शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
3
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
4
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
5
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
6
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
7
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
8
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
9
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
10
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
11
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
13
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
14
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
15
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
16
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
17
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
18
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
19
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
20
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!

बेलसरे, भारंबेवर निवडणुकीचा भार

By admin | Updated: March 12, 2015 02:47 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणांसाठी आॅगस्टनंतर निवडणूका होणार आहेत.

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणांसाठी आॅगस्टनंतर निवडणूका होणार आहेत. यासाठी सहाय्यक म्हणून विद्यापीठातील लोकांना संधी न देता सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची तात्पुरती सेवा घेण्यात येणार आहे. विद्यापीठात अधिकारी असतानादेखील बाहेरील व्यक्तींची नियुक्ती करण्यामागे नेमका उद्देश काय आहे याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे विकासकामांसाठी कंपन्यांकडे दान मागणाऱ्या विद्यापीठाकडून ‘आऊटसोर्स’ करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांवर लाखो रुपये खर्च करण्यात येणार आहेत.महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम, १९९४ च्या कलम ४२(१) नुसार ३१ आॅगस्ट रोजी विविध प्राधिकरणांच्या सदस्यांचा कालावधी संपुष्टात येणार आहे. अधिनियमातील ४२(२) च्या तरतुदींनुसार यानंतर निवडणुका घेणे आवश्यक असून त्याचा कार्यक्रम जाहीर करणे गरजेचे आहे. निवडणुकांचे काम सुरळीतपणे पार पाडावे याकरिता विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीत विशेष निवडणूक कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. निवडणुकांचे निर्णय अधिकारी म्हणून विद्यापीठाचे कुलसचिव व सहायक निर्णय अधिकारी म्हणून उपकुलसचिव (सा.प्र.) व उपकुलसचिव (विद्या शाखा) हे काम पाहणार आहेत. परंतु निवडणुकांची वास्तविक प्रक्रिया राबविण्याची जबाबदारी विद्यापीठाचे माजी कुलसचिव सुभाष बेलसरे व माजी उपकुलसचिव भारंबे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. इच्छुकांचे अर्ज मागविणे, त्यांची छाननी करणे, यादी तयार करणे इत्यादी निवडणुकींशी संबंधित कामे त्यांच्याच मार्गदर्शनाखाली होणार आहेत. विद्यापीठाकडून त्यांच्या हाताखाली काम करण्यासाठी कर्मचारीदेखील देण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे निवृत्त होताना जितके वेतन होते,जवळपास तितकेच मानधन या कामासाठी देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.आश्चर्याची बाब म्हणजे विद्यापीठात अनेक कार्यक्षम अधिकारी आहेत. अनेक सहायक उपकुलसचिवांकडे ही जबाबदारी दिली तर ते चांगल्या पद्धतीने कामदेखील करू शकतात व त्यांना अनुभवदेखील मिळू शकतो. परंतु विद्यापीठाने मात्र निवृत्त अधिकाऱ्यांकडून सेवा घेण्याचा निर्णय का घेतला याबाबत संभ्रम कायम आहे. याबाबत प्रतिक्रियेसाठी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.अशोक गोमाशे यांच्याशी संपर्क झाला नाही. या अधिकाऱ्यांची सेवा ही तात्पुरत्या स्वरूपात घेण्यात येणार आहे. अगोदरच विद्यापीठात अधिकाऱ्यांची कमतरता आहे. त्यात जर निवडणुकांचे पूर्णवेळ काम कोणाच्या मागे लावले तर नियमित कामांना फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दोन निवृत्त अधिकाऱ्यांची तज्ज्ञ म्हणून सेवा घेण्यात येत असल्याची माहिती एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने नाव न घेण्याच्या अटीवर दिली. परंतु विद्यापीठातील रिक्त पदे का भरण्यात येत नाही, अशी विचारणा केली असता त्यांनी मौन साधले. (प्रतिनिधी)