शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
भूस्खलन होऊन बसवर कोसळली दरड, १८ जणांचा मृत्यू, पण ३ मुलं आश्चर्यकारकरीत्या बचावली  
4
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
5
Bigg Bossचं घर सील, सर्व स्पर्धकांना लवकरच काढणार बाहेर, समोर आलं असं कारण 
6
ICC Womens World Cup 2025 : हेदर नाइटचा हिट शो! इंग्लंडनं बांगलादेशला पराभूत करत भारताला दिला धक्का
7
कस्तुरबा रुग्णालयातील पुस्तक वाटप प्रकरणाला वेगळं वळण, किशोरी पेडणेकरांचा तक्रारदारालाच प्रतिप्रश्न, म्हणाल्या...
8
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
9
अभिषेक शर्मा ICC पुरस्काराच्या शर्यतीत; त्याला कुलदीपसह झिम्बाब्वेचा गडी देणार टक्कर!
10
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
11
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
13
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
14
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
15
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
16
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
17
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
18
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
19
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
20
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

नागपुरातील क्वारंटाईन केंद्रातील जेवण व साहित्याचे बिल अडीच कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 20:35 IST

कोरोना साथीच्या प्रतिबंधासाठी शहरात करण्यात आलेल्या क्वारंटाईन केंद्रांच्या व्यवस्थेसाठी पुरविण्यात आलेल्या गाद्या, उशा, बेडशीट व पॅकिंग अशा बिलांचा बोजा अधिक आहे. तर मोफत भोजन व्यवस्था झाल्याने महापालिकेचा खर्च वाचला आहे. त्यामुळे राज्यातील इतर महापालिकांच्या तुलनेत नागपूर मनपाचा खर्च कमी असून आजवर जवळपास २.५० कोटी खर्च झाले आहेत.

ठळक मुद्देमोफत भोजन व्यवस्था झाल्याने खर्च कमी : गाद्या, बेडशीट व पॅकिंगच्या बिलाचा अधिक बोजा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना साथीच्या प्रतिबंधासाठी शहरात करण्यात आलेल्या क्वारंटाईन केंद्रांच्या व्यवस्थेसाठी पुरविण्यात आलेल्या गाद्या, उशा, बेडशीट व पॅकिंग अशा बिलांचा बोजा अधिक आहे. तर मोफत भोजन व्यवस्था झाल्याने महापालिकेचा खर्च वाचला आहे. त्यामुळे राज्यातील इतर महापालिकांच्या तुलनेत नागपूर मनपाचा खर्च कमी असून आजवर जवळपास २.५० कोटी खर्च झाले आहेत.शहरात कोरोना साथ सुरू झाल्यावर क्वारंटाईन केंद्रांची व्यवस्था करण्यात आली. नागपुरात व्हीएनआयटी, आमदार निवास, सिम्बॉयसिस, पाचपावली, वनामती, आरपीटीएस, राजनगर, नीरी आदी ठिकाणी व्यवस्था करण्यात आली. या ठिकाणी दाखल होणाऱ्या नागरिकांची व्यवस्था करण्यात आली. सुरुवातीला जिल्हा प्रशासनातर्फे जेवणाची व्यवस्था करण्यात आली. प्रतिव्यक्ती दिवसाला ६०० रुपये खर्च येत होता. २ मेपासून ही व्यवस्था महापालिकेकडे आली. त्यानंतर प्रति व्यक्ती १५९ रुपये दराने निविदा काढण्यात आली. २ ते २५ दरम्यान यासाठी मनपाने ७५.७५ लाख रुपये खर्च केले. त्यानंतर २६ मेपासून राधास्वामी सत्संग मंडळाकडे मोफत जेवणाची व्यवस्था देण्यात आली. मनपाकडे चहा, बिस्किट व पिण्याचे पाणी पुरवण्याची जबाबदारी आहे. यावर प्रतिव्यक्ती ५२.४७ रुपये दराने खर्च केला जात आहे. यावर जून अखेरीस ३२.३८ लाख रुपये खर्च करण्यात आले. तसेच राधास्वामी सत्संग येथून जेवण मोफत मिळत असले तरी पॅकिंग खर्च मनपाला करावा लागत आहे. प्रति पॅकिंग १२.५८ रुपये दराने ७.८१ लाख रुपये खर्च करण्यात आले.खर्चाची मोठी बचतक्वारंटाईन सेंटरवर नागरिकांना जेवण, गाद्या, उशा, बेडशीट, बकेट, मग, झाडू, डस्टबिन, टॉवेल असे साहित्य पुरविले. यावर सुमारे २.५० कोटी रुपये खर्च करण्यात आला. क्वारंटाईन केंद्राच्या व्यवस्थेच्या बिलाबाबत विचारले असता अतिरिक्त आयुक्त राम जोशी म्हणाले की, राधास्वामी सत्संग मंडळामुळे मनपाचा जेवनावरील खर्च मोठ्या प्रमाणात वाचला आहे. सॅनिटायझर, मास्क सेवाभावी संस्थांकडून मिळाले आहेत. यात मनपाची बचत झाली.दररोज प्रतिव्यक्ती ५२.४७ रुपये खर्चक्वारंटाईन केंद्राच्या व्यवस्थेवर जवळपास २.५ कोटी खर्च आला आहे. जेवण मोफत असले तरी चहा, बिस्किट व पॅकिंग, वाहतूक यावर मनपा खर्च करीत आहे. दर दिवसाला प्रतिव्यक्ती ५२.४७ रुपये खर्च होत आहेत. तसेच पॅकिंगवर प्रति पॅकिंग १२.५८ रुपये खर्च होत आहेत. २ मेपासून महापालिकेकडे ही जबाबदारी आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या