शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

कट्टरता कम्युनिस्टांनी आणली, हिंदूंनी नव्हे!  मनमोहन वैद्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2020 23:09 IST

कट्टरता हा शब्द भारतीय नाही. हा शब्द कम्युनिझममधून आलेला आहे. हिंदू किंवा संघ स्वयंसेवक निष्ठावान असतो, विचारक असतो. हिंदुत्व ही एक दृष्टी, तत्त्वज्ञान आणि विचारांचे बीज असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह डॉ. मनमोहन वैद्य यांनी केले.

ठळक मुद्दे पश्चिमेकडील शब्द आणि आपल्या विचारांत तफावतदुसऱ्या नागपूर लिटररी फेस्टिव्हलचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कट्टरता हा शब्द भारतीय नाही. हा शब्द कम्युनिझममधून आलेला आहे. हिंदू किंवा संघ स्वयंसेवक निष्ठावान असतो, विचारक असतो. हिंदुत्व ही एक दृष्टी, तत्त्वज्ञान आणि विचारांचे बीज असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह डॉ. मनमोहन वैद्य यांनी केले.झील फाऊंडेशन व नागपूर लिटरेचर फाऊंडेशनच्या वतीने उत्तर अंबाझरी मार्ग, सीताबर्डी येथील सोहम सभागृहात दुसºया द्विदिवसीय नागपूर लिटररी फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी या महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर महात्मा गांधी हिंदी विश्वविद्यालयाचे कुलपती डॉ. रजनीश शुक्ल, सच्चिदानंद जोशी, डॉ. हर्षवर्धन मार्डीकर, जनरल ए.एस. देव उपस्थित होते.पाश्चिमात्यांना आपले विचार, आपली संस्कृती इतरांवर लादण्याची सवय आहे. प्रत्येकाची विचारप्रणाली भिन्न असते आणि त्यातूनच शब्दांची निर्मिती होत असते. त्यामुळे आपल्या स्वभावाला परिचायक असलेल्या आपल्याच शब्दांचा वापर आपण करणे योग्य ठरेल. पश्चिमेकडील शब्दांचे अनुवाद आपल्या भावनेशी निगडित शब्दांशी जोडले तर विपर्यास होईल. येथील संस्कृतीत जीवनाचे चिंतन आध्यात्मिक आहे आणि म्हणूनच भारत एक व्यक्तिमत्त्व म्हणून उदयास येतो. ‘टॉलरन्स’ हा शब्द आपल्यासाठी अत्यंत गौण आहे. मात्र, तो आजकाल सर्रास वापरला जात आहे. आपल्याला त्या शब्दाच्या अर्थाच्या पलीकडे जाऊन विचार करावा लागणार असून, भारतीय विचार विभक्त होण्याचा नाही तर सामावून घेण्याचा असल्याचे मत डॉ. मनमोहन वैद्य यांनी व्यक्त केले. धर्म हा आचरणाचा भाग आहे आणि तो व्यक्तिपरत्वे बदलतो. आपल्याकडे देण्याच्या वृत्तीला, कर्तव्याला, जबाबदारीला धर्म संबोधले गेले आहे. म्हणून आपली धर्माची संकल्पना जोडण्याशी निगडित आहे, तोडण्याशी नव्हे. जो समाज राज्यव्यवस्थेवर निर्भर असतो, तो निस्तेज असतो. म्हणून पुरुषार्थ कमावण्याची सवय समाजाला लावावी लागेल, असे आवाहन वैद्य यांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे निवेदन श्वेता शेलगावकर यांनी केले तर आभार सई देशपांडे यांनी मानले.

टॅग्स :HinduहिंदूCommunist Party of indiaकम्युनिस्ट पार्टी आॅफ इंडिया