शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
2
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
3
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
4
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
5
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
6
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
7
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
8
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
9
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
10
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
11
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
12
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
13
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
14
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
15
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
16
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
17
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
18
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
19
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...
20
धक्कादायक! लिव्ह-इन पार्टनरची केली हत्या, सिग्नलवर गाडी थांबवली, पेट्रोल ओतून पेटवून दिले

भाजपा आरक्षणाच्या बाजूने

By admin | Updated: August 25, 2014 01:18 IST

भाजपाला नेहमीच जातीयवादी व आरक्षणविरोधी म्हटले जाते. परंतु भाजपा ही नेहमीच आरक्षणाच्या बाजूने राहिली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात ज्या आरक्षणाची तरतूद केली होती

काँग्रेसचे राजकारण व्होट बँकेचे : देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन नागपूर : भाजपाला नेहमीच जातीयवादी व आरक्षणविरोधी म्हटले जाते. परंतु भाजपा ही नेहमीच आरक्षणाच्या बाजूने राहिली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात ज्या आरक्षणाची तरतूद केली होती त्याची मुदत जेव्हा संपली तेव्हा अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार होते. सर्वांनी आरक्षण रद्द करण्यासाठी जोर लावला होता. परंतु वाजपेयी यांनी विरोध केला. दलित समाजाला अजूनही आरक्षणाची गरज असल्याचे स्पष्ट करीत ती मुदत वाढवून दिली होती, असे प्रतिपादन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ. देवेंंद्र फडणवीस यांनी येथे केले. भाजपा अनुसूचित जाती मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेशाची बैठक रविवारी सिव्हील लाईन्स येथील राणी कोठी येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीचे उद्घाटन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष आ. नाना श्यामकुळे होते. माजी खासदार रामनाथ कोविंद, आ. सुधाकरराव देशमुख, सुधाकर भालेराव, आ. भाई गिरकर, माजी आ. हरीश मोरे, माजी आमदार भोला बढेल, अशोक मेंढे, सुभाष पारधी, राजकुमार बोडोले, रामनाथ नवंदिकर व्यासपीठावर होते.देवेंद्र फडणवीस म्हणाले, आम्ही ज्या सामाजिक व्यवस्थेत आहोत, त्यात सामाजिक निकष हाच आरक्षण देण्यासाठी योग्य आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षणासाठी दिलेले सामाजिक निकषाचे सूत्रच योग्य असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. काँग्रेसचे आजवरचे राजकारण हे व्होट बँकेचे राहिले आहे. दलितांचा वापर त्यांनी केवळ मत मिळविण्यापुरता केला. दलित समाजातील काही स्वार्थी नेत्यांना काँग्रेसने तुकडे दिले. नेत्यांना संधी मिळाली, परंतु समाजाचा फायदा झाला नाही. नेते मोठे झाले, परंतु समाजाचा विकास झाला नाही. मात्र सध्याची तरुण पिढी ही हुशार आहे. त्यांना हे व्होट बँकेचे राजकारण कळाले. त्यांनी भाजपला साथ दिली आणि देशात परिवर्तन घडून आले. हे परिवर्तन आता महाराष्ट्रातही घडवून आणायचे आहे. दलित समाजाने भाजपावर जो विश्वास टाकला आहे तो विश्वास कायम राखणे हे आपल्यासमोरचे सर्वात मोठे आव्हान राहणार आहे.शाहू, फुले, आंबेडकरांचे नाव घ्यायचे आणि सत्ता हातात आली, की विविध योजनांच्या नावावर भ्रष्टाचार करायचा, असे एकमेव धोरण काँग्रेसचे राहिले आहे. परंतु भाजपाचे तसे नाही. ‘सबका साथ सबका विकास’ हा नरेंद्र मोदींचा नारा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी एक मजबूत राजकीय पार्टी उभारली होती. परंतु काही स्वार्थी नेत्यांनी आपला स्वार्थ पूर्ण करण्यासाठी पक्ष कमकुवत केला. त्यांनी सत्तेशी समझोता केला. त्यामुळे समाजापासून दुरावले. त्यामुळे समाजापासून दुरावू नका, समाजात काम करा, नेतृत्व तुम्हाला आपोआप मिळत राहील, असे आवाहनही त्यांनी केले. नाना श्यामकुळे यांनी आपल्या भाषणात काँग्रेसनेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ संपविण्याचे काम केल्याची टीका केली. अशोक मेंढे, रामनाथ कोविंद, आ. भाई गिरकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. गंगाधर कावडे यांनी प्रास्ताविक केले. माजी उपमहापौर संदीप जाधव यांनी संचालन केले. तर धर्मपाल मेश्राम यांनी आभार मानले. केंद्रीय भूपृष्ठ व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी हे सुद्धा कार्यक्रमाला आवर्जुन उपस्थित होते. परंतु त्यांना तातडीने पत्नागिरीला जायचे असल्याने ते लवकर निघून गेले. (प्रतिनिधी)