ओलांडली इशारा पातळी; पूरसदृश स्थितीमुळे कामाशिवाय घराबाहेर न पडण्याची सूचना
17
"२६ जुलैचा जलप्रलय, तुम्ही मला...", वीणा जामकरने सांगितली ज्योती चांदेकरांची भावुक आठवण
18
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
19
Pune Traffic: पुण्यात सकाळपासून मुसळधार! शहरात प्रचंड वाहतूककोंडी, प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
20
"झोया अख्तर बड्या बापाची मुलगी...", 'गलीबॉय'साठी ऑडिशन द्यायला सांगितल्याने भडकल्या उषा नाडकर्णी

आंधळ्या वाटेवरचा आंधळा प्रवास आहे .....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 00:42 IST

शब्दागणिक अर्थाचे झाले वाद आहे... आंधळ्या वाटेवरचा आंधळा प्रवास आहे... देवावरील माणसाची भक्ती जर आंधळीच आहे... मग डोळसांची दृष्टी आमच्या बाबतीत का वेगळी आहे... अशा गंभीर आशयाच्या आणि जगण्यातून सोसलेल्या दु:खाच्या भावनाप्रधान कविता तिसऱ्या राज्यस्तरीय अंध व अपंग साहित्य व कला संमेलनात दिव्यांग व सामान्य कवींनी सादर केल्या.

ठळक मुद्देकविसंमेलनातून कवींनी व्यक्त केल्या भावना : निसर्ग, प्रेम आणि वेदनांचे सादरीकरण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शब्दागणिक अर्थाचे झाले वाद आहे... आंधळ्या वाटेवरचा आंधळा प्रवास आहे... देवावरील माणसाची भक्ती जर आंधळीच आहे... मग डोळसांची दृष्टी आमच्या बाबतीत का वेगळी आहे... अशा गंभीर आशयाच्या आणि जगण्यातून सोसलेल्या दु:खाच्या भावनाप्रधान कविता तिसऱ्या राज्यस्तरीय अंध व अपंग साहित्य व कला संमेलनात दिव्यांग व सामान्य कवींनी सादर केल्या.कवयित्री राधा बोर्डे स्मृती कविसंमेलनाचे अध्यक्ष म्हणून काशिनाथ महाजन व प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध कवी लोकनाथ यशवंत उपस्थित होते. कवी संमेलनाची सुरुवात कवयित्री मीनल येवले यांनी ‘वाट माझी साधी सरळ, कधीच सरत नाही...’ या कवितेने केली. भारती दवणे यांनी ‘अनेक काटे मार्गात असले तरी, मी जगणार आहे...’ अशी प्रेरणादायी कविता सादर केली. सोनम चौधरी यांनी आई-वडिलांची थोरवी गाणारी कविता सादर केली. गणेश पांडे यांनी ‘फुल जरी होऊ शकला नाही, काटा होऊ नकोस’ या आशयाची ‘मानसा’ ही कविता सादर केली. राजेश मारोतकर यांनी ‘चेहरे आरशांचे धुवायचे राहिले...’ या आशयाची कविता सादर करून सामाजिक वेदनेची जाणीव करून दिली. गजानन मानकर यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर, भूपेश नितनवरे यांनी ‘हाय यावी नेमकी का याद आता...’ ही कविता सादर केली. अंध कवी रामराव जंजाळ यांनी ‘निसर्गाच्या सौंदर्याचा भाव जाणून घ्यावा’ या कवितेतून निसर्गाचे अप्रतिम सौंदर्य प्रकट केले. राकेश पावरा यांनी ‘थोडे समजून घे रे...’ रमेश बगे यांनी ‘आंधळ्या वाटेवरचा आंधळा प्रवास आहे...’ या कविता सादर केल्या. सुरेखा रडके यांनी ‘आई मला जन्म नवा घेऊ दे...’, विद्याधर बन्सोड यांनी ‘दिवा माझा असेलच, फक्त तुझी वात दे...’ अशा वेगवेगळ्या आशयाच्या कविता, नज्म, शायरी यावेळी राजेश आसुदानी, शेषराव धांडे, रुपकिशोर कनोजिया, बाळकृष्ण राऊत, प्रशांत ढोले, प्रदीप देशमुख यांच्यासह अनेकांनी सादर केल्या. कविसंमेलनाचे संचालन डॉ. बळवंत भोयर यांनी केले. सर्व कवींना आमदार प्रकाश गजभिये यांच्याहस्ते सन्मानित करण्यात आले.ये बिल बहुमतो से हो जाये सँगशनसरकार लागू करते अमिरो को पेंशन, और दे दे जहर गरीबो को, की मिट जाये टेंशन, भारत के लिडरो है अर्ज की, ये बिल बहुमतो से हो जाये सँगशन... गरीबांची वेदना सरकार दरबारी अतिशय मार्मिक शब्दात या कविसंमेलनात जमिल अन्सारी यांनी पोहचविली.

 

टॅग्स :literatureसाहित्यnagpurनागपूर