शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

टू बी ऑर नॉट टू बी? विद्यार्थी, महाविद्यालयांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 10:41 IST

Nagpur News १५ फेब्रुवारीपासून वर्ग सुरू होणार की नाही, असा सवाल महाविद्यालये व विद्यार्थ्यांकडून विचारण्यात येत आहे.

ठळक मुद्दे१५ फेब्रुवारीपासून महाविद्यालये सुरू होणार की नाही?

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : १५ फेब्रुवारीपासून विद्यापीठांमधील विभाग व महाविद्यालयांतील वर्ग सुरू करण्यास राज्य शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने परवानगी दिलेली आहे. यासंदर्भात स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घ्यायचा असल्याने सर्वांचे लक्ष राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाकडे लागले आहे. परंतु विद्यापीठाने यासंदर्भात अद्यापही कुठलेही दिशानिर्देश जारी केलेले नाहीत. त्यामुळे १५ फेब्रुवारीपासून वर्ग सुरू होणार की नाही, असा सवाल महाविद्यालये व विद्यार्थ्यांकडून विचारण्यात येत आहे.

‘कोरोना’मुळे मार्च २०२० पासून महाविद्यालयांना ‘ब्रेक’ लागला. आता स्थिती नियंत्रणात येत असताना ‘कोरोना’ नियमावलींचे पालन करून वर्गात शिकवणीसाठी ५० टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती राहील, असे उच्च व तंत्रशिक्षण विभागाने स्पष्ट केले. महापालिका, नगरपालिका क्षेत्रातील विद्यापीठे, महाविद्यालये सुरू करताना आपत्ती प्राधिकरण व्यवस्थापनाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांची परवानगी अनिवार्य असणार आहे. वर्गात आळीपाळीने विद्यार्थी बोलावले जातील. वर्गात गर्दी होणार नाही, याची काळजी प्राचार्य, प्राध्यापकांना घ्यावी लागेल, अशा सूचनादेखील दिल्या.

यासंदर्भात नागपूर विद्यापीठानेदेखील दिशानिर्देश जारी करणे आवश्यक होते. मंगळवारी झालेल्या विद्वत्त परिषदेच्या बैठकीत यावर चर्चादेखील झाली व १५ फेब्रुवारीपासून महाविद्यालये सुरू करण्याचा सूरदेखील दिसून आला. मात्र प्रत्यक्षात अद्यापही अधिकृतपणे कुठलीही सूचना महाविद्यालयांना प्राप्त झालेली नाही. त्यामुळे महाविद्यालयांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. दुसरीकडे विद्यार्थ्यांकडून सातत्याने महाविद्यालयांना विचारणा करण्यात येत आहे. मात्र त्यांच्याकडेच काही माहिती नसल्याने संभ्रम वाढत असल्याचे दिसून येत आहे.

तयारी करायला वेळ हवा

विद्यापीठाने अद्यापही काहीही सूचना दिलेली नाही. जर १५ फेब्रुवारीपासून महाविद्यालये सुरू करायची असतील तर विद्यार्थी, शिक्षकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पावले उचलणे आवश्यक राहणार आहे. शिवाय वेळापत्रक निश्चित करणे यासारख्या बाबीदेखील निश्चित कराव्या लागणार आहेत. विद्यापीठाकडून नेहमीची लेटलतिफी कधी संपणार, असा प्रश्न एका प्राचार्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर उपस्थित केला.

स्थानिक परिस्थितीवर निर्णय घेणार का?

राज्यात नागपुरातील ‘कोरोना’ रुग्णांची स्थिती अद्यापही हवी तशी आटोक्यात आलेली नाही. स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन महाविद्यालये सुरू होणार की १५ फेब्रुवारीपासून वर्गांची पहिली घंटा वाजणार याबाबत व्यवस्थापनांकडेदेखील उत्तर नाही. यासंदर्भात कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

टॅग्स :collegeमहाविद्यालयRashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ