शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

भाजपाला गोपीनाथ मुंडे यांचा विसर; धनंजय मुंडे यांचा सरकारवर हल्लाबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 19:12 IST

राज्य सरकारने स्व.गोपीनाथ मुंडे ऊ स तोडणी कामगार कल्याणकारी महामंडळ स्थापना करण्याची घोषणा केली होती. परंतु अद्याप एकाही कामगाराला मदत नाही, महामंडळ नाही आणि कार्यालयही नाही हा गोपीनाथ मुंडे यांचा अवमान असून भाजपा त्यांना विसरला असल्याची टीका विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी बुधवारी विधान परिषदेत केली.

ठळक मुद्देघोषणा केली पण तीन वर्षात महामंडळाची स्थापना नाही

आॅनलाईन लोकमतनागपूर : माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांनी पक्ष वाढविला. ऊसतोड कामगारांना न्याय मिळावा, यासाठी त्यांनी संघर्ष केला. यातूनच तीन वर्षापूर्वी राज्य सरकारने स्व.गोपीनाथ मुंडे ऊ स तोडणी कामगार कल्याणकारी महामंडळ स्थापना करण्याची घोषणा केली होती. परंतु अद्याप एकाही कामगाराला मदत नाही, महामंडळ नाही आणि कार्यालयही नाही हा गोपीनाथ मुंडे यांचा अवमान असून भाजपा त्यांना विसरला असल्याची टीका विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी बुधवारी विधान परिषदेत केली.प्रश्नोत्तराच्या तासात याबाबतच्या प्रश्नावर मुंडे यांनी कामगार मंत्री संभाजी पाटील यांना धारेवर धरत गोपीनाथ मुंडे याचा अवमान केल्याप्रकरणी माफी मागा अशी मागणी केली. या महामंडळास विलंब झाला, अद्याप कार्यालय नाही, एकाही कामगाराला लाभ मिळालेला नसल्याचे मुंडे यांनी निदर्शनास आणले. अखेर हे कार्यालय एक महिन्याच्या आत सुरू करण्याचे आश्वासन पाटील यांनी दिले.ऊस तोडणी कामगारांसाठी गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने भाजपाने महामंडळ जाहीर केले होते. तेव्हा आम्ही सरकारचे अभिनंदन केले होते. पण तीन वर्षांपासून महामंडळाचे काम सुरू झालेले नाही. कार्यालय, कर्मचारी, लाभार्थी काहीच तरतूद नाही. ५ डिसेंबरच्या कॅबिनेट बैठकीत महामंडळ करण्याचा निर्णय घेतला असा आरोप मुंडे यांनी केला.ज्यांनी भाजपाला वाडी, वस्तीत नेले, त्याच गोपीनाथ मुंडे यांची उपेक्षा भाजपाने चालवली आहे, असा आरोप धनंजय मुंडे यांनी केला. तीन वर्षापूर्वी महामंडळाची घोषणा करण्यात आली. परंतु सरकार काहीच करीत नसल्याची टीका आ. विनायक मेटे यांनी केली. सदस्य अमरसिंह पंडित, सतीश चव्हाण यांच्यासह इतर सदस्यांनी हा विषय उपस्थित केला होता.

 

टॅग्स :Nagpur Winter Session-2017नागपूर हिवाळी अधिवेशन-२०१७