शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
3
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
4
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीविनहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
5
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
6
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
7
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
8
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
9
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
10
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
11
"जा अन् वडिलांप्रमाणे रिक्षा चालव"; सिराजनं शेअर केलेली लांबलचक पोस्ट चर्चेत
12
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
13
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
14
विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पुस्तके मिळणार
15
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
16
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
17
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
18
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
19
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
20
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप

काळजी घ्या! सुट्यांमध्ये बाहेर फिरुन आलेल्यांना ‘व्हायरल’चा ताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2023 18:58 IST

Nagpur News जे उन्हाळी सुट्यांमध्ये बाहेरील देशात किंवा काश्मीर, हिमाचल आणि उत्तराखंडमध्ये फिरून परत आलेले आहेत त्यांच्यात ‘व्हायरल’ दिसून येत असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे.

सुमेध वाघमारे 

नागपूर : उपराजधानीतील वाढते तापमान असह्य होत असताना ‘व्हायरल इन्फेक्शन’मध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. विशेषत: जे उन्हाळी सुट्यांमध्ये बाहेरील देशात किंवा काश्मीर, हिमाचल आणि उत्तराखंडमध्ये फिरून परत आलेले आहेत त्यांच्यात ‘व्हायरल’ दिसून येत असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे. ताप, सर्दी, खोकला व काही रुग्णांमध्ये अतिसाराचे लक्षणे दिसून येत आहे. बहुसंख्य रुग्णांमध्ये हे सौम्य लक्षणे असलेतरी काळजी घेण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे. 

   सध्या सकाळी कडक उन्ह, दुपारनंतर ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाचा परिणाम शरीरावर होतो. परंतु जे उन्हाळी सुटी घालविण्यासाठी इतर राज्यात गेलेले आहेत ते परतून आल्यावर त्यांच्यात व्हायरल इन्फेक्शन दिसून येत असल्याचे संसर्गजन्य रोग विषेज्ञ डॉ. नितीन शिंदे यांनी सांगितले. त्यांच्यातून इतरांना पसरत असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. त्यांच्यानुसार, ही लक्षणे सौम्य आहेत. परंतु औषधोपचार करणे आवश्यक आहे. 

-पाश्चात्य देशातून आलेल्यांनाही ‘व्हायरल’ज्येष्ठ जनरल फिजिशियन डॉ. जय देशमुख यांनी सांगितले, पाश्चात्य देशात फिरून नागपुरात परत आलेल्यांमध्येही ‘व्हायरल इन्फेक्शन’ दिसून येत आहे. विशेषत: जे १५-२५ ग्रुपने गेले होते त्यांच्यात ‘व्हायरल’चे प्रमाण अधिक आहे. 

-पाच दिवस राहतात लक्षणेडॉ. देशमुख म्हणाले, ‘व्हायरल’च्या रुग्णांमध्ये सर्दी, खोकला, ताप, घश्यात खवखव ही लक्षणे दिसून येतात. साधारण चार-पाच दिवस लक्षणे असतात.

- जोखमीच्या रुग्णांनी काळजी घ्यायला हवीहृद्य विकार, उच्चरक्तदाब, मधुमेह, किडनी, यकृताचा आजार, अवयव प्रत्यारोपण झालेल्या या जोखमीच्या रुग्णांना व्हायरल झाला असेल तर त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार करायला हवे. वयोवृद्धांनीही अधिक काळजी घ्यायला हवी. विशेषत: मास्क वापरणे आवश्यक असल्याचे डॉ. देशमुख यांनी सांगितले.

टॅग्स :Healthआरोग्य