शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

भाजप छुपा अजेंडा राबवतेय

By admin | Updated: July 9, 2015 03:02 IST

राज्यात आघाडीची सत्ता असताना शेतकऱ्यांच्या आत्महत्यावरून ३०२ चा गुन्हा दाखल करण्याची मागणी

अजित पवार यांचा आरोप : भ्रष्टाचारी मंत्र्यांनी राजीनामा द्यावा नागपूर : राज्यात आघाडीची सत्ता असताना शेतकऱ्यांच्या आत्महत्यावरून ३०२ चा गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजप नेते करीत होते. परंतु भाजप-शिवसेना युतीच्या सात महिन्याच्या राजवटीत राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहे. दुबार पेरणीचे संकट असूनही शेतकऱ्यांना मदत नाही. राज्यात भ्रष्टाचार बोकाळला आहे. कायदा व सुव्यवस्था ढासळल्याने लोकांच्या मनात असुरक्षिततेची भावना आहे. अशा जनहिताच्या प्रश्नावरून १३ जुलैपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सरकारला जाब विचारणार असल्याचा इशारा राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिला. जिल्हाध्यक्षांची निवड करण्यासाठी विदर्भातील इच्छुकांच्या रविभवन येथे मुलाखती घेण्यात आल्या. यावेळी विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री जयंत पाटील, अनिल देशमुख, मनोहर नाईक, रमेश बंग आदी उपस्थित होते. लोकांना अच्छे दिन येणार असल्याचे स्वप्न दाखवून सत्तेवर आलेल्या भाजप नेतृत्वातील सरकारने जनतेचा भ्रमनिरास केला आहे. केंद्र व राज्य सरकारमधील दिग्गज नेत्यांची भ्रष्टाचाराची नवनवी प्रकरणे पुढे येत असल्याने त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. चौकशीत निर्दोष आढळल्यास पुन्हा पदावर यावे. भाजपचा मित्र पक्ष असलेल्या शिवसेना नेत्यांना भ्रष्टाचार बोकाळाल्याचे दिसत आहे. सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सरकारचे धिंडवडे काढल्याचे त्यांनी सांगितले.आघाडी सरकारच्या काळात कापूस व धानाला भाव दिला होता. परंतु भाजप सरकारला यात अपयश आले आहे.दुधाचे भाव २५ रुपयावरुन १६ रुपयावर आले आहे. पाण्यापेक्षा दूध स्वस्त झाल्याने दूध उत्पादक चिंतेत आहे. त्यातच राज्यात दुबार पेरणीचे असूनही शेतकऱ्यांना पीक कर्ज न मिळाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे गेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजप नेत्यांना डोक्यावर घेतलेल्या विदर्भातील जनतेचा भ्रमनिरास झाला आहे. म्हणूनच . भंडारा व गोंदिया जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मतदारांनी त्यांना नाकारल्याचे पवार म्हणाले. सुरुवातीला आम्ही सरकारवर टीका केली नाही. सहा महिने संधी दिली. परंतु सरकारला सर्वच क्षेत्रात अपयश आल्याचे पवार म्हणाले.(प्रतिनिधी)