शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचं टार्गेट किलिंग! ५ मिलियन डॉलरचे इनाम असलेला टॉप कमांडर बेरूतमध्ये हवाई हल्ल्यात उडवला
2
शेख हसीनांच्या प्रत्यार्पणासाठी बांगलादेशची भारताला थेट मागणी; फाशीच्या शिक्षेमुळे वाढले टेन्शन!
3
Wing Commander Namansh Syal :'भारत माता की जय'च्या घोषणा, हजारो नागरिकांच्या उपस्थितीत वीरपत्नीचा 'तो' अखेरचा सॅल्यूट...
4
India ODI Squad vs SA: भारतीय वनडे संघाची घोषणा! KL राहुल कॅप्टन; ऋतुराजलाही मिळाली संधी
5
Travel : भारतातील ५ सुंदर गावं, जिथे फिरायला जाल तर इटली अन् पॅरिसही विसराल! पाहा कुठे आहेत...
6
अल-फलाह डॉक्टरांच्या अटकेनंतर सर्च ऑपरेशन सुरू; मशिदीतून संशयास्पद पावडरसह विदेशी दारूही जप्त!
7
“स्वामी समर्थांनी सांगितले, आळशी माणसाचे तोंड पाहू नका”; शिंदेंचा नाव न घेता ठाकरेंना टोला
8
गुरुवारी दत्त जयंती २०२५: ११ दिवस सेवा करा, नक्की फल मिळेल; काळजी सोडा, स्वामी शुभच करतील!
9
संतापजनक! सोयाबीनची भाजी केली म्हणून पतीने पत्नीचे डोके फोडले; सिद्धार्थनगरमध्ये हादरवणारी घटना
10
बिबट्या पुण्याच्या वेशीवर; पहाटे पहाटे औंधमध्ये  बिबट्याचे दर्शन; पुणे शहरात खळबळ, वनविभाग आणि RESQ सतर्क
11
“काँग्रेसच्या विकासकांमाची यादी करायची तर कागद संपतो, भाजपाने मात्र...”: हर्षवर्धन सपकाळ
12
IND vs SA 2nd Test Day 2 Stumps : धोक्याची घंटा वाजली! टीम इंडिया पलटवार करू शकेल का?
13
६, ९, ५, २२ अन् २५ हे केवळ अंक नाहीत, अयोध्या राम मंदिराशी खास कनेक्शन; तुम्हाला माहितीये?
14
"महिलेचा गर्भपात, पती म्हणून अनंत गर्जेंचे नाव"; डॉक्टर गौरींना मिळाली होती कागदपत्रे, प्रकरणाला धक्कादायक वळण
15
Smriti Mandhana Wedding Postponed: वडिलांची तब्येत बिघडली; स्मृतीनं घेतला लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय
16
"अनंतचा फोन आलेला, खूप रडत होता; त्याने मला सांगितलं की..."; गौरी पालवे प्रकरणावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
17
Video - क्लिनिकबाहेर उभ्या असलेल्या डॉक्टरला आला हार्ट अटॅक, खाली कोसळला अन्...
18
“भाजपाने सुसंस्कृत राजकारण सोडले, सरकार नैतिक कर्तव्य विसरले”; सुप्रिया सुळेंची टीका
19
भारताच्या तेल पुरवठ्यावर अमेरिकेचा मोठा 'बॅन'; रशियाकडून मिळणारे ४०% स्वस्त तेल आता कमी होणार?
20
सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच मिळणार फायदे! नवीन लेबर कोडमुळे कामगारांना मिळणार मोठा आधार
Daily Top 2Weekly Top 5

आंधळ्या वाटेवरचा आंधळा प्रवास आहे .....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 00:42 IST

शब्दागणिक अर्थाचे झाले वाद आहे... आंधळ्या वाटेवरचा आंधळा प्रवास आहे... देवावरील माणसाची भक्ती जर आंधळीच आहे... मग डोळसांची दृष्टी आमच्या बाबतीत का वेगळी आहे... अशा गंभीर आशयाच्या आणि जगण्यातून सोसलेल्या दु:खाच्या भावनाप्रधान कविता तिसऱ्या राज्यस्तरीय अंध व अपंग साहित्य व कला संमेलनात दिव्यांग व सामान्य कवींनी सादर केल्या.

ठळक मुद्देकविसंमेलनातून कवींनी व्यक्त केल्या भावना : निसर्ग, प्रेम आणि वेदनांचे सादरीकरण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शब्दागणिक अर्थाचे झाले वाद आहे... आंधळ्या वाटेवरचा आंधळा प्रवास आहे... देवावरील माणसाची भक्ती जर आंधळीच आहे... मग डोळसांची दृष्टी आमच्या बाबतीत का वेगळी आहे... अशा गंभीर आशयाच्या आणि जगण्यातून सोसलेल्या दु:खाच्या भावनाप्रधान कविता तिसऱ्या राज्यस्तरीय अंध व अपंग साहित्य व कला संमेलनात दिव्यांग व सामान्य कवींनी सादर केल्या.कवयित्री राधा बोर्डे स्मृती कविसंमेलनाचे अध्यक्ष म्हणून काशिनाथ महाजन व प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध कवी लोकनाथ यशवंत उपस्थित होते. कवी संमेलनाची सुरुवात कवयित्री मीनल येवले यांनी ‘वाट माझी साधी सरळ, कधीच सरत नाही...’ या कवितेने केली. भारती दवणे यांनी ‘अनेक काटे मार्गात असले तरी, मी जगणार आहे...’ अशी प्रेरणादायी कविता सादर केली. सोनम चौधरी यांनी आई-वडिलांची थोरवी गाणारी कविता सादर केली. गणेश पांडे यांनी ‘फुल जरी होऊ शकला नाही, काटा होऊ नकोस’ या आशयाची ‘मानसा’ ही कविता सादर केली. राजेश मारोतकर यांनी ‘चेहरे आरशांचे धुवायचे राहिले...’ या आशयाची कविता सादर करून सामाजिक वेदनेची जाणीव करून दिली. गजानन मानकर यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर, भूपेश नितनवरे यांनी ‘हाय यावी नेमकी का याद आता...’ ही कविता सादर केली. अंध कवी रामराव जंजाळ यांनी ‘निसर्गाच्या सौंदर्याचा भाव जाणून घ्यावा’ या कवितेतून निसर्गाचे अप्रतिम सौंदर्य प्रकट केले. राकेश पावरा यांनी ‘थोडे समजून घे रे...’ रमेश बगे यांनी ‘आंधळ्या वाटेवरचा आंधळा प्रवास आहे...’ या कविता सादर केल्या. सुरेखा रडके यांनी ‘आई मला जन्म नवा घेऊ दे...’, विद्याधर बन्सोड यांनी ‘दिवा माझा असेलच, फक्त तुझी वात दे...’ अशा वेगवेगळ्या आशयाच्या कविता, नज्म, शायरी यावेळी राजेश आसुदानी, शेषराव धांडे, रुपकिशोर कनोजिया, बाळकृष्ण राऊत, प्रशांत ढोले, प्रदीप देशमुख यांच्यासह अनेकांनी सादर केल्या. कविसंमेलनाचे संचालन डॉ. बळवंत भोयर यांनी केले. सर्व कवींना आमदार प्रकाश गजभिये यांच्याहस्ते सन्मानित करण्यात आले.ये बिल बहुमतो से हो जाये सँगशनसरकार लागू करते अमिरो को पेंशन, और दे दे जहर गरीबो को, की मिट जाये टेंशन, भारत के लिडरो है अर्ज की, ये बिल बहुमतो से हो जाये सँगशन... गरीबांची वेदना सरकार दरबारी अतिशय मार्मिक शब्दात या कविसंमेलनात जमिल अन्सारी यांनी पोहचविली.

 

टॅग्स :literatureसाहित्यnagpurनागपूर