शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

काळजी घ्या! सुट्यांमध्ये बाहेर फिरुन आलेल्यांना ‘व्हायरल’चा ताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2023 18:58 IST

Nagpur News जे उन्हाळी सुट्यांमध्ये बाहेरील देशात किंवा काश्मीर, हिमाचल आणि उत्तराखंडमध्ये फिरून परत आलेले आहेत त्यांच्यात ‘व्हायरल’ दिसून येत असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे.

सुमेध वाघमारे 

नागपूर : उपराजधानीतील वाढते तापमान असह्य होत असताना ‘व्हायरल इन्फेक्शन’मध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. विशेषत: जे उन्हाळी सुट्यांमध्ये बाहेरील देशात किंवा काश्मीर, हिमाचल आणि उत्तराखंडमध्ये फिरून परत आलेले आहेत त्यांच्यात ‘व्हायरल’ दिसून येत असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे. ताप, सर्दी, खोकला व काही रुग्णांमध्ये अतिसाराचे लक्षणे दिसून येत आहे. बहुसंख्य रुग्णांमध्ये हे सौम्य लक्षणे असलेतरी काळजी घेण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे. 

   सध्या सकाळी कडक उन्ह, दुपारनंतर ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाचा परिणाम शरीरावर होतो. परंतु जे उन्हाळी सुटी घालविण्यासाठी इतर राज्यात गेलेले आहेत ते परतून आल्यावर त्यांच्यात व्हायरल इन्फेक्शन दिसून येत असल्याचे संसर्गजन्य रोग विषेज्ञ डॉ. नितीन शिंदे यांनी सांगितले. त्यांच्यातून इतरांना पसरत असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. त्यांच्यानुसार, ही लक्षणे सौम्य आहेत. परंतु औषधोपचार करणे आवश्यक आहे. 

-पाश्चात्य देशातून आलेल्यांनाही ‘व्हायरल’ज्येष्ठ जनरल फिजिशियन डॉ. जय देशमुख यांनी सांगितले, पाश्चात्य देशात फिरून नागपुरात परत आलेल्यांमध्येही ‘व्हायरल इन्फेक्शन’ दिसून येत आहे. विशेषत: जे १५-२५ ग्रुपने गेले होते त्यांच्यात ‘व्हायरल’चे प्रमाण अधिक आहे. 

-पाच दिवस राहतात लक्षणेडॉ. देशमुख म्हणाले, ‘व्हायरल’च्या रुग्णांमध्ये सर्दी, खोकला, ताप, घश्यात खवखव ही लक्षणे दिसून येतात. साधारण चार-पाच दिवस लक्षणे असतात.

- जोखमीच्या रुग्णांनी काळजी घ्यायला हवीहृद्य विकार, उच्चरक्तदाब, मधुमेह, किडनी, यकृताचा आजार, अवयव प्रत्यारोपण झालेल्या या जोखमीच्या रुग्णांना व्हायरल झाला असेल तर त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार करायला हवे. वयोवृद्धांनीही अधिक काळजी घ्यायला हवी. विशेषत: मास्क वापरणे आवश्यक असल्याचे डॉ. देशमुख यांनी सांगितले.

टॅग्स :Healthआरोग्य