शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

उपराजधानीत २२ फेब्रुवारीच्या भीम आर्मी मेळाव्याला कठोर अटींसह परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 13:53 IST

भीम आर्मी संघटनेच्या वतीने रेशीमबाग मैदानावर दि. २२ फेब्रुवारी रोजी आयोजित कार्यकर्ता मेळाव्याला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी कठोर अटींसह परवानगी दिली आहे.

ठळक मुद्देउल्लंघन झाल्यास अवमानना कारवाई होईल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भीम आर्मी संघटनेच्या वतीने रेशीमबाग मैदानावर दि. २२ फेब्रुवारी रोजी आयोजित कार्यकर्ता मेळाव्याला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी कठोर अटींसह परवानगी दिली आहे. तसेच, अटींचे उल्लंघन झाल्यास जबाबदार व्यक्तींवर फौजदारी व न्यायालय अवमाननेची कारवाई केली जाईल असे निर्णयात स्पष्ट केले. न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व माधव जामदार यांनी हा निर्णय दिला.आयोजकांनी केवळ दुपारी २ ते सायंकाळी ५ या वेळेतच हा मेळावा घ्यावा व सायंकाळी ६ वाजेपर्यंत मैदान पूर्णपणे रिकामे करावे. कार्यकर्ता मेळाव्याच्या मर्यादा ओलांडल्या जाणार नाही याची काळजी घ्यावी. मेळाव्याला विरोध प्रदर्शन आंदोलनामध्ये परिवर्तित होऊ देऊ नये. मेळाव्याचा राजकीय हेतुसाठी उपयोग करू नये. समाजामध्ये एकमेकांविषयी द्वेष निर्माण होईल, देश व नागरिकांची प्रतिमा खालावेल, देशाच्या सार्वभौमत्वतेला व अखंडतेला धक्का पोहचेल आणि कायदा व सुव्यवस्था संपुष्टात येईल अशी कोणतीही कृती वा वक्तव्ये मेळाव्यात सहभागी होणाऱ्यांनी करू नयेत. मेळावा शांतता व सन्मानपूर्ण वातावरणात पार पाडावा या अटी न्यायालयाने लागू केल्या. तसेच, संघटनेचे संस्थापक अ?ॅड. चंद्रशेखर आझाद (रावन) व जिल्हाध्यक्ष प्रफु ल्ल शेंडे (मेळावा आयोजक) यांनी या अटींचे काटेकोर पालन केले जाईल असे हमीपत्र न्यायालयाच्या प्रबंधक कार्यालयात सादर करावे असेही न्यायालयाने सांगितले.१७ फेब्रुवारीला कोतवालीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांनी कायदा व सुव्यवस्थेच्या कारणावरून मेळाव्याला परवानगी नाकारली होती. त्या आदेशाविरुद्ध भीम आर्मीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने ती याचिका मंजूर करून १७ फेब्रुवारीचा वादग्रस्त आदेश रद्द केला आणि मेळाव्याला सशर्त परवानगी दिली. पोलिसांनी वादग्रस्त आदेशात केवळ कायदा व सुव्यवस्थेच्या कारणावरून परवानगी नाकारण्यात येत असल्याचे कारण दिले होते. त्यानंतर त्यांनी न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करून अन्य मुद्दे मांडले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भीम आर्मी यांची विचारधारा परस्परभिन्न आहे. तसेच, आझाद व शेंडे नेहमीच कायद्याचे उल्लंघन करतात. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता भीम आर्मीला हेडगेवार स्मारक भवनाजवळ असलेल्या रेशीमबाग मैदानावर कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्याची परवानगी देण्यात आली नाही असे पोलिसांनी सांगितले होते. याचिकाकर्त्यांतर्फे अ?ॅड. फिरदोस मिर्झा तर, सरकारतर्फे अ?ॅड. केतकी जोशी यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :Courtन्यायालय