शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

महाराष्ट्रात भाजपाला आत्मचिंतनाची आवश्यकता नाही

By योगेश पांडे | Updated: May 15, 2023 17:58 IST

Nagpur News कर्नाटकातील भाजपच्या पराभवानंतर महाराष्ट्रातदेखील मंथनाची आवश्यकता असल्याचा अनेकांचा सूर आहे. मात्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मात्र राज्यात भाजप मजबूत असल्याचा दावा केला आहे.

योगेश पांडे 

नागपूर : कर्नाटकातील भाजपच्या पराभवानंतर महाराष्ट्रातदेखील मंथनाची आवश्यकता असल्याचा अनेकांचा सूर आहे. मात्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मात्र राज्यात भाजप मजबूत असल्याचा दावा केला आहे. कर्नाटकात झालेल्या पराभवानंतर महाराष्ट्रातील भाजपाला आत्मचिंतन करण्याची गरज नाही, असे त्यांनी प्रतिपादन केले आहे. ते सोमवारी नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षच निवडणुकीत क्रमांक एकचा पक्ष आहे. सरकार आणि संघटना मिळून आम्ही ५१ टक्के जागा मिळविण्याच्या तयारीवर भर देत आहोत. कर्नाटकमध्ये कॉंग्रेसचा विजय झाला याची कारणे वेगळी आहे. तेथील राजकारण, मुद्दे वेगळे आहे, त्यामुळे कर्नाटकचा महाराष्ट्राशी काहीच संबंध नाही. एखाद्या निवडणुकीत फायदा झाला तर दुसऱ्या निवडणुकीत फायदा होईल असेही नाही, असे ते म्हणाले. लोकसभा व विधानसभा निवडणूका एकत्रित होतील या चर्चांचेदेखील त्यांनी खंडन केले. लोकसभेसोबत विधानसभा निवडणुका होतील अशी शक्यता आज तरी दिसत नाही. लोकसभा निवडणुकीनंतर सहा महिने विधानसभा अस्तित्वात राहणार आहे. आजच अंदाज व्यक्त करणे घाईचे होईल, अशी भूमिका त्यांनी मांडली.

राज्यात युवा संवाद यात्रा

भाजपशी तरुणांना जास्तीत जास्त प्रमाणात जोडण्यासाठी युवा संवाद यात्रा काढली जाणार आहे. प्रत्येक बूथवर २५ युवा वॉरिअर्स तयार करण्याची योजना आखली आहे. यासोबतच महाराष्ट्रात ‘नमो चषक’ क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडूंना प्रोत्साहन देत राज्य व राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धांसाठी तयारी करणार आहोत, अशी माहिती बावनकुळे यांनी दिली.

टॅग्स :Chandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळे