शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
3
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
4
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
5
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
6
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
7
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
8
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
9
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
10
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
11
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
12
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
13
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
14
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
15
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
16
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
17
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
18
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
19
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
20
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास

बाबासाहेबांच्या वस्तूंचे होणार चिरकाल जतन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2021 12:45 IST

डॉ. आंबेडकर यांनी अनेक महत्त्वपूर्ण समारंभात वापरलेला ऐतिहासिक कोट व इतर कपडे विविध वस्तूंसह देशाच्या संविधानाचा मसुदा ज्या टाईपराइटरवर सर्वप्रथम तयार करण्यात आला होता, तो टाईपराइटर आदी अनेक ऐतिहासिक वस्तू आणि दस्तावेज शांतिवन चिचोली येथील संग्रहालयात ठेवल्या आहेत.

ठळक मुद्देरासायनिक प्रक्रिया : ३५० पेक्षा अधिक वस्तूंचा समावेश

आनंद डेकाटे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वापरलेला ऐतिहासिक कोट व इतर कपडे विविध वस्तूंसह ऐतिहासिक दस्तावेज आता चिरकाल जतन करून ठेवण्यात येत आहे. या संग्रहालयात बाबासाहेबांशी संबंधित जवळपास ३५० पेक्षा अधिक वस्तूंचा समावेश आहे.

देशाच्या संविधानाचा मसुदा ज्या टाईपराइटरवर सर्वप्रथम तयार करण्यात आला होता, त्या टाईपराइटरचाही यात समावेश आहे. ‘नॅशनल रिसर्च लेबोरेटरी फॉर कंझर्वेशन ऑफ कल्चरल प्रॉपर्टीज लखनऊ’ या केंद्र सरकारच्या संस्थेतर्फे या ऐतिहासिक वस्तूंवर नागपुरातील मध्यवर्ती संग्रहालयातील प्रयोगशाळेत रासायनिक प्रक्रिया केली जात आहे. आतापर्यंत ९८ टक्के वस्तूंवर प्रक्रिया झाली आहे. या प्रक्रियेनंतर या वस्तू तब्बल १०० वर्षे टिकून राहणार आहेत, हे विशेष.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी धम्मसेनानी वामनराव गोडबोले यांनी कळमेश्वर रोडवर चिचोली या गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील बौद्ध प्रशिक्षण केंद्र साकारण्याचा निर्णय घेतला. १९५७ मध्ये गोपिकाबाई बाजीराव ठाकरे या महिलेने त्यांना येथे ११ एकर जागा दान दिली. या जागेवर गोडबोले यांनी ‘शांतिवन’ उभारले. या परिसरातच त्यांनी एक छोटेखानी संग्रहालय उभारले. त्यात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अनेक महत्त्वपूर्ण समारंभात वापरलेले कपडे, कोट, घरगुती कपडे, हॅट, छत्री, पेन, कंदील आदींसह दैनंदिन वापराच्या अनेक वस्तूंसह देशाच्या संविधानाचा मसुदा ज्या टाईपराइटरवर सर्वप्रथम तयार करण्यात आला होता, तो टाईपराइटर आदी अनेक ऐतिहासिक वस्तू आणि दस्तावेज शांतिवन चिचोली येथील संग्रहालयात ठेवल्या आहेत.

मागील काही वर्षांपासून देशाचा हा ऐतिहासिक ठेवा नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला होता. कपड्यांना वाळवी लागणे सुरू झाले होते. तेव्हा शांतिवन चिचोली येथील भारतीय बौद्ध परिषदेने या वस्तूंचे जतन करण्यासाठी शासनाकडे मागणी केली. शासनाने ही मागणी मान्य करीत या वस्तूंवर रासायनिक प्रक्रिया करून त्याचे जतन करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

- संग्रहालयाची भव्य इमारत उभी

शांतिवन चिचोलीसाठी सरकारने ४० कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार केला आहे. यातून येथे भव्य वस्तुसंग्रहालय आणि शांती अतिथी गृह, तसेच मेडिटेशन सेंटर उभारण्यात आले आहे. जवळपास सर्वच इमारती तयार झाल्या आहेत. परंतु, निधीअभावी अंतर्गत कामे रखडली आहेत. राज्य सरकारने उर्वरित निधी उपलब्ध करून दिल्यास सर्वच इमारती लोकांसाठी खुल्या करता येतील. महामानवाच्या वस्तू या नवनिर्मित संग्रहालयात लोकांसाठी उपलब्ध होतील.

संजय पाटील, कार्यवाह, भारतीय बौद्ध परिषद

टॅग्स :SocialसामाजिकDr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकर