शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी; अमित शाहांशी बैठकीत काय चर्चा झाली? खुद्द उपमुख्यमंत्री म्हणाले...
2
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
3
बुकिंग करणाऱ्या ग्राहकांवरच शाओमी उलटली; आता म्हणतेय आठवड्यात पूर्ण पैसे द्या नाहीतर...
4
ITR आणि टॅक्स डेडलाईनमध्ये काय फरक आहे? शेवटची तारीख कधी? ५,००० दंडापासून वाचण्यासाठी लगेच वाचा!
5
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
6
"आधी माझ्या बायकोला वाचवा...."; पुरात अडकलेल्या नवऱ्याची धडपड, जिंकली लोकांची मनं
7
एकटं बसलं होतं जोडपं, पाठीमागून २ युवक आले; गर्लफ्रेंडला सोडून बॉयफ्रेंड पळाला, त्यानंतर जे घडलं...
8
तो 'सोंगाड्या'! DSP सिराजसंदर्भात नेमकं काय म्हणाला जो रुट?
9
'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम प्राजक्ता गायकवाडचा उद्या साखरपुडा, मेहंदीचा व्हिडीओ आला समोर
10
दिल्लीसह देशभरातील वीज ग्राहकांना बसणार ‘शॉक’, वीजदरात वाढ करण्यास सुप्रीम कोर्टाची मंजुरी
11
एकनाथ शिंदे यांनी केले अमित शाह यांचे तोंडभरून कौतुक; बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेत म्हणाले...
12
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
13
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध ऐतिहासिक विजय मिळाल्यानंतरही टीम इंडियाने सेलिब्रेशन का नाही केलं? कारण...
14
FD मध्ये पैसे गुंतवताय? 'या' ६ बँका देत आहेत सर्वाधिक व्याज, लगेच तपासा यादी!
15
देशातील विमानतळांवर दहशतवादी हल्ल्याचा धोका; बीसीएएसकडून सुरक्षा वाढवण्याच्या सूचना
16
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
17
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
18
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
19
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
20
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या

बुद्ध व्हा... शुद्ध व्हा....!!!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 22:37 IST

हातात काठी. डोक्यावर निळी टोपी, फाटलेले जोडे, मळकट सदरा नि त्याहून मळकट धोतर ! दीक्षाभूमीवर थांबलेल्या लोकांची आस्थेने विचारपूस करु न बाबासाहेबांचे विचार सांगणारा ७० वर्षीय वृद्ध. वयाने थकलेला, मात्र मनाने अजूनही तरुण असलेल्या वृद्धाचा हा प्रवास आठ वर्षांपासूनचा आहे. केरूआ तुकाराम शिंदे त्या व्यक्तीचे नाव.

ठळक मुद्देदीक्षाभूमीवर भेटलेली निळाई 

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हातात काठी. डोक्यावर निळी टोपी, फाटलेले जोडे, मळकट सदरा नि त्याहून मळकट धोतर ! दीक्षाभूमीवर थांबलेल्या लोकांची आस्थेने विचारपूस करु न बाबासाहेबांचे विचार सांगणारा ७० वर्षीय वृद्ध. वयाने थकलेला, मात्र मनाने अजूनही तरुण असलेल्या वृद्धाचा हा प्रवास आठ वर्षांपासूनचा आहे. केरूआ तुकाराम शिंदे त्या व्यक्तीचे नाव.जालना जिल्ह्यातील एका छोटाशा गावातून ते मंगळवारी दीक्षाभूमीला पोहचले. त्यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले. लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा बायकोसोबत दीक्षाभूमीला आलो होतो. नंतर संसाराला लागलो. आठ वर्षांपूर्वी पत्नी वारली. तेव्हापासून दरवर्षी येतो. वय झाल्यामुळे घरची मंडळी जाऊ देत नाही, गुपचूप येतो. येथे येऊन आपल्या लोकांची गाठभेट घेतोे. त्यांना बाबासाहेबांच्या कार्याची माहिती सांगतो. अशिक्षित असलो तरी ज्या काही चार गोष्टी माहीत आहे त्या सांगतो. शाळा शिकणं म्हणजे बाबासाहेबांची भक्ती करण्यासारखं आहे. लेकरांना शिकवा. त्यांना मोठ करा. त्यांना बाबासाहेब सांगा. बाबासाहेबानं त्याग केला म्हणून आपण सुखी आहोत, असे म्हणत असताना ते भावुक झाले. धोतराने डोळे पुसत त्यांनी ‘बुद्ध व्हा...शुद्ध व्हा’ हे गीत आपल्या कापऱ्या आवाजात गायिले. केरूआ मोठा माणूस नसला तरी बाबासाहेबांच्या विचारांनी त्याचे मन मोठे झाल्याची प्रचिती आल्यावाचून राहात नाही. 

दिल्ली येथून आले वालदे कुटुंब जी व्यक्ती बुद्धाच्या तत्त्वज्ञानाप्रमाणे वागते, आचरण करते ती स्वत:चा विकास साधू शकते. बुद्धाचे तत्त्वज्ञान जर प्रत्येक नागरिकाने आचरण्याचा प्रयत्न केला तर या जगातील किती तरी दु:खे कमी होतील व विश्वात शांतता नांदेल, असा विश्वास दिनेश वालदे यांनी बोलून दाखविला. धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यासाठी वालदे हे सहकुटुंब दिल्ली येथून मंगळवारी दीक्षाभूमीवर पोहचले.‘लोकमत’शी बोलताना त्यांच्या पत्नी डॉ. नीशा वालदे म्हणाल्या, बुद्धाचा धम्म हा विज्ञानवादी आहे व नीतिमत्ता त्याचा पाया आहे. त्यातूनच समाजाला वेगळी दिशा मिळू शकते. जो समाज नीतिमान आहे, तो समाज प्रज्ञावंत आहे. तो यशवंत आहे, तो समाज बलवंत आहे, तो समाज धनवंत आहे आणि या सर्व गोष्टी आचरणातूनच निर्माण होणाऱ्या आहेत. बाबासाहेबाच्या या पवित्र भूमीवर आल्यावर एक नवीन ऊर्जा मिळते. ही धम्म चळवळीला समोर नेण्यास मदत करते, असेही त्या म्हणाल्या.