शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
6
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
7
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
8
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
9
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
10
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
11
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
12
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
13
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
14
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
15
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
16
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
17
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
18
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
19
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
20
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय

बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांचे वक्तव्य : बिहारी चंद्रावरदेखील काम करू शकतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2019 21:01 IST

बिहारचे नागरिक अतिशय मेहनती असतात व ते कुठल्याही परिस्थितीत काम करू शकतात. अगदी चंद्रावरदेखील नोकऱ्या निघाल्या तर ते तेथेदेखील जाऊ शकतात. देशात जर बिहारी नसतील तर कारखाने बंद होतील, असे वादग्रस्त वक्तव्य बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी केले. लोकसभा निवडणुकांसाठी संकल्पपत्र तयार करण्यासाठी भाजपातर्फे सुरू करण्यात आलेल्या ‘भाजपाच्या मन की बात’ या मोहिमेअंतर्गत ते नागपुरात आले होते. यावेळी पत्रपरिषदेदरम्यान ते बोलत होते.

ठळक मुद्देबिहारी नसतील तर देशातील कारखाने बंद होतील

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बिहारचे नागरिक अतिशय मेहनती असतात व ते कुठल्याही परिस्थितीत काम करू शकतात. अगदी चंद्रावरदेखील नोकऱ्या निघाल्या तर ते तेथेदेखील जाऊ शकतात. देशात जर बिहारी नसतील तर कारखाने बंद होतील, असे वादग्रस्त वक्तव्य बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी केले. लोकसभा निवडणुकांसाठी संकल्पपत्र तयार करण्यासाठी भाजपातर्फे सुरू करण्यात आलेल्या ‘भाजपाच्या मन की बात’ या मोहिमेअंतर्गत ते नागपुरात आले होते. यावेळी पत्रपरिषदेदरम्यान ते बोलत होते.दोन वेळच्या जेवणाच्या चिंतेत जर कुणी राज्याबाहेर जात असेल तर तो चिंतेचा विषय आहे. मात्र जास्त पैसे कमविण्यासाठी बाहेर जाण्यात काहीही वावगे नाही. प्रत्येकाला तो अधिकार आहे. गुजरात, पंजाबसारख्या राज्यातील लोकदेखील रोजगारासाठी अमेरिका व कॅनडाला जातात. बिहारमध्ये महाराष्ट्रातीलदेखील अनेक लोक आहेत. अशा स्थितीत बिहारींच्या बाहेर काम करण्यावर आक्षेप असण्याचे कारण नाही. तसेदेखील मराठी जनता बिहारींच्या विरोधात नाही. राजकारणातूनच विरोधाचे प्रकार घडतात, असे सुशील कुमार मोदी म्हणाले. बिहारचा विकासदर देशात सर्वात जास्त असून रोजगारदेखील मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. बिहारमधून मजूर का येत नाही, असे इतर राज्यांतील मुख्यमंत्री फोन करून विचारत असल्याचे त्यांनी सांगितले.राफेल प्रकरणात राहुल गांधी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरदेखील चुकीचे संदर्भ देऊन आरोप करत आहेत. हा न्यायालयाचा अपमानच आहे. कॉंग्रेसकडे खरोखरच काही तथ्य असतील तर त्यांनी पुनर्विचार याचिका दाखल करायला हवी होती. त्यांनी तसे का केले नाही, असा सवाल मोदी यांनी उपस्थित केला.शत्रुघ्न हे गर्दी खेचायला प्रियंका चोप्रा नाहीतयावेळी त्यांनी भाजपाचे असंतुष्ट खासदार शत्रुघ्न सिन्हा यांच्यावरदेखील टीकास्त्र सोडले. शत्रुघ्न यांना असे वाटते की आजही त्यांचा ‘जलवा’ कायम आहे. मात्र उभे राहिल्यावर लगेच गर्दी खेचायला ते काही प्रियंका चोप्रा नाहीत. शत्रुघ्न सिन्हा यांनी २०१० मध्ये विधानसभा निवडणुकांत भाजपाचा प्रचार केला नव्हता. मात्र तेव्हा भाजपाला बिहारमध्ये दणदणीत विजय मिळाला होता. शत्रुघ्न सिन्हा यांनी पाटणातून निवडणूक लढवून दाखवावी, असे आव्हानच मोदी यांनी दिले.पक्ष आपलेच जाहीरनामे गंभीरतेने घेत नाहीनिवडणुकांच्या तोंडावर राजकीय पक्षांकडून आश्वासने देणारे जाहीरनामे मांडण्यात येतात. मात्र जनता व राजकीय पक्ष या जाहीरनाम्यांना निवडणुकांनंतर गंभीरतेने घेत नाहीत, असा दावा सुशील कुमार मोदी यांनी केला. भाजपाने लोकसभा निवडणुकांसाठी संकल्पपत्र तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली असून १० कोटी नागरिकांशी यासाठी थेट संपर्क साधण्यात येणार आहेत. तसेच देशात ३०० ‘ई’ रथ तयार करण्यात आले असून ते ४० दिवस फिरतील, असे त्यांनी सांगितले.

 

 

टॅग्स :Biharबिहारministerमंत्री