शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

बुद्ध व्हा... शुद्ध व्हा....!!!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 22:37 IST

हातात काठी. डोक्यावर निळी टोपी, फाटलेले जोडे, मळकट सदरा नि त्याहून मळकट धोतर ! दीक्षाभूमीवर थांबलेल्या लोकांची आस्थेने विचारपूस करु न बाबासाहेबांचे विचार सांगणारा ७० वर्षीय वृद्ध. वयाने थकलेला, मात्र मनाने अजूनही तरुण असलेल्या वृद्धाचा हा प्रवास आठ वर्षांपासूनचा आहे. केरूआ तुकाराम शिंदे त्या व्यक्तीचे नाव.

ठळक मुद्देदीक्षाभूमीवर भेटलेली निळाई 

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हातात काठी. डोक्यावर निळी टोपी, फाटलेले जोडे, मळकट सदरा नि त्याहून मळकट धोतर ! दीक्षाभूमीवर थांबलेल्या लोकांची आस्थेने विचारपूस करु न बाबासाहेबांचे विचार सांगणारा ७० वर्षीय वृद्ध. वयाने थकलेला, मात्र मनाने अजूनही तरुण असलेल्या वृद्धाचा हा प्रवास आठ वर्षांपासूनचा आहे. केरूआ तुकाराम शिंदे त्या व्यक्तीचे नाव.जालना जिल्ह्यातील एका छोटाशा गावातून ते मंगळवारी दीक्षाभूमीला पोहचले. त्यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले. लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा बायकोसोबत दीक्षाभूमीला आलो होतो. नंतर संसाराला लागलो. आठ वर्षांपूर्वी पत्नी वारली. तेव्हापासून दरवर्षी येतो. वय झाल्यामुळे घरची मंडळी जाऊ देत नाही, गुपचूप येतो. येथे येऊन आपल्या लोकांची गाठभेट घेतोे. त्यांना बाबासाहेबांच्या कार्याची माहिती सांगतो. अशिक्षित असलो तरी ज्या काही चार गोष्टी माहीत आहे त्या सांगतो. शाळा शिकणं म्हणजे बाबासाहेबांची भक्ती करण्यासारखं आहे. लेकरांना शिकवा. त्यांना मोठ करा. त्यांना बाबासाहेब सांगा. बाबासाहेबानं त्याग केला म्हणून आपण सुखी आहोत, असे म्हणत असताना ते भावुक झाले. धोतराने डोळे पुसत त्यांनी ‘बुद्ध व्हा...शुद्ध व्हा’ हे गीत आपल्या कापऱ्या आवाजात गायिले. केरूआ मोठा माणूस नसला तरी बाबासाहेबांच्या विचारांनी त्याचे मन मोठे झाल्याची प्रचिती आल्यावाचून राहात नाही. 

दिल्ली येथून आले वालदे कुटुंब जी व्यक्ती बुद्धाच्या तत्त्वज्ञानाप्रमाणे वागते, आचरण करते ती स्वत:चा विकास साधू शकते. बुद्धाचे तत्त्वज्ञान जर प्रत्येक नागरिकाने आचरण्याचा प्रयत्न केला तर या जगातील किती तरी दु:खे कमी होतील व विश्वात शांतता नांदेल, असा विश्वास दिनेश वालदे यांनी बोलून दाखविला. धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यासाठी वालदे हे सहकुटुंब दिल्ली येथून मंगळवारी दीक्षाभूमीवर पोहचले.‘लोकमत’शी बोलताना त्यांच्या पत्नी डॉ. नीशा वालदे म्हणाल्या, बुद्धाचा धम्म हा विज्ञानवादी आहे व नीतिमत्ता त्याचा पाया आहे. त्यातूनच समाजाला वेगळी दिशा मिळू शकते. जो समाज नीतिमान आहे, तो समाज प्रज्ञावंत आहे. तो यशवंत आहे, तो समाज बलवंत आहे, तो समाज धनवंत आहे आणि या सर्व गोष्टी आचरणातूनच निर्माण होणाऱ्या आहेत. बाबासाहेबाच्या या पवित्र भूमीवर आल्यावर एक नवीन ऊर्जा मिळते. ही धम्म चळवळीला समोर नेण्यास मदत करते, असेही त्या म्हणाल्या.