शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
2
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
3
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
4
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
5
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
6
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
7
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
8
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
9
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
10
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
11
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
12
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
13
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
14
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
15
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
16
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
17
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
18
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
19
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
20
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका

दोन समाजात हिंसा भडकवायचा प्रयत्न, चिथावणी देणाऱ्यांपासून सावध राहा; मोहन भागवतांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2023 06:04 IST

राम मंदिरात श्री रामलल्लाच्या प्रवेशाने, प्रत्येकाच्या हृदयात आपल्या मनातील राम जागा व्हावा, मनाची अयोध्या सजवावी, असे आवाहन सरसंघचालकांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : देशात काही तत्वांकडून चिथावणी देत हिंसा भडकविण्याचा प्रयत्न सुरू आहे. आपापसातील संघर्ष वाढत जावेत यासाठीही जोरदार प्रयत्न होत आहेत. या गोष्टींना वेळेत ओळखून समाजाने या अपप्रचाराच्या मायाजालातून स्वतःला बाहेर काढावे, असे आवाहन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी व शस्त्रपूजन उत्सवात ते बोलत होते. मंचावर प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध गायक व संगीतकार शंकर महादेवन उपस्थित होते. 

भागवत म्हणाले की, निवडणूकीत भावना भडकावून मते मिळविण्याचे प्रयत्न करणाऱ्यांपासून सावध राहा. राजकीय स्वार्थासाठी प्रतिस्पर्ध्याला पराभूत करण्याच्या हेतूने अशा अनिष्ट शक्तींशी युतीचा अविवेक केला जात आहे, असेही ते म्हणाले.

मणिपूर हिंसाचारावर... 

मणिपूरमधील हिंसेबाबत सरसंघचालकांनी चिंता व्यक्त केली. हा हिंसाचार नियोजितरित्या करण्यात आला. या हिंसाचारामागे सीमेपलीकडील अतिरेकीही होते का? या परस्पर संघर्षाला जातीय वा धार्मिक स्वरूप देण्याचा प्रयत्न का? असे प्रश्न त्यांनी केले.

कुणाला कराल मतदान? 

येत्या लोकसभेच्या निवडणुकीत भावना भडकावून मते मिळविण्याचे प्रयत्न होतील. देशाची एकात्मता, अखंडता, अस्मिता आणि विकासाचे मुद्दे लक्षात घेऊन प्रत्येकाने मतदान करावे. जे पर्याय उपलब्ध आहेत, त्यातील सर्वात चांगल्या पर्यायाला मतदान करा.

रामललाची प्राणप्रतिष्ठा...

२२ जानेवारीला अयोध्येतील राम मंदिराच्या गर्भगृहात श्री रामललाची प्राणप्रतिष्ठा होईल. राममंदिरात श्री रामलल्लाच्या प्रवेशाने, प्रत्येकाच्या हृदयात आपल्या मनातील राम जागा व्हावा, मनाची अयोध्या सजवावी, असे आवाहन सरसंघचालकांनी यावेळी केले.

 

टॅग्स :DasaraदसराRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघMohan Bhagwatमोहन भागवत