शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

भाजपाला गोपीनाथ मुंडे यांचा विसर; धनंजय मुंडे यांचा सरकारवर हल्लाबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 19:12 IST

राज्य सरकारने स्व.गोपीनाथ मुंडे ऊ स तोडणी कामगार कल्याणकारी महामंडळ स्थापना करण्याची घोषणा केली होती. परंतु अद्याप एकाही कामगाराला मदत नाही, महामंडळ नाही आणि कार्यालयही नाही हा गोपीनाथ मुंडे यांचा अवमान असून भाजपा त्यांना विसरला असल्याची टीका विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी बुधवारी विधान परिषदेत केली.

ठळक मुद्देघोषणा केली पण तीन वर्षात महामंडळाची स्थापना नाही

आॅनलाईन लोकमतनागपूर : माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांनी पक्ष वाढविला. ऊसतोड कामगारांना न्याय मिळावा, यासाठी त्यांनी संघर्ष केला. यातूनच तीन वर्षापूर्वी राज्य सरकारने स्व.गोपीनाथ मुंडे ऊ स तोडणी कामगार कल्याणकारी महामंडळ स्थापना करण्याची घोषणा केली होती. परंतु अद्याप एकाही कामगाराला मदत नाही, महामंडळ नाही आणि कार्यालयही नाही हा गोपीनाथ मुंडे यांचा अवमान असून भाजपा त्यांना विसरला असल्याची टीका विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी बुधवारी विधान परिषदेत केली.प्रश्नोत्तराच्या तासात याबाबतच्या प्रश्नावर मुंडे यांनी कामगार मंत्री संभाजी पाटील यांना धारेवर धरत गोपीनाथ मुंडे याचा अवमान केल्याप्रकरणी माफी मागा अशी मागणी केली. या महामंडळास विलंब झाला, अद्याप कार्यालय नाही, एकाही कामगाराला लाभ मिळालेला नसल्याचे मुंडे यांनी निदर्शनास आणले. अखेर हे कार्यालय एक महिन्याच्या आत सुरू करण्याचे आश्वासन पाटील यांनी दिले.ऊस तोडणी कामगारांसाठी गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने भाजपाने महामंडळ जाहीर केले होते. तेव्हा आम्ही सरकारचे अभिनंदन केले होते. पण तीन वर्षांपासून महामंडळाचे काम सुरू झालेले नाही. कार्यालय, कर्मचारी, लाभार्थी काहीच तरतूद नाही. ५ डिसेंबरच्या कॅबिनेट बैठकीत महामंडळ करण्याचा निर्णय घेतला असा आरोप मुंडे यांनी केला.ज्यांनी भाजपाला वाडी, वस्तीत नेले, त्याच गोपीनाथ मुंडे यांची उपेक्षा भाजपाने चालवली आहे, असा आरोप धनंजय मुंडे यांनी केला. तीन वर्षापूर्वी महामंडळाची घोषणा करण्यात आली. परंतु सरकार काहीच करीत नसल्याची टीका आ. विनायक मेटे यांनी केली. सदस्य अमरसिंह पंडित, सतीश चव्हाण यांच्यासह इतर सदस्यांनी हा विषय उपस्थित केला होता.

 

टॅग्स :Nagpur Winter Session-2017नागपूर हिवाळी अधिवेशन-२०१७