शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
3
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
4
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
5
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
6
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
7
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
8
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
9
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
10
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
11
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
12
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
13
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
14
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
15
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
16
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
17
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
18
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
19
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
20
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...

सायबर क्राईमपासून सतर्क राहा : ब्रिजेश सिंह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 00:19 IST

काळानुसार झपाट्याने स्मार्ट फोन वापरणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यासोबतच सायबर गुन्ह्यांचे प्रमाणही वाढत आहे. एका छोट्या चुकीमुळे अनेक लोकांची खासगी माहिती सहजरीत्या हॅक होत आहे. त्यामुळे स्मार्ट फोनचा वापर करणाऱ्यांनी सतर्क राहिल्यास सायबर गुन्हे थांबविता येतील, असे मत राज्याचे माहिती व जनसंपर्क महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देअ‍ॅप डाऊनलोड करण्यापूर्वी माहिती मिळवासोशल नेटवर्किंग साईटचा वापर करताना सजग राहण्याची गरज

आॅनलाईन लोकमतनागपूर : काळानुसार झपाट्याने स्मार्ट फोन वापरणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यासोबतच सायबर गुन्ह्यांचे प्रमाणही वाढत आहे. एका छोट्या चुकीमुळे अनेक लोकांची खासगी माहिती सहजरीत्या हॅक होत आहे. त्यामुळे स्मार्ट फोनचा वापर करणाऱ्यांनी सतर्क राहिल्यास सायबर गुन्हे थांबविता येतील, असे मत राज्याचे माहिती व जनसंपर्क महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी व्यक्त केले.बुधवारी लोकमत भवनाला माहिती व जनसंपर्क महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी सदिच्छा भेट देऊन संपादकीय विभागातील सहकाऱ्यांशी चर्चा करताना ते बोलत होते. उल्लेखनीय म्हणजे सिंह हे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी सांगितले की, सायबर गुन्हेगारांना कुणाचा डाटा किंवा खासगी माहिती हॅक करताना अधिक श्रम करावे लागत नाही. आज त्यांच्याजवळ असे अनेक तंत्र आहेत, ज्याच्या आधारे ते हॅकिंग करतात. त्यामुळे सोशल नेटवर्किंग साईटचा वापर करताना यूझर नेम व पासवर्ड बनविताना विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे, परंतु असे होत नाही. सहजपणे आठवू शकतील असे यूझर नेम व पासवर्ड ठेवण्यात येतात. याच मानसिकतेचा फायदा हॅकर्स उचलतात. स्मार्ट फोनचा वापर करणारे त्यांच्या फोनवर आलेल्या अनेक सूचनांकडे दुर्लक्ष करतात. सिस्टीम अपडेट करीत नाहीत. ही चुकीची बाब आहे. सध्याच्या काळात स्मार्ट फोन, लॅपटॉपसारखा वापरल्या जातो. आर्थिक व्यवहारांसोबत सर्वच कामे स्मार्ट फोनच्या साह्याने करण्यात येत आहेत. प्रत्येक कामासाठी यूझर नेम व पासवर्डची गरज असते. परंतु अनेक उपभोक्ते असेही असतात जे सर्वच कामांसाठी एकाच प्रकारचा पासवर्ड व यूझर नेम वापरतात. ही अतिशय धोकादायक बाब आहे. उपभोक्त्यांनी यापासून सावध राहणे गरजेचे आहे. त्यांच्यासोबत अमरावती व नागपूर विभागाचे संचालक राधाकृष्ण मुळी, नागपूरचे जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर, चंद्रपूरचे जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके उपस्थित होते.आधार सुरक्षितसिंह यांनी सांगितले की, आधारकार्डला बँकेशी लिंक करण्याबाबत अनेक नागरिकांमध्ये संभ्रम आहे. अनेक नागरिकांना ही शंका आहे की, फोन व बँकेशी आधार लिंक केल्यास त्यांची गोपनीय माहिती म्हणजे बायोमेट्रिक डाटा सार्वजनिक होईल. परंतु असे होत नसून आधार पूर्णपणे सुरक्षित आहे. कुणाचाही बायोमेट्रिक डाटा सार्वजनिक होण्याचा कोणताही धोका नाही. नागरिकांनी शंकांपासून दूर राहून आपले आधार बँक खात्याशी लिंक करावयास हवे.सायबर गुन्हे रोखण्यासाठी व्यापक तयारीसिंह यांनी सांगितले की, सायबर गुन्हे रोखण्यासाठी व्यापक तयारी करण्यात येत आहे. त्यासाठी अनेक योजना लागू करण्यात आल्या आहेत. आगामी दिवसात काही योजना लागू करण्यात येतील. सायबर गुन्हे थांबविण्यासाठी अधिकाऱ्यांची चमू गठित करण्यात येणार आहे. नागरिकांमध्ये जागृती करण्याचा प्रयत्न करण्यात येईल.माहिती व जनसंपर्कास गतीसिंह यांनी सांगितले की, राज्यात माहिती व जनसंपर्काच्या कार्यात गती आणण्यात येत आहे. नव्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. सोबतच मीडियाच्या माध्यमातून सामान्य नागरिकांपर्यंत पोहचण्यात येत आहे. सोशल नेटवर्किंग साईटचा वापर करण्यात येत आहे. सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी वेबसाईट अपडेट करण्यात येत आहे. यामुळे काही दिवसांपासून सोशल नेटवर्किंग साईट्सवर माहिती व जनसंपर्क महासंचालनालयासोबत जुळलेल्यांची संख्या वाढली आहे. लोकराज्य या मासिकामुळेही प्रसारात वाढ झाली आहे.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमnagpurनागपूर