शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक इनिंग; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

‘फेक न्यूज’ पसरवताय..सावधान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 10:46 IST

‘सबकुछ ऑनलाईन’च्या जमान्यात प्रसारमाध्यमेदेखील ‘ई’ चावडीवर सहजपणे उपलब्ध होतात. परंतु अनेकदा कुठलीही शहानिशा न करता नागरिकांकडून ‘फेक न्यूज’ एकमेकांना पाठविण्यात येतात.

ठळक मुद्देचार वर्षांत १२ गुन्हे दाखलकारवाईचे प्रमाण कधी वाढणार ?

योगेश पांडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘सबकुछ ऑनलाईन’च्या जमान्यात प्रसारमाध्यमेदेखील ‘ई’ चावडीवर सहजपणे उपलब्ध होतात. परंतु अनेकदा कुठलीही शहानिशा न करता नागरिकांकडून ‘फेक न्यूज’ एकमेकांना पाठविण्यात येतात. मात्र असे करणे महागात पडू शकते. २०१६ पासून नागपूर शहरात अशा प्रकारे ‘फेक न्यूज’ विविध ‘सोशल मीडिया’वर ‘पोस्ट’ करणे अनेकांना महाग पडले. ‘लोकमत’ला प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार चार वर्षांत १२ जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. ‘फेक न्यूज’चे एकूण प्रमाण लक्षात घेता गुन्ह्यांची संख्या अतिशय कमी असून कारवाईचे प्रमाण कधी वाढणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.मागील काही वर्षांत ‘स्मार्टफोन्स’ वापरणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. विविध वर्तमानपत्रे, वृत्तवाहिन्यांचे ‘वेबपोर्टल्स’ असून त्यावर नियमितपणे बातम्या ‘अपडेट’ होतात. परंतु अनेकदा ही वर्तमानपत्रे किंवा वृत्तवाहिन्यांचे नावाखाली खोटे वृत्त तयार केले जाते व ते ‘सोशल मीडिया’वर पसरविले जाते. याचप्रमाणे अनामिक म्हणूनदेखील अनेकदा खोटे वृत्त विविध ‘प्लॅटफॉर्म्स’वर ‘पोस्ट’ करण्यात येते. एखाद्या परिचिताने पाठविले म्हणून ते इतरांकडूनदेखील समोर ‘फॉरवर्ड’ होते.असे प्रकार दररोज घडत असतात. परंतु असे करणे हा प्रकार ‘सायबर’ गुन्ह्यांमध्ये येतो. असे करणाऱ्यांविरोधात ‘आयटी अ‍ॅक्ट’मधील कलम ५०५ अंतर्गत गुन्हा दाखल करता येऊ शकतो. २०१६ सालापासून नागपुरात ‘फेक न्यूज’संदर्भात विविध तक्रारी झाल्या व नागपूर पोलिसांनी एकूण १२ प्रकरणात गुन्हे दाखल केले. २०१६ मध्ये ४, २०१७ मध्ये २, व २०१८ साली तीन व २०१९ मध्ये आॅगस्ट महिन्यापर्यंत तीन गुन्हे दाखल झाले.

‘फेक प्रोफाईल’विरोधात कठोर पावले हवी‘सोशल मीडिया’वर ‘फेक प्रोफाईल’ तयार करून इतरांना त्रास देणे किंवा अश्लाघ्य भाषेत टीकाटिप्पणी करणे असे प्रकारदेखील होत असतात. राज्यातच अशा प्रकारच्या हजारो ‘फेक प्रोफाईल’ असतील. हादेखील ‘आयटी अ‍ॅक्ट’चा भंगच आहे. मात्र यासंदर्भात हवी तशी कारवाई होताना दिसून येत नाही. २०१७ साली राज्यभरात ‘फेक प्रोफाईल’ तयार करणाºया केवळ चार जणांविरोधातच गुन्हे दाखल झाले.तक्रारीसाठी लोकच पुढे येत नाहीतदररोज विविध ‘प्लॅटफॉर्म’वर ‘फेक न्यूज’ दिसून येतात. यातील काही बातम्या या सामाजिक सौहार्द बिघडविणाºया किंवा समाजात संभ्रम निर्माण करणाऱ्यादेखील असू शकतात. यासंदर्भात तक्रारीसाठी लोक पुढे येत नाही. त्यामुळे गुन्ह्यांचे प्रमाण कमी आहे, अशी माहिती एका पोलिस अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.‘एनसीआरबी’च्या अहवालात प्रथमच नोंद‘एनसीआरबी’च्या (नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो) अहवालातदेखील ‘फेक न्यूज’ प्रकरणी दाखल गुन्ह्यांची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे अशाप्रकारची नोंद प्रथमच दिसून येत आहे. २०१७ सालच्या अहवालानुसार महाराष्ट्रात असे उपद्व्याप करणाºया ११ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. यात नागपुरातील दोन गुन्ह्यांचा समावेश होता.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइम