शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या राजभवन परिसरात घडतेय जैवविविधतेचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 01:49 IST

हिरवेकंच वृक्षांची दाटीवाटी, त्यावर सुरू असलेला असंख्य पाखरांचा चिवचिवाट, डोळ्यांना आकर्षित करणाऱ्या रंगीबेरंगी फुलांचे गालिचे, त्यावर इकडून तिकडे उडणारे फुलपाखरांचे असंख्य थवे, ऐन उन्हाळ्यातही निसर्गाचे असे वैभव शहराच्या मध्यभागी असलेल्या राजभवनात अनुभवास मिळत आहे. नयनरम्य निसर्गाचा हा अद्भूत थाट खºया अर्थाने पर्यावरण आणि निसर्ग संवर्धनाची साक्ष देतोय.

ठळक मुद्देपर्यावरण संवर्धनाचा ‘राज’ योग

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हिरवेकंच वृक्षांची दाटीवाटी, त्यावर सुरू असलेला असंख्य पाखरांचा चिवचिवाट, डोळ्यांना आकर्षित करणाऱ्या रंगीबेरंगी फुलांचे गालिचे, त्यावर इकडून तिकडे उडणारे फुलपाखरांचे असंख्य थवे, ऐन उन्हाळ्यातही निसर्गाचे असे वैभव शहराच्या मध्यभागी असलेल्या राजभवनात अनुभवास मिळत आहे. नयनरम्य निसर्गाचा हा अद्भूत थाट खऱ्या अर्थाने पर्यावरण आणि निसर्ग संवर्धनाची साक्ष देतोय.पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास हा सर्वांसाठी चिंतेचा विषय आहे. कारण त्याच्या संवर्धनावर भविष्याची सुरक्षा अवलंबून आहे. याची जाणीव प्रत्येकालाच आहे परंतु कृतीतून ते दिसत नाही. त्यामुळेच शहरात बघावे तिकडे कचºयाचे ढिगारे, प्रदूषण, ओसाड झालेले रस्ते याचाच अनुभव येतोय. शहराची ही अवस्था असताना राजभवनाने मात्र निसर्गाचा अद्भूत वारसा निर्माण केला आहे. यात राजभवनाचे प्रभारी अधिकारी रमेश येवले यांचे योगदान महत्त्वाचे ठरले आहे.राजभवनाचा १०० एकरचा परिसर पूर्वी ओसाड पडला होता. पाच टक्के वृक्ष वगळता संपूर्ण परिसर गवताळ होता. सुरक्षा भिंत नसल्याने हा परिसर गायी-म्हशींचे कुरण झाला होता. उन्हाळ्यात लागलेल्या आगींच्या घटनांनी येथील वनसंपदा नष्ट होत होती. अशा परिस्थितीत १९९८ मध्ये जबाबदारी स्वीकारलेल्या येवले यांनी परिसराचा कायापलट करण्याचा निर्धार करून अतिशय नियोजनाने तो यशस्वीही केला. सुरुवात ७५०० सागाच्या वृक्षारोपणाने झाली. राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांकडून दरवर्षी १००० वृक्ष लागवड करून घेतली. २००८ मध्ये वृक्षांचे संवर्धन करण्यासाठी सुरक्षा भिंत बांधण्यात आली. जलसंधारणाचे छोटे-मोठे बंधारे व दोन वनतळे या परिसरात बांधण्यात आले. राजभवनाच्या १०० एकरच्या परिसरात विशेष संकल्पनेतून जैवविविधता उद्यानाची निर्मिती करण्यात आली. बर्ड रेस्टॉरेंट पक्ष्यांसाठी वरदान२०११ मध्ये परिसराचा सर्वे केला असता तेव्हा १६४ प्रजातीचे पक्षी येथे आढळले. उन्हाळ्याच्या भीषण गरमीत पक्ष्यांच्या खाद्यासाठी बर्ड रेस्टॉरेंटची संकल्पना राबविण्यात आली. दरवर्षाला येथे पक्ष्यांना ४० ते ४५ पोती धान्य खायला घालण्यात येते. ही संकल्पना पक्ष्यांसाठी वरदान ठरली असून सकाळी, संध्याकाळी वेगवेगळ्या प्रजातीच्या पक्ष्यांचे थवे येथे जमतात. राजभवनाचा परिसर मोरांचा अधिवासराजभवनाचा परिसर मोरांचे अधिवास झाले आहे. परिसरात प्रवेश करताच रस्त्यावरून अनेक मोरांचे सहज दर्शन होते. खास फुलपाखरांसाठी बनविण्यात आलेल्या उद्यानात रंगीबेरंगी फुलपाखरांचे थवे बघायला मिळतात. सालिंदर, मसन्याऊदसारखे प्राणी मुक्कामाला असतात. जणुकाही येथे निसर्गाचे जीवनचक्रच तयार झालेले आहे. पर्यावरण म्हणजे काय तर आॅक्सिजन, आॅक्सिजन येतो कुठून तर झाडांपासून. मी राजभवनात सेवा देताना निसर्ग व पर्यावरण संवर्धनातून असंख्य झाडे लावून एकप्रकारे पुढच्या पिढीसाठी आॅक्सिजन मिळण्याची छोटीशी व्यवस्था केली आहे. याचे मला खूप समाधान आहे.रमेश येवले, प्रभारी अधिकारी, राजभवन 

 

टॅग्स :nagpurनागपूर