शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

दोन समाजात हिंसा भडकवायचा प्रयत्न, चिथावणी देणाऱ्यांपासून सावध राहा; मोहन भागवतांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2023 06:04 IST

राम मंदिरात श्री रामलल्लाच्या प्रवेशाने, प्रत्येकाच्या हृदयात आपल्या मनातील राम जागा व्हावा, मनाची अयोध्या सजवावी, असे आवाहन सरसंघचालकांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : देशात काही तत्वांकडून चिथावणी देत हिंसा भडकविण्याचा प्रयत्न सुरू आहे. आपापसातील संघर्ष वाढत जावेत यासाठीही जोरदार प्रयत्न होत आहेत. या गोष्टींना वेळेत ओळखून समाजाने या अपप्रचाराच्या मायाजालातून स्वतःला बाहेर काढावे, असे आवाहन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी व शस्त्रपूजन उत्सवात ते बोलत होते. मंचावर प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध गायक व संगीतकार शंकर महादेवन उपस्थित होते. 

भागवत म्हणाले की, निवडणूकीत भावना भडकावून मते मिळविण्याचे प्रयत्न करणाऱ्यांपासून सावध राहा. राजकीय स्वार्थासाठी प्रतिस्पर्ध्याला पराभूत करण्याच्या हेतूने अशा अनिष्ट शक्तींशी युतीचा अविवेक केला जात आहे, असेही ते म्हणाले.

मणिपूर हिंसाचारावर... 

मणिपूरमधील हिंसेबाबत सरसंघचालकांनी चिंता व्यक्त केली. हा हिंसाचार नियोजितरित्या करण्यात आला. या हिंसाचारामागे सीमेपलीकडील अतिरेकीही होते का? या परस्पर संघर्षाला जातीय वा धार्मिक स्वरूप देण्याचा प्रयत्न का? असे प्रश्न त्यांनी केले.

कुणाला कराल मतदान? 

येत्या लोकसभेच्या निवडणुकीत भावना भडकावून मते मिळविण्याचे प्रयत्न होतील. देशाची एकात्मता, अखंडता, अस्मिता आणि विकासाचे मुद्दे लक्षात घेऊन प्रत्येकाने मतदान करावे. जे पर्याय उपलब्ध आहेत, त्यातील सर्वात चांगल्या पर्यायाला मतदान करा.

रामललाची प्राणप्रतिष्ठा...

२२ जानेवारीला अयोध्येतील राम मंदिराच्या गर्भगृहात श्री रामललाची प्राणप्रतिष्ठा होईल. राममंदिरात श्री रामलल्लाच्या प्रवेशाने, प्रत्येकाच्या हृदयात आपल्या मनातील राम जागा व्हावा, मनाची अयोध्या सजवावी, असे आवाहन सरसंघचालकांनी यावेळी केले.

 

टॅग्स :DasaraदसराRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघMohan Bhagwatमोहन भागवत