शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांचे वक्तव्य : बिहारी चंद्रावरदेखील काम करू शकतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2019 21:01 IST

बिहारचे नागरिक अतिशय मेहनती असतात व ते कुठल्याही परिस्थितीत काम करू शकतात. अगदी चंद्रावरदेखील नोकऱ्या निघाल्या तर ते तेथेदेखील जाऊ शकतात. देशात जर बिहारी नसतील तर कारखाने बंद होतील, असे वादग्रस्त वक्तव्य बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी केले. लोकसभा निवडणुकांसाठी संकल्पपत्र तयार करण्यासाठी भाजपातर्फे सुरू करण्यात आलेल्या ‘भाजपाच्या मन की बात’ या मोहिमेअंतर्गत ते नागपुरात आले होते. यावेळी पत्रपरिषदेदरम्यान ते बोलत होते.

ठळक मुद्देबिहारी नसतील तर देशातील कारखाने बंद होतील

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बिहारचे नागरिक अतिशय मेहनती असतात व ते कुठल्याही परिस्थितीत काम करू शकतात. अगदी चंद्रावरदेखील नोकऱ्या निघाल्या तर ते तेथेदेखील जाऊ शकतात. देशात जर बिहारी नसतील तर कारखाने बंद होतील, असे वादग्रस्त वक्तव्य बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी केले. लोकसभा निवडणुकांसाठी संकल्पपत्र तयार करण्यासाठी भाजपातर्फे सुरू करण्यात आलेल्या ‘भाजपाच्या मन की बात’ या मोहिमेअंतर्गत ते नागपुरात आले होते. यावेळी पत्रपरिषदेदरम्यान ते बोलत होते.दोन वेळच्या जेवणाच्या चिंतेत जर कुणी राज्याबाहेर जात असेल तर तो चिंतेचा विषय आहे. मात्र जास्त पैसे कमविण्यासाठी बाहेर जाण्यात काहीही वावगे नाही. प्रत्येकाला तो अधिकार आहे. गुजरात, पंजाबसारख्या राज्यातील लोकदेखील रोजगारासाठी अमेरिका व कॅनडाला जातात. बिहारमध्ये महाराष्ट्रातीलदेखील अनेक लोक आहेत. अशा स्थितीत बिहारींच्या बाहेर काम करण्यावर आक्षेप असण्याचे कारण नाही. तसेदेखील मराठी जनता बिहारींच्या विरोधात नाही. राजकारणातूनच विरोधाचे प्रकार घडतात, असे सुशील कुमार मोदी म्हणाले. बिहारचा विकासदर देशात सर्वात जास्त असून रोजगारदेखील मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. बिहारमधून मजूर का येत नाही, असे इतर राज्यांतील मुख्यमंत्री फोन करून विचारत असल्याचे त्यांनी सांगितले.राफेल प्रकरणात राहुल गांधी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरदेखील चुकीचे संदर्भ देऊन आरोप करत आहेत. हा न्यायालयाचा अपमानच आहे. कॉंग्रेसकडे खरोखरच काही तथ्य असतील तर त्यांनी पुनर्विचार याचिका दाखल करायला हवी होती. त्यांनी तसे का केले नाही, असा सवाल मोदी यांनी उपस्थित केला.शत्रुघ्न हे गर्दी खेचायला प्रियंका चोप्रा नाहीतयावेळी त्यांनी भाजपाचे असंतुष्ट खासदार शत्रुघ्न सिन्हा यांच्यावरदेखील टीकास्त्र सोडले. शत्रुघ्न यांना असे वाटते की आजही त्यांचा ‘जलवा’ कायम आहे. मात्र उभे राहिल्यावर लगेच गर्दी खेचायला ते काही प्रियंका चोप्रा नाहीत. शत्रुघ्न सिन्हा यांनी २०१० मध्ये विधानसभा निवडणुकांत भाजपाचा प्रचार केला नव्हता. मात्र तेव्हा भाजपाला बिहारमध्ये दणदणीत विजय मिळाला होता. शत्रुघ्न सिन्हा यांनी पाटणातून निवडणूक लढवून दाखवावी, असे आव्हानच मोदी यांनी दिले.पक्ष आपलेच जाहीरनामे गंभीरतेने घेत नाहीनिवडणुकांच्या तोंडावर राजकीय पक्षांकडून आश्वासने देणारे जाहीरनामे मांडण्यात येतात. मात्र जनता व राजकीय पक्ष या जाहीरनाम्यांना निवडणुकांनंतर गंभीरतेने घेत नाहीत, असा दावा सुशील कुमार मोदी यांनी केला. भाजपाने लोकसभा निवडणुकांसाठी संकल्पपत्र तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली असून १० कोटी नागरिकांशी यासाठी थेट संपर्क साधण्यात येणार आहेत. तसेच देशात ३०० ‘ई’ रथ तयार करण्यात आले असून ते ४० दिवस फिरतील, असे त्यांनी सांगितले.

 

 

टॅग्स :Biharबिहारministerमंत्री