शहरं
Join us  
Trending Stories
1
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
2
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
3
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
5
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
6
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
7
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
8
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
9
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
10
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
11
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
12
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
13
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
14
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
15
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
16
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
17
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
18
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
19
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
20
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत

भाजपाच पहिला शत्रू

By admin | Updated: January 12, 2017 01:53 IST

राज्यात शिवसेनेचीही एकहाती सत्ता होती. मात्र, आम्ही सत्ता अंगात आणली नाही. आम्ही भाजपला धाकट्या भावाप्रमाणे वागविले.

शिवसेनेच्या मेळाव्यात हल्लाबोल : स्वबळाचा नारा, १५१ जागा लढणार नागपूर : राज्यात शिवसेनेचीही एकहाती सत्ता होती. मात्र, आम्ही सत्ता अंगात आणली नाही. आम्ही भाजपला धाकट्या भावाप्रमाणे वागविले. पण यांनी विधानसभा निवडणुकीत पाठीत खंजीर खुपसला. याचा बदला घेण्याची वेळ आली आहे. आपला पहिला शत्रू भाजपा आहे. या शत्रूच्या सामना करण्यासाठी मतभेद विसरून ताकदीने एकत्र या, असे आवाहन शिवसेनेचे नागपूर जिल्हा संपर्क प्रमुख आ. तानाजी सावंत यांनी केले. दुपारी महापालिकेच्या निवडणुकीची घोषणा झाली आणि सायंकाळी साई सभागृहात आयोजित मेळाव्यात आ. सावंत यांनी पक्षश्रेष्ठी राज्यस्तरावर घेतील तो निर्णय मान्य असल्याचे सांगत नागपुरात स्वबळावर संपूर्ण १५१ जागा लढण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी उपस्थित जिल्हाप्रमुख सतीश हरडे, माजी खा. प्रकाश जाधव, माजी आ. आशिष जयस्वाल, शहर प्रमुख मंगेश काशीकर यांनीही भाजपवर तोफ डागली. आ. सावंत म्हणाले, यवतमाळमध्ये संख्याबळ नसताना मी विधान परिषद निवडणुकीचे आव्हान पेलले. आता मी नागपूरचे ‘चॅलेंज’ स्वीकारले आहे. भाजपाजवळ मोठे नेते असतील, पण आम्हालाही कमजोर समजू नका. आम्हीही ताकदीने लढू. आमच्याशिवाय कुणाचीही सत्ता येणार नाही, अशी परिस्थिती नागपुरात निर्माण करून दाखवू, असा दावा सावंत यांनी केला. प्रकाश जाधव म्हणाले, भाजपाला आपला पहिला शत्रू माना. त्यासाठी रात्रभर जागून काम करा. ज्याला भाजपशी दोस्ती करायची आहे, त्याने खुशाल करावी. मात्र, रात्री भाजप नेत्यांजवळ बसायचे व दिवसा शिवसेनेला मार्गदर्शन करायचे, हे बंद करा, असे त्यांनी शिवसेनेतील दुटप्पी भूमिका घेणाऱ्या नेत्यांना सुनावले. आशिष जयस्वाल यांनीही सर्वच जागा लढवून कार्यकर्ते तयार करण्याचा मानस व्यक्त केला. सतीश हरडे यांनी महापालिकेच्या शाळा बंद करून इमारती भाजप नेत्यांच्या संस्थांना दिल्या जात असल्याचा आरोप केला. शहर प्रमुख मंगेश काशीकर यांनी सत्ता स्थापनेनंतर भाजपने शिवसेनेशी बेईमानी करीत उपमहापौर पदन दिल्याचे सांगत आता जिद्दीने महापालिकेवर भगवा फडकवू, असा निर्धार व्यक्त केला. यावेळी किरण पांडव, सुरज गोजे, राजू हरणे, संदीप इटकेलवार, हर्षल काकडे, अलका दलाल, मंगला गवरे, बंडू तळवेकर, जगतराम सिन्हा, वंदना लोणकर, डिगांबर ठाकरे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी) एक माणूस तिकीट वाटणार नाही कुणीही एक माणूस नागपुरात तिकीट वाटणार नाही. दोन समित्या नेमल्या जातील. प्रत्येकाच्या मुलाखती होऊन यादी तयार केली जाईल. उमेदवाराचे मेरिट पाहून तिकीट दिले जाईल, असे सांगत संपर्क प्रमुख सावंत यांनी कार्यकर्त्यांना आश्वस्त केले. सावरबांधे यांना चिमटा माजी उपमहापौर शेखर सावरबांधे यांना प्रकाश जाधव यांनी चिमटे काढले. पक्ष सोडून गेले, आता तिकडेच सुखी रहा. परत येऊन आमचे घर कशाला उद्ध्वस्त करता ? उडाले ते कावळे, राहिले ते मावळे असे म्हणत जाधव यांनी अप्रत्यक्षपणे सावरबांधे यांच्या एन्ट्रीला जाहीर विरोध केला.