शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

उपराजधानीत २२ फेब्रुवारीच्या भीम आर्मी मेळाव्याला कठोर अटींसह परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 13:53 IST

भीम आर्मी संघटनेच्या वतीने रेशीमबाग मैदानावर दि. २२ फेब्रुवारी रोजी आयोजित कार्यकर्ता मेळाव्याला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी कठोर अटींसह परवानगी दिली आहे.

ठळक मुद्देउल्लंघन झाल्यास अवमानना कारवाई होईल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भीम आर्मी संघटनेच्या वतीने रेशीमबाग मैदानावर दि. २२ फेब्रुवारी रोजी आयोजित कार्यकर्ता मेळाव्याला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी कठोर अटींसह परवानगी दिली आहे. तसेच, अटींचे उल्लंघन झाल्यास जबाबदार व्यक्तींवर फौजदारी व न्यायालय अवमाननेची कारवाई केली जाईल असे निर्णयात स्पष्ट केले. न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व माधव जामदार यांनी हा निर्णय दिला.आयोजकांनी केवळ दुपारी २ ते सायंकाळी ५ या वेळेतच हा मेळावा घ्यावा व सायंकाळी ६ वाजेपर्यंत मैदान पूर्णपणे रिकामे करावे. कार्यकर्ता मेळाव्याच्या मर्यादा ओलांडल्या जाणार नाही याची काळजी घ्यावी. मेळाव्याला विरोध प्रदर्शन आंदोलनामध्ये परिवर्तित होऊ देऊ नये. मेळाव्याचा राजकीय हेतुसाठी उपयोग करू नये. समाजामध्ये एकमेकांविषयी द्वेष निर्माण होईल, देश व नागरिकांची प्रतिमा खालावेल, देशाच्या सार्वभौमत्वतेला व अखंडतेला धक्का पोहचेल आणि कायदा व सुव्यवस्था संपुष्टात येईल अशी कोणतीही कृती वा वक्तव्ये मेळाव्यात सहभागी होणाऱ्यांनी करू नयेत. मेळावा शांतता व सन्मानपूर्ण वातावरणात पार पाडावा या अटी न्यायालयाने लागू केल्या. तसेच, संघटनेचे संस्थापक अ?ॅड. चंद्रशेखर आझाद (रावन) व जिल्हाध्यक्ष प्रफु ल्ल शेंडे (मेळावा आयोजक) यांनी या अटींचे काटेकोर पालन केले जाईल असे हमीपत्र न्यायालयाच्या प्रबंधक कार्यालयात सादर करावे असेही न्यायालयाने सांगितले.१७ फेब्रुवारीला कोतवालीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांनी कायदा व सुव्यवस्थेच्या कारणावरून मेळाव्याला परवानगी नाकारली होती. त्या आदेशाविरुद्ध भीम आर्मीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने ती याचिका मंजूर करून १७ फेब्रुवारीचा वादग्रस्त आदेश रद्द केला आणि मेळाव्याला सशर्त परवानगी दिली. पोलिसांनी वादग्रस्त आदेशात केवळ कायदा व सुव्यवस्थेच्या कारणावरून परवानगी नाकारण्यात येत असल्याचे कारण दिले होते. त्यानंतर त्यांनी न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करून अन्य मुद्दे मांडले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भीम आर्मी यांची विचारधारा परस्परभिन्न आहे. तसेच, आझाद व शेंडे नेहमीच कायद्याचे उल्लंघन करतात. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता भीम आर्मीला हेडगेवार स्मारक भवनाजवळ असलेल्या रेशीमबाग मैदानावर कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्याची परवानगी देण्यात आली नाही असे पोलिसांनी सांगितले होते. याचिकाकर्त्यांतर्फे अ?ॅड. फिरदोस मिर्झा तर, सरकारतर्फे अ?ॅड. केतकी जोशी यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :Courtन्यायालय