शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

शिक्षक नियुक्त्यांमध्ये मोठा घोटाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 21:50 IST

शालेय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांमध्ये मोठा घोटाळा सुरू असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. शिक्षणाधिकारी व शाळा व्यवस्थापन हातमिळवणी करून अवैध पद्धतीने नियुक्ती प्रक्रिया राबवित आहेत. त्यामुळे ते दोघेही मालामाल होत आहेत, पण शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या अनियमिततेच्या जात्यात भरडले जात आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ही बाब गंभीरतेने घेऊन याचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी यासंदर्भात स्वत:च जनहित याचिका दाखल करून घेतली आहे.

ठळक मुद्देहायकोर्टाची गंभीर दखल : स्वत: दाखल केली जनहित याचिका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शालेय शिक्षकशिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांमध्ये मोठा घोटाळा सुरू असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. शिक्षणाधिकारी व शाळा व्यवस्थापन हातमिळवणी करून अवैध पद्धतीने नियुक्ती प्रक्रिया राबवित आहेत. त्यामुळे ते दोघेही मालामाल होत आहेत, पण शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या अनियमिततेच्या जात्यात भरडले जात आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ही बाब गंभीरतेने घेऊन याचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी यासंदर्भात स्वत:च जनहित याचिका दाखल करून घेतली आहे.शालेय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांमध्ये बेकायदेशीर प्रकार सुरू आहे. एका विशिष्ट पद्धतीने ही प्रक्रिया राबविली जात आहे. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा असल्यास, त्या जागा भरण्याची परवानगी मिळावी यासाठी शाळा व्यवस्थापन शिक्षणाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर करते. त्यानंतर शाळा व्यवस्थापनाला स्वत:च्या जबाबदारीवर नियुक्त्या करण्याची परवानगी दिली जाते. त्यानुसार शाळा व्यवस्थापनाद्वारे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांच्या नियुक्त्या केल्या जातात. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी २-३ वर्षे नोकरी केल्यानंतर वरिष्ठ अधिकारी काहीतरी त्रुटी काढून त्यांच्या नियुक्त्यांची मान्यता रद्द करते. नियुक्त्यांतील अनियमिततेसाठी शिक्षणाधिकाऱ्यांवर काहीच कारवाई केली जात नाही. त्याऐवजी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे बळी घेतले जातात. त्यानंतर नियुक्त्यांचे चक्र परत सुरू होते. नियुक्त्यांमध्ये पुन्हा तिच प्रक्रिया राबविली जाते. नियुक्त्यांची मान्यता रद्द झाल्यानंतर रिक्त जागा भरण्यासाठी शाळा व्यवस्थापन परत प्रस्ताव सादर करते व त्यांना स्वत:च्या जबाबदारीवर नियुक्त्या करण्याची परवानगी दिली जाते.या घोटाळ्यात फसलेल्या अनेक पीडित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी न्याय मिळविण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांचे प्रकरण ऐकल्यानंतर नियुक्त्यांमधील अनियमितता प्रकाशात आली. त्यामुळे न्यायालयाने याचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी हे प्रकरण जनहित याचिका म्हणून दाखल करून घेतले. तसेच, याचिकेचे कामकाज पाहण्यासाठी अ‍ॅड. पी. ए. जीभकाटे यांची न्यायालय मित्र म्हणून नियुक्ती केली.सरकारला मागितले स्पष्टीकरणउच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व मुरलीधर गिरटकर यांनी राज्य सरकारला नोटीस बजावून यावर स्पष्टीकरण सादर करण्याचा आदेश दिला आहे. प्रकरणावर २६ सप्टेंबर रोजी पुढील सुनावणी निश्चित करण्यात आली आहे. सरकारच्या उत्तराकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयTeacherशिक्षक