शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
7
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
8
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
9
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
10
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
11
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
12
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
13
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
14
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
15
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
16
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
17
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
18
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
19
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
20
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?

होळी पेटविण्यासाठी सर्वोत्कृष्ट वेळ सायंकाळी ८.५६ नंतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 13:09 IST

बुधवार २ ० मार्च रोजी हुताशनि पौर्णिमा (होळी) आहे. या दिवशी भद्रेच्या पुच्छकाळात म्हणजेच सायंकाळी ५.०८ ते ६.२० वाजेपर्यंत होलिका प्रज्वलित केल्यास हरकत नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बुधवार २ ० मार्च रोजी हुताशनि पौर्णिमा (होळी) आहे. या दिवशी सकाळी १०.४३ वाजता पौर्णिमा प्रारंभ होत असून, २१ मार्च रोजी सकाळी ७.१० वाजता पौर्णिमा समाप्ती आहे. या दिवशी सकाळी १०.४३ वाजता भद्रेचा प्रारंभ असून, भद्रेची समाप्ती रात्री ८.५६ वाजता आहे. त्यामुळे भद्राप्रमुख सोडून भद्रेच्या पुच्छकाळात म्हणजेच सायंकाळी ५.०८ ते ६.२० वाजेपर्यंत होलिका प्रज्वलित केल्यास हरकत नाही. परंतु होळी प्रज्वलित करण्यासाठी सर्वोत्कृष्ट मुहूर्त रात्री ८.५६ नंतर आहे, असे आंतरराष्ट्रीय ज्योतिषाचार्य डॉ. अनिल वैद्य यांनी सांगितले.यावेळी उद्योग वेळ असून त्याचा स्वामी सूर्य म्हणजे रवि याचा शुभ प्रभाव वातावरणात राहणार आहे. सर्वसाधारणपणे सूर्यास्तानंतर दोन तासांनी होलिकादहन करावे, असा शास्त्रात उल्लेख आहे. या दिवशी पूर्वाफाल्गुनी नक्षत्र, शूल योग असून चंद्र कन्या राशीतून भ्रमण करणार असल्याचे डॉ. वैद्य म्हणाले. होळीच्या दिवशी मन्वादी तिथी आहे. चौदा मन्वंतरांच्या आरंभाच्या वर्षातून चौदा तिथी असतात. त्यातील फाल्गुन शुद्धा पौर्णिमा ही एक प्रारंभ तिथी आहे. दुपारी १२ ते १.३० राहुकाळ आहे. या सुमारास मंगळ ग्रह सायंकाळी पश्चिमेला दिसेल. गुरु ग्रह जो सणांचा आनंद द्विगुणित करतो तो मध्यरात्रीला पूर्वेच्या अवकाशात दिसेल. शनि मध्यरात्री माथ्यावर तर प्रेमाचा कारक शुक्र ग्रह पहाटे पूर्वकपाली दिसेल. मनाचा कारक ग्रह चंद्र कन्या या बुधाच्या राशीत चार अंश ५८ कला, १२ विकलावर असल्यामुळे मोठा दिसेल व वातावरण आणि अवकाश चंद्रप्रकाशात न्हाऊन निघेल, असे डॉ. वैद्य यांनी सांगितले. हा दिवस शुभ कार्यास अशुभ आहे. या दिवशी विष्णुवदिन मेषायन आहे. २१ मार्चला धुलिवंदनाला कर असल्यामुळे २० व २१ मार्च हे दिवस वर्ज्य दिवस आणि क्षयदिन आहेत, असेही डॉ. वैद्य यांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Holiहोळी