शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
2
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
3
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
4
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
5
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
6
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
7
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
8
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
9
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
10
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
11
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
12
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
13
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
14
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
15
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
16
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
17
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
18
IND vs PAK Asia Cup 2025 Final Live Streaming : भारत-पाक 'महायुद्ध'! कुठं अन् कशी पाहता येईल ऐतिहासिक फायनल?
19
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
20
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना

काळजी घ्या! सुट्यांमध्ये बाहेर फिरुन आलेल्यांना ‘व्हायरल’चा ताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2023 18:58 IST

Nagpur News जे उन्हाळी सुट्यांमध्ये बाहेरील देशात किंवा काश्मीर, हिमाचल आणि उत्तराखंडमध्ये फिरून परत आलेले आहेत त्यांच्यात ‘व्हायरल’ दिसून येत असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे.

सुमेध वाघमारे 

नागपूर : उपराजधानीतील वाढते तापमान असह्य होत असताना ‘व्हायरल इन्फेक्शन’मध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. विशेषत: जे उन्हाळी सुट्यांमध्ये बाहेरील देशात किंवा काश्मीर, हिमाचल आणि उत्तराखंडमध्ये फिरून परत आलेले आहेत त्यांच्यात ‘व्हायरल’ दिसून येत असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे. ताप, सर्दी, खोकला व काही रुग्णांमध्ये अतिसाराचे लक्षणे दिसून येत आहे. बहुसंख्य रुग्णांमध्ये हे सौम्य लक्षणे असलेतरी काळजी घेण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे. 

   सध्या सकाळी कडक उन्ह, दुपारनंतर ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाचा परिणाम शरीरावर होतो. परंतु जे उन्हाळी सुटी घालविण्यासाठी इतर राज्यात गेलेले आहेत ते परतून आल्यावर त्यांच्यात व्हायरल इन्फेक्शन दिसून येत असल्याचे संसर्गजन्य रोग विषेज्ञ डॉ. नितीन शिंदे यांनी सांगितले. त्यांच्यातून इतरांना पसरत असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. त्यांच्यानुसार, ही लक्षणे सौम्य आहेत. परंतु औषधोपचार करणे आवश्यक आहे. 

-पाश्चात्य देशातून आलेल्यांनाही ‘व्हायरल’ज्येष्ठ जनरल फिजिशियन डॉ. जय देशमुख यांनी सांगितले, पाश्चात्य देशात फिरून नागपुरात परत आलेल्यांमध्येही ‘व्हायरल इन्फेक्शन’ दिसून येत आहे. विशेषत: जे १५-२५ ग्रुपने गेले होते त्यांच्यात ‘व्हायरल’चे प्रमाण अधिक आहे. 

-पाच दिवस राहतात लक्षणेडॉ. देशमुख म्हणाले, ‘व्हायरल’च्या रुग्णांमध्ये सर्दी, खोकला, ताप, घश्यात खवखव ही लक्षणे दिसून येतात. साधारण चार-पाच दिवस लक्षणे असतात.

- जोखमीच्या रुग्णांनी काळजी घ्यायला हवीहृद्य विकार, उच्चरक्तदाब, मधुमेह, किडनी, यकृताचा आजार, अवयव प्रत्यारोपण झालेल्या या जोखमीच्या रुग्णांना व्हायरल झाला असेल तर त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार करायला हवे. वयोवृद्धांनीही अधिक काळजी घ्यायला हवी. विशेषत: मास्क वापरणे आवश्यक असल्याचे डॉ. देशमुख यांनी सांगितले.

टॅग्स :Healthआरोग्य