शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
3
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
4
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
5
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
6
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
7
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
8
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
9
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
10
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
11
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
12
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
13
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
14
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
15
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
16
आधी केस गळाले, नंतर नख; आता लोकांच्या हाताला पडताहेत भेगा; बुलढाणा जिल्ह्यातील गावात भीतीचे वातावरण
17
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
18
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
19
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
20
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."

सायबर क्राईमपासून सतर्क राहा : ब्रिजेश सिंह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 00:19 IST

काळानुसार झपाट्याने स्मार्ट फोन वापरणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यासोबतच सायबर गुन्ह्यांचे प्रमाणही वाढत आहे. एका छोट्या चुकीमुळे अनेक लोकांची खासगी माहिती सहजरीत्या हॅक होत आहे. त्यामुळे स्मार्ट फोनचा वापर करणाऱ्यांनी सतर्क राहिल्यास सायबर गुन्हे थांबविता येतील, असे मत राज्याचे माहिती व जनसंपर्क महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देअ‍ॅप डाऊनलोड करण्यापूर्वी माहिती मिळवासोशल नेटवर्किंग साईटचा वापर करताना सजग राहण्याची गरज

आॅनलाईन लोकमतनागपूर : काळानुसार झपाट्याने स्मार्ट फोन वापरणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यासोबतच सायबर गुन्ह्यांचे प्रमाणही वाढत आहे. एका छोट्या चुकीमुळे अनेक लोकांची खासगी माहिती सहजरीत्या हॅक होत आहे. त्यामुळे स्मार्ट फोनचा वापर करणाऱ्यांनी सतर्क राहिल्यास सायबर गुन्हे थांबविता येतील, असे मत राज्याचे माहिती व जनसंपर्क महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी व्यक्त केले.बुधवारी लोकमत भवनाला माहिती व जनसंपर्क महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी सदिच्छा भेट देऊन संपादकीय विभागातील सहकाऱ्यांशी चर्चा करताना ते बोलत होते. उल्लेखनीय म्हणजे सिंह हे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी सांगितले की, सायबर गुन्हेगारांना कुणाचा डाटा किंवा खासगी माहिती हॅक करताना अधिक श्रम करावे लागत नाही. आज त्यांच्याजवळ असे अनेक तंत्र आहेत, ज्याच्या आधारे ते हॅकिंग करतात. त्यामुळे सोशल नेटवर्किंग साईटचा वापर करताना यूझर नेम व पासवर्ड बनविताना विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे, परंतु असे होत नाही. सहजपणे आठवू शकतील असे यूझर नेम व पासवर्ड ठेवण्यात येतात. याच मानसिकतेचा फायदा हॅकर्स उचलतात. स्मार्ट फोनचा वापर करणारे त्यांच्या फोनवर आलेल्या अनेक सूचनांकडे दुर्लक्ष करतात. सिस्टीम अपडेट करीत नाहीत. ही चुकीची बाब आहे. सध्याच्या काळात स्मार्ट फोन, लॅपटॉपसारखा वापरल्या जातो. आर्थिक व्यवहारांसोबत सर्वच कामे स्मार्ट फोनच्या साह्याने करण्यात येत आहेत. प्रत्येक कामासाठी यूझर नेम व पासवर्डची गरज असते. परंतु अनेक उपभोक्ते असेही असतात जे सर्वच कामांसाठी एकाच प्रकारचा पासवर्ड व यूझर नेम वापरतात. ही अतिशय धोकादायक बाब आहे. उपभोक्त्यांनी यापासून सावध राहणे गरजेचे आहे. त्यांच्यासोबत अमरावती व नागपूर विभागाचे संचालक राधाकृष्ण मुळी, नागपूरचे जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर, चंद्रपूरचे जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके उपस्थित होते.आधार सुरक्षितसिंह यांनी सांगितले की, आधारकार्डला बँकेशी लिंक करण्याबाबत अनेक नागरिकांमध्ये संभ्रम आहे. अनेक नागरिकांना ही शंका आहे की, फोन व बँकेशी आधार लिंक केल्यास त्यांची गोपनीय माहिती म्हणजे बायोमेट्रिक डाटा सार्वजनिक होईल. परंतु असे होत नसून आधार पूर्णपणे सुरक्षित आहे. कुणाचाही बायोमेट्रिक डाटा सार्वजनिक होण्याचा कोणताही धोका नाही. नागरिकांनी शंकांपासून दूर राहून आपले आधार बँक खात्याशी लिंक करावयास हवे.सायबर गुन्हे रोखण्यासाठी व्यापक तयारीसिंह यांनी सांगितले की, सायबर गुन्हे रोखण्यासाठी व्यापक तयारी करण्यात येत आहे. त्यासाठी अनेक योजना लागू करण्यात आल्या आहेत. आगामी दिवसात काही योजना लागू करण्यात येतील. सायबर गुन्हे थांबविण्यासाठी अधिकाऱ्यांची चमू गठित करण्यात येणार आहे. नागरिकांमध्ये जागृती करण्याचा प्रयत्न करण्यात येईल.माहिती व जनसंपर्कास गतीसिंह यांनी सांगितले की, राज्यात माहिती व जनसंपर्काच्या कार्यात गती आणण्यात येत आहे. नव्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. सोबतच मीडियाच्या माध्यमातून सामान्य नागरिकांपर्यंत पोहचण्यात येत आहे. सोशल नेटवर्किंग साईटचा वापर करण्यात येत आहे. सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी वेबसाईट अपडेट करण्यात येत आहे. यामुळे काही दिवसांपासून सोशल नेटवर्किंग साईट्सवर माहिती व जनसंपर्क महासंचालनालयासोबत जुळलेल्यांची संख्या वाढली आहे. लोकराज्य या मासिकामुळेही प्रसारात वाढ झाली आहे.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमnagpurनागपूर