शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

भाजप-काँग्रेस सारखेच : श्रीहरी अणे यांचा हल्लाबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 20:56 IST

काँग्रेस कमकुवत असल्याचे भाजप सांगत आहे. कॉंग्रेसही भाजपला प्रत्युत्तर देत नाही. दोन्ही पक्ष परस्पर विरोधी भूमिका घेण्यास टाळत आहेत. भाजप-कॉंग्रेसकडे कोणताच मुद्दा निवडणूक लढविण्यासाठी नसल्यामुळे ही पहिलीच बिनमुद्याची निवडणूक आहे. हे दोन्ही पक्ष साररखेच असल्यामुळे अ‍ॅड. सुरेश माने यांना विदर्भाच्या मुद्यावर रिंगणात उतरवावे लागले, असा हल्लाबोल विदर्भ निर्माण महामंचचे नेते अ‍ॅड. श्रीहरी अणे यांनी पत्रकार परिषदेत गुरुवारी केला.

ठळक मुद्देपुलवामा हल्ल्याचे राजकारण होतेय

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : काँग्रेस कमकुवत असल्याचे भाजप सांगत आहे. कॉंग्रेसही भाजपला प्रत्युत्तर देत नाही. दोन्ही पक्ष परस्पर विरोधी भूमिका घेण्यास टाळत आहेत. भाजप-कॉंग्रेसकडे कोणताच मुद्दा निवडणूक लढविण्यासाठी नसल्यामुळे ही पहिलीच बिनमुद्याची निवडणूक आहे. हे दोन्ही पक्ष साररखेच असल्यामुळे अ‍ॅड. सुरेश माने यांना विदर्भाच्या मुद्यावर रिंगणात उतरवावे लागले, असा हल्लाबोल विदर्भ निर्माण महामंचचे नेते अ‍ॅड. श्रीहरी अणे यांनी पत्रकार परिषदेत गुरुवारी केला.अ‍ॅड. अणे म्हणाले, विदर्भाच्या मुद्यावर फसविल्यामुळे मतदारांनी कॉंग्रेसला सत्तेतून बाहेर काढले. भाजपने विदर्भाच्या मुद्याचे भांडवल करून विधानसभा आणि लोकसभा निवडणूक लढविली. मात्र, सत्ता मिळताच त्याच मुद्याला भाजप विसरला. विदर्भ निर्माण महामंच विधानसभेत २० ते ३० वयोगटातील उमेदवारांना, महिलांना प्राधान्य देणार आहोत. तेलंगणासारखे आंदोलन करा आम्ही दखल घेऊ असे गडकरींनी सांगितले होते. परंतु आम्हाला जाळपोळ, रक्तपात नको आहे. पुलवामा हल्ल्याचे राजकारण करून भाजप मते मागत आहे. कॉंग्रेसही नागपुरात बाहेरचा उमेदवार आणून लाजेखातर निवडणूक लढवित आहे. परंतु विदर्भ निर्माण महामंचाचे अ‍ॅड. सुरेश माने हे विदर्भाच्या मुद्यावर निवडणुकीत उभे आहेत. केवळ नागपूर-मुंबई महामार्ग, मेट्रो म्हणजे विकास नाही. विदर्भातील शेतकरी, त्यांचे प्रश्न, बेरोजगारी, आदिवासीवरील अत्याचार, विदर्भातील सरकारची असफल ठरलेली क्षमता यावर महामंच निवडणूक लढवित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अ‍ॅड. वामनराव चटप यांनी आम्ही निवडणुकीकडे आंदोलन म्हणून पाहत असल्याचे सांगितले. तर अ‍ॅड. माने यांनी विदर्भ वेगळा झाल्यास विकासाचा प्रश्न मार्गी लागेल, असा दावा केला. या वेळी सुनील चोखारे उपस्थित होते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकShrihri Anneश्रीहरी अणेMediaमाध्यमे